शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पारुंडेत विकासकामांवर मलमपट्टी

By admin | Updated: September 18, 2015 01:44 IST

तालुक्यातील श्रीक्षेत्र पारुंडे येथील कुंभमेळा चार दिवसांवर आला असून आता विकासकामांची ‘लगीनघाई ’ सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून शासनाचा निधी हळूहळू का होईना येत आहे.

- अतुल परदेशी,  जुन्नरतालुक्यातील श्रीक्षेत्र पारुंडे येथील कुंभमेळा चार दिवसांवर आला असून आता विकासकामांची ‘लगीनघाई ’ सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून शासनाचा निधी हळूहळू का होईना येत आहे. मात्र, प्रशासनाने अगदीच कुंभमेळा तोंडाशी आल्यावर घाईघाईने या कामांना सुरुवात केली आहे. मात्र त्याच्या दर्जाविषयी शंका उपस्थित होत असून मलमपट्टी सुरू असल्याचे स्थानिकांचे मत आहे. दर बारा वर्षांनी कुंभमेळा येत असेल, तर या कामांना आधी वेळ नव्हता की काय, असे अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत. या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य जनतेला मिळणार की नाही? याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जी.बी.पोहेकर यांना विचारले असता, सुरू असलेल्या कामांचा दर्जा चांगला असून जी अपूर्ण कामे आहेत ती २0 स्पटेंबरपर्र्यत पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले.आॅगस्टमध्ये जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पारुंडे गावास भेट दिली होती. सुरू असलेल्या व अपूर्ण असलेल्या कामांची पाहणी करून उर्वरित कामे सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या होत्या. त्या वेळी त्यांच्यासमवेत प्रांत कल्याण पांढरे, जिल्हा नियोजन अधिकारी, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, तहसीलदार पी. एन. हिरामणी, जुन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उपस्थित होते. मात्र, सप्टेंबर महिना अर्धा संपला असून, दोन दिवसांवर पारुंडे येथे कुंभमेळा येऊन ठेपला आहे. असे असताना अजूनही कामे पूर्ण झाली नाहीत. सध्या येथे कामाची नुसती धांदल चालली आहे. याकडे शासनाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष आहे की नाही? की नुसतेच काम करायचे म्हणून करायचे, असा फंडा येथे वापरला जातोय, असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत.अजूनही गावातील काही अंतर्गत रस्ते अपूर्ण असून, ज्या रस्त्याचे काम झाले आहे किंवा ब्रह्मनाथ मंदिरासमोरील मोकळ्या जागेत ज्या ठिकाणी साधू-संतांच्या राहण्यासाठी तंबू उभारण्यात येणार आहे त्या ठिकाणी करण्यात आलेले काँक्रीटीकरण मलमपट्टी लावल्यासारखे करण्यात आले आहे. त्याठिकाणच्या पूर्वीच्या फरशीवर व मातीवरच काँक्रीटीकरण करण्यात आले असल्याने कामाच्या दर्जाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष आहे.कामे वेळेत व दर्जेदार होणार का?रस्ते, सभामंडप, साधूनिवास, भोजनव्यवस्था, स्वयंपाक कक्ष, बंदिस्त गटार, नळ पाणीपुरवठा, परिसर सुशोभीकरण अशी अनेक कामे येथे सुरू असून, वास्तविक ती पूर्ण व्हायला हवी होती. पण आता यातील ठरावीक कामे सुरू असली, तरी बाकीच्या कामांचे काय? अंदाजे साडेपाच कोटी रुपये निधी येथे मंजूर झाला, पण त्याचा संपूर्ण उपयोग झाला की नाही, यात साशंकता व्यक्त होत आहे. याशिवाय सुमारे सव्वा कोटी रुपये निधी खासदार आढळराव-पाटील, आमदार नीलम गोऱ्हे, जिल्हा परिषद शिवसेना गटनेत्या आशा बुचके यांनी वेगवेगळ्या योजनांमधून उपलब्ध करून दिला आहे. जेवढा निधी आहे त्या स्वरूपात कामे मात्र दिसत नाहीत. अशा वेळी कुंभमेळा आहे तोपर्यंतच कामे होणार का? त्या कामांचा दर्जा उत्तम असणार का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.येथील विकासकामांबाबत प्रशासन गतिमान आहे. त्यांची कामे चांगली सुरू आहेत. मात्र स्थानिकांच्या गटबाजीमुळे ही कामे करण्यात अडथळे येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी येथील कामांबाबत चांगली भूमिका घेतली. मात्र येथील काही लोकांनी अडथळे आणल्याने कामांना उशीर होत आहे.-आशा बुचके, जिल्हा परिषद सदस्याजे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे, त्याला उशीर होण्यास ग्रामस्थांचा आडमुठेपणा कारणीभूत आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त ज्या कामांना उशीर झाला किंवा कामांच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्याला प्रशासन आणि ठेकेदारही तेवढेच जबाबदार आहेत.- जयेश पुंडे,उपसरपंच