शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थापनातूनच साधेल दुष्काळमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:14 IST

गेल्या ३२ वर्षांपासून भारतीय जैन संघटना समाजसेवा करीत आहे. चार वर्षांपूर्वी संघटनेच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये जलसंधारणाचे मोठे काम उभे करण्यात आले. पानी फाउंडेशनसोबत बीजेएसने काम करून, समाजसेवेचा आणखी एक आदर्श घालून दिला आहे.

गेल्या ३२ वर्षांपासून भारतीय जैन संघटना समाजसेवा करीत आहे. चार वर्षांपूर्वी संघटनेच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये जलसंधारणाचे मोठे काम उभे करण्यात आले. पानी फाउंडेशनसोबत बीजेएसने काम करून, समाजसेवेचा आणखी एक आदर्श घालून दिला आहे. ज्यांच्यासाठी काम केले, त्यांच्या चेहºयावरील समाधान कृतकृत्य करणारे आहे. व्यवस्थापन, साधनांची उपलब्धता आणि सेवाभावी वृत्तीमधून राज्य दुष्काळमुक्त होऊ शकेल. यापुढे राज्याची दुष्काळमुक्ती हेच आयुष्याचे ध्येय असल्याचे समाजब्रती शांतिलाल मुथ्था यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.भारतीय जैन संघटना (बीजेएस) १९९३ पासून सामाजिक कार्यात आहे. राज्यामध्ये ओला आणि सुका अशा दोन्ही स्वरूपाच्या विरोधाभासाला तोंड द्यावे लागते. या आपत्तींमध्ये बीजेएस नेहमीच धावून गेली आहे. राज्यामध्ये २०१३ मध्ये १९७२च्या दुष्काळानंतरचा सर्वांत मोठा दुष्काळ पडला होता. बीजेएसच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील सर्व तलावांमधील गाळ उपसण्यात आला. ११७ तलावांचे खोलीकरण करून, त्यामधील १ लाख क्युबिक मीटर गाळ डोंगराळ भागातील शेतीवर टाकण्यात आला. या कामाला आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील अभ्यासक, मंत्री, लोकप्रतिनिधींनी भेट दिली होती. त्याच्या परिणामस्वरूप तलावांमध्ये भरपूर पाणी जमा झालेले होते. जवळपास पाच हजार हेक्टर जमीन सुपीक झाली.याच काळात जनावरांच्या चाºयाचा प्रश्न भीषण बनला होता. बीजेएसने मराठवाडा आणि पुणे जिल्ह्यात तब्बल ३० छावण्या सुरू केल्या. विविध ठिकाणच्या पांजरपोळ संस्थांना सोबत घेण्यात आले. चारा उपलब्ध होईनासा झाल्यावर स्वत: खर्च करून मध्य प्रदेशातून दोन ट्रक भरून चारा आणून पुरवला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम झालेले हे देशातील पहिलेच उदाहरण होते. २०१५-१६ या काळात बीड, लातूर, उस्मानाबाद येथेही नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, गाळउपसा अशी कामे करण्यात आल्याचे मुथ्था यांनी सांगितले.ते म्हणाले की, २०१६ मध्ये माझे मित्र महावीर जैन भेटायला आले होते. त्यांनी दुष्काळमुक्तीवर बीजेएसच्या कामाची माहिती समजून घेतली. तेथूनच अभिनेता आमिर खानला फोन करून माहिती दिली. आमिर खान, सत्यजित भटकळ यांच्याशी लगेचच आॅगस्ट २०१६ मध्ये माझी बैठक झाली. त्यानंतर तीन ते पाच तासांच्या ७ बैठका झाल्या. त्यांनी बीजेएसच्या ३२ वर्षांच्या सेवा कार्याची माहिती घेतली. आमचा अनुभव, सोशल कनेक्ट, संपर्क समजून घेतला. ‘वॉटरकप’ ही संकल्पना समजून सांगितली. त्यांना ३ तालुक्यांवरून ३० तालुक्यांवर जायचे होते. त्यासाठीचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आम्ही केले.त्यांना दिलेल्या सूचना आवडल्या. त्या त्यांनी स्वीकारल्या. एकत्र काम करण्याविषयी चर्चा झाली; परंतु केवळ श्रमदान आणि प्रशिक्षणामधून परिणाम साधणे आणि दुष्काळमुक्ती शक्य नसल्याचे आमिरच्या लक्षात आणून दिल्यानंतर, त्याच्या पुढील काम करून देण्याची तयारी दर्शविण्यात आली. त्यासाठी संघटनेने जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर ट्रॉलीज पुरविण्याचे आव्हान स्वीकारले. ज्या गावांनी श्रमदानाचा टप्पा पार केला आहे, त्यांनाही मशिनरी पुरविण्यात येणार होती. प्रशिक्षण आणि दुष्काळमुक्ती यांच्यामधील तफावत दूर करण्यासाठी कामाला सुरुवात करण्यात आली; मात्र सर्व जेसीबी, पोकलेन शासकीय कामात व्यस्त होत्या, अनेकांनी दर वाढविले होते. या सर्व अडचणींवर मात करीत मशिनरी उपलब्ध करून घेण्यात आली. मेळघाटासाठी तर मध्य प्रदेशातून मशिनरी आणून पाच हजार जणांचे श्रमदान घडवून आणण्यात आले. कार्यकर्त्यांची फळी तयार करून, त्यांना जबाबदाºयांचे वाटप करण्यात आले होते. ६०० कार्यकर्ते आणि मुथ्था यांच्या कार्यालयातील ४० कर्मचारी तीन महिन्यांसाठी तेथे मुक्काम ठोकून काम करीत होते. ३२ वर्षांच्या अनुभवाचा येथे कस लागला होता. मशिनसाठी डिझेल मात्र गावकºयांनी द्यायचे ठरले होते; परंतु पैसे नसलेल्या गावांची यादी आमिरने दिली. तेथे डिझेलसह मशिनरी पुरविण्यात आली. संघटनेला यामध्ये एकूण साडेचार कोटींचा खर्च आला, तर एकूण खर्च ९ कोटी रुपयांचा झाला. निधी उभा करणे अवघड होते; परंतु आम्ही हे आव्हान जिद्दीने पूर्ण केले.