शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
2
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
3
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
4
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
5
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
6
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
7
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
8
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
9
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
10
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
11
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
12
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
13
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
15
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
16
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
17
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
18
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
19
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
20
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!

साहित्यातून मुलांचे भावविश्व रेखाटावे

By admin | Updated: June 27, 2017 07:41 IST

मुलांमध्ये संस्कारांचे बीज रुजण्यासाठी चांगल्या दर्जाचे बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे, असे मत ल. म. कडू यांनी व्यक्त केले.

मुलांमध्ये संस्कारांचे बीज रुजण्यासाठी चांगल्या दर्जाचे बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे, असे मत ल. म. कडू यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘साहित्य हा माणसाच्या जीवनाचा पाया आहे. सध्याच्या काळात बालसाहित्य कमी होत आहे. मराठीमध्ये कुमारवाङ्मय मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्या तुलनेत बालसाहित्याचे प्रमाण कमी आहे. मुळात, लहान मुलांच्या साहित्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळेच सकस साहित्यनिर्मितीकडे काना डोळा केला जातो. मराठी बालसाहित्यापुढे इंग्रजीमधील साहित्याचे मोठे आव्हान ‘आ’वासून उभे आहे. पालकांवर इंग्रजी माध्यमाचा मोठा पगडा पाहायला मिळतो. इंग्रजी साहित्यावर ताशेरे ओढण्यापेक्षा राम गणेश गडकरी यांच्यासारख्या साहित्यिकांच्या साहित्यकृती इंग्रजीमध्ये का भाषांतरित होत नाहीत, याचा विचार करण्याची गरज आहे. हे साहित्य मुलांनी इंग्रजीतून वाचल्यावरही त्यांच्यावर साहित्याचे संस्कार होऊ शकतात. शिक्षणाचे माध्यम आणि भाषा वेगळी असली तरी संस्कृती टिकवून ठेवता येऊ शकते, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे इंग्रजी भाषा समृद्ध होईल आणि संस्कृतीही टिकेल.साहित्यामध्ये भाषा आणि रेषा हातात हात घालून चालतात. लहान मुलांचे साहित्य राक्षस, परिकथा यापुढे अभावानेच जाताना दिसतात. बालवयातील मुलांमध्ये रंग-रेषांची जागृती व्हावी यासाठी गमभन प्रकाशनातर्फे गेल्या १५ वर्षांपासून चित्रकला उपक्रम राबवले जातात तसेच दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. कोणत्याही कलेच्याबाबतीत बालवयामध्ये स्पर्धा नसावी, मुलांना कलेतून मुक्तपणे व्यक्त होता आले पाहिजे, असे मतही कडू यांनी व्यक्त केले. स्पर्धाविरहित प्रोत्साहन मुलांच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचे असते, असेही ते म्हणाले,लहान मुले अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे पालक नित्यनेमाने वाचन करीत असतील, तर मुलांवर आपोआपच वाचनसंस्कृतीचे संस्कार होतात. बऱ्याचदा, पालक केवळ मुलांना ‘तू टीव्ही पाहण्याऐवजी वाचन कर,’ असे सांगत जबाबदारी झटकतात आणि स्वत: टीव्हीतील कार्यक्रमांमध्ये रंगतात. मुलांवर पालकांनी वर्तनातून संस्कार करणे अपेक्षित असते. घरात वाचनाचे वातावरण असेल तर मुलांचा वाचनाची गोडी लागते. संस्कार घडवता येत नसतात, ते आपोआप घडतात. मुलांवर साहित्याचे संस्कार करण्याची संयुक्तिक जबाबदारी लेखक आणि प्रकाशकांचीही आहे. कोणते बालसाहित्य मुलांसाठी योग्य आहे, याचा लेखक, प्रकाशकांनी विचार करणे गरजेचे आहे. मागणी तसा पुरवठा, हे सूत्र न राबवता मुलांच्या मानसिकतेचा विचार व्हायला हवा. आजची पिढी बौद्धिकदृष्ट्या पुढे गेली आहे. ही पिढी एखाद्या गोष्टीची सत्यता तपासून पाहत असल्याने परिकथांमध्ये रमत नाही. कपोलकल्पित आणि रंजक लेखन काही काळ भावते आणि मग मुलांच्या मनात नानाविध प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे लहान मुलांसाठी लेखन करताना त्यांच्या जीवनाशी निगडित बाबींवर प्रकाश टाकला पाहिजे. लहान मूल हे संपूर्ण स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे त्यांना दरवेळी गृहित धरून चालणार नाही. बालसाहित्यातून मुलांचे भावविश्व रेखाटले गेले पाहिजे. आजूबाजूच्या प्रत्येक घटनेचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो. अशाच धरणग्रस्त गावातील मुलांचे भावविश्व साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘खारीच्या वाटा’ या पुस्तकातून चित्रित केल्याचे कडू यांनी सांगितले. मुलांना साहित्याचा आणि निसर्गाचा थेट अनुभव घेता यावा, यासाठी पानशेतला विद्याविहार निसर्गशाळा आयोजिली जाते. यातून मुलांना भातलागवड, नांगरणी आदींचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. त्यातूनच त्यांना प्रत्यक्ष आनंद मिळतो.