शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

स्वबळाच्या बेंडकुळ्यांबद्दल काँग्रेसमध्येच साशंकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : काँग्रेसचे नेते निवडणूकीसाठी स्वबळाचा आग्रह धरत असले तरी पक्षाच्या दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील स्थानिक पदाधिकारी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : काँग्रेसचे नेते निवडणूकीसाठी स्वबळाचा आग्रह धरत असले तरी पक्षाच्या दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र त्याबद्दल साशंक दिसत आहेत. नेत्यांनी उगीचच शक्तीचा देखावा करण्याआधी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करावी असा त्यांचा आग्रह आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढवेल असे वक्तव्य जाहीरपणे केले. त्यावरून सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस या घटक पक्षांमध्ये जोरदार धुरळा उडाला आहे. मात्र पटोलेंच्या वक्तव्याला काँग्रेस श्रेष्ठींचाच हिरवा कंदील असल्याचे सांगितले जाते. स्वबळाच्या चर्चेबाबत स्थानिक कार्यकर्त्यांचे मत मात्र वेगळे असून कॉंग्रेसच्या स्वबळाबाबत बहुसंख्यांना शंका आहे.

राज्यातील सरकारमध्ये काँग्रेस सहभागी असली तरी तिसऱ्या क्रमाकांवर आहे. अवघा एक खासदार आणि ४४ आमदार अशी कॉंग्रेसची राज्यातली स्थिती आहे. मोठ्या महापालिकांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नगण्य उरले आहे. पक्षाची नागरिकांशी नाळ तुटली आहे. ती पुन्हा जोडायची तर एकट्याने न चालता कोणाचा तरी हात धरूनच पुढे जायला हवे असे काहीजणांना वाटते.

पुण्यासारख्या बालेकिल्ल्यात पक्षाचा एकही आमदार नाही. सलग तीन वेळा खासदारकीला पराभव झाला. महापालिकेतील ८२ नगरसेवकांची संख्या २९ आणि आता तर फक्त ९ इतकीच उरली आहे. राज्यातील अन्य शहरातली स्थिती यापेक्षा वेगळी नाही, याकडे कॉंग्रेस कार्यकर्ते लक्ष वेधतात.

राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस आजही महाविकास आघाडीतील अन्य दोन्ही पक्षांपेक्षा मोठाच पक्ष आहे. त्याचा आधार घेत एकत्र राहूनही शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसला दबावात ठेवणे शक्य आहे. त्यासाठी नेत्यांनी ठाम राहावे असे अनेक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना वाटते. स्वबळावर लढण्यासारखी स्थिती आज नसल्याचे दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे.

चौकट

सेवादलासह अन्य ‘फ्रंटल’चे मत वेगळे

काँग्रेस सेवा दल तसेच महिला, युवक अशा विविध आघाड्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मात्र एकत्र राहून लढण्यात पक्ष म्हणून राजकीय नुकसान असल्याचे वाटते. पक्षाचा पाया वाढवायचा असेल तर स्वबळावर राहूनच नवी ओळख निर्माण करता येईल. त्यासाठी नेत्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी, गाड्याघोड्यावरुन फिरण्याची सवय बंद करावी असे त्यांना वाटते.