शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

व्यवस्थापनातूनच साधेल दुष्काळमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:14 IST

गेल्या ३२ वर्षांपासून भारतीय जैन संघटना समाजसेवा करीत आहे. चार वर्षांपूर्वी संघटनेच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये जलसंधारणाचे मोठे काम उभे करण्यात आले. पानी फाउंडेशनसोबत बीजेएसने काम करून, समाजसेवेचा आणखी एक आदर्श घालून दिला आहे.

गेल्या ३२ वर्षांपासून भारतीय जैन संघटना समाजसेवा करीत आहे. चार वर्षांपूर्वी संघटनेच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये जलसंधारणाचे मोठे काम उभे करण्यात आले. पानी फाउंडेशनसोबत बीजेएसने काम करून, समाजसेवेचा आणखी एक आदर्श घालून दिला आहे. ज्यांच्यासाठी काम केले, त्यांच्या चेहºयावरील समाधान कृतकृत्य करणारे आहे. व्यवस्थापन, साधनांची उपलब्धता आणि सेवाभावी वृत्तीमधून राज्य दुष्काळमुक्त होऊ शकेल. यापुढे राज्याची दुष्काळमुक्ती हेच आयुष्याचे ध्येय असल्याचे समाजब्रती शांतिलाल मुथ्था यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.भारतीय जैन संघटना (बीजेएस) १९९३ पासून सामाजिक कार्यात आहे. राज्यामध्ये ओला आणि सुका अशा दोन्ही स्वरूपाच्या विरोधाभासाला तोंड द्यावे लागते. या आपत्तींमध्ये बीजेएस नेहमीच धावून गेली आहे. राज्यामध्ये २०१३ मध्ये १९७२च्या दुष्काळानंतरचा सर्वांत मोठा दुष्काळ पडला होता. बीजेएसच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील सर्व तलावांमधील गाळ उपसण्यात आला. ११७ तलावांचे खोलीकरण करून, त्यामधील १ लाख क्युबिक मीटर गाळ डोंगराळ भागातील शेतीवर टाकण्यात आला. या कामाला आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील अभ्यासक, मंत्री, लोकप्रतिनिधींनी भेट दिली होती. त्याच्या परिणामस्वरूप तलावांमध्ये भरपूर पाणी जमा झालेले होते. जवळपास पाच हजार हेक्टर जमीन सुपीक झाली.याच काळात जनावरांच्या चाºयाचा प्रश्न भीषण बनला होता. बीजेएसने मराठवाडा आणि पुणे जिल्ह्यात तब्बल ३० छावण्या सुरू केल्या. विविध ठिकाणच्या पांजरपोळ संस्थांना सोबत घेण्यात आले. चारा उपलब्ध होईनासा झाल्यावर स्वत: खर्च करून मध्य प्रदेशातून दोन ट्रक भरून चारा आणून पुरवला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम झालेले हे देशातील पहिलेच उदाहरण होते. २०१५-१६ या काळात बीड, लातूर, उस्मानाबाद येथेही नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, गाळउपसा अशी कामे करण्यात आल्याचे मुथ्था यांनी सांगितले.ते म्हणाले की, २०१६ मध्ये माझे मित्र महावीर जैन भेटायला आले होते. त्यांनी दुष्काळमुक्तीवर बीजेएसच्या कामाची माहिती समजून घेतली. तेथूनच अभिनेता आमिर खानला फोन करून माहिती दिली. आमिर खान, सत्यजित भटकळ यांच्याशी लगेचच आॅगस्ट २०१६ मध्ये माझी बैठक झाली. त्यानंतर तीन ते पाच तासांच्या ७ बैठका झाल्या. त्यांनी बीजेएसच्या ३२ वर्षांच्या सेवा कार्याची माहिती घेतली. आमचा अनुभव, सोशल कनेक्ट, संपर्क समजून घेतला. ‘वॉटरकप’ ही संकल्पना समजून सांगितली. त्यांना ३ तालुक्यांवरून ३० तालुक्यांवर जायचे होते. त्यासाठीचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आम्ही केले.त्यांना दिलेल्या सूचना आवडल्या. त्या त्यांनी स्वीकारल्या. एकत्र काम करण्याविषयी चर्चा झाली; परंतु केवळ श्रमदान आणि प्रशिक्षणामधून परिणाम साधणे आणि दुष्काळमुक्ती शक्य नसल्याचे आमिरच्या लक्षात आणून दिल्यानंतर, त्याच्या पुढील काम करून देण्याची तयारी दर्शविण्यात आली. त्यासाठी संघटनेने जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर ट्रॉलीज पुरविण्याचे आव्हान स्वीकारले. ज्या गावांनी श्रमदानाचा टप्पा पार केला आहे, त्यांनाही मशिनरी पुरविण्यात येणार होती. प्रशिक्षण आणि दुष्काळमुक्ती यांच्यामधील तफावत दूर करण्यासाठी कामाला सुरुवात करण्यात आली; मात्र सर्व जेसीबी, पोकलेन शासकीय कामात व्यस्त होत्या, अनेकांनी दर वाढविले होते. या सर्व अडचणींवर मात करीत मशिनरी उपलब्ध करून घेण्यात आली. मेळघाटासाठी तर मध्य प्रदेशातून मशिनरी आणून पाच हजार जणांचे श्रमदान घडवून आणण्यात आले. कार्यकर्त्यांची फळी तयार करून, त्यांना जबाबदाºयांचे वाटप करण्यात आले होते. ६०० कार्यकर्ते आणि मुथ्था यांच्या कार्यालयातील ४० कर्मचारी तीन महिन्यांसाठी तेथे मुक्काम ठोकून काम करीत होते. ३२ वर्षांच्या अनुभवाचा येथे कस लागला होता. मशिनसाठी डिझेल मात्र गावकºयांनी द्यायचे ठरले होते; परंतु पैसे नसलेल्या गावांची यादी आमिरने दिली. तेथे डिझेलसह मशिनरी पुरविण्यात आली. संघटनेला यामध्ये एकूण साडेचार कोटींचा खर्च आला, तर एकूण खर्च ९ कोटी रुपयांचा झाला. निधी उभा करणे अवघड होते; परंतु आम्ही हे आव्हान जिद्दीने पूर्ण केले.