शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

नऊ गावात ढोल बजावो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क घोडेगाव : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील रस्ते मजबूत डांबरी रस्त्याने जोडले जाणे आवश्यक आहे, सध्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

घोडेगाव : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील रस्ते मजबूत डांबरी रस्त्याने जोडले जाणे आवश्यक आहे, सध्या पावसाळ्यात अनेक रस्त्यांचे नुकसान झाले आहे, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी किसानसभेच्या वतीने नऊ गावांमध्ये ढोल बजावो आंदोलन करण्यात आले.

तालुक्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण हे मोठे आहे. दरड कोसळणे अतिवृष्टी होणे, ढगफुटी होणे यासारखे प्रकार पावसाळ्याच्या काळात वारंवार होत आहे. तालुक्याच्या आदिवासी भागातील आजही अनेक वाड्या-वस्त्या व गावे, कच्च्या सडकेने किंवा पारंपरिक पायवाटेने एकमेकांशी जोडलेली आहेत.

अशा ठिकाणी भविष्यात काही नैसर्गिक आपत्ती झाली तर मदत यंत्रणा सुद्धा पोहोचवणे अवघड जाईल. यासाठी तालुक्याच्या आदिवासी भागातील काही रस्ते विशेष बाब म्हणून डांबरी सडकेने एकमेकांशी जोडणे आवश्यक आहे. हे रस्ते पक्के व्हावेत यासाठी सदरील गावांच्या ग्रामपंचायत व किसान सभेने वारंवार प्रशासनाकडे मागणी व पाठपुरावा केलेला आहे.

परंतु, प्रशासनाने अद्यापही या मागण्यांकडे लक्ष दिले नाही, या पार्श्वभूमीवर सुमारे नऊ गावांमध्ये ढोल वाजवून निषेध व्यक्त केला. प्रशासनाने या रस्त्यांची कामे त्वरित सुरू न केल्यास किसानसभेच्या वतीने, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर सोमवार, दि.२३ ऑगस्ट रोजी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याच इशारा किसान सभेने निवेदनाव्दारे आदिवासी विकास विभाग, तहसीलदार, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उपअभियंता बांधकाम विभाग, पंचायत समिती व सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडेगाव यांना दिला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे उपाध्यक्ष राजू घोडे, सचिव अशोक पेकारी याचबरोबर तालुका कार्यकारिणी सदस्य दत्ता गिरंगे, अशोक जोशी, अनिल सुपे, दत्ता गवारी, रामभाऊ भांगे, कुमार वालकोळी, दीपक वालकोळी, संदीप केवाळे, तुकाराम भांगरे यांनी केले.