शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वबळाच्या बेंडकुळ्यांबद्दल काँग्रेसमध्येच साशंकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : काँग्रेसचे नेते निवडणूकीसाठी स्वबळाचा आग्रह धरत असले तरी पक्षाच्या दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील स्थानिक पदाधिकारी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : काँग्रेसचे नेते निवडणूकीसाठी स्वबळाचा आग्रह धरत असले तरी पक्षाच्या दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र त्याबद्दल साशंक दिसत आहेत. नेत्यांनी उगीचच शक्तीचा देखावा करण्याआधी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करावी असा त्यांचा आग्रह आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढवेल असे वक्तव्य जाहीरपणे केले. त्यावरून सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस या घटक पक्षांमध्ये जोरदार धुरळा उडाला आहे. मात्र पटोलेंच्या वक्तव्याला काँग्रेस श्रेष्ठींचाच हिरवा कंदील असल्याचे सांगितले जाते. स्वबळाच्या चर्चेबाबत स्थानिक कार्यकर्त्यांचे मत मात्र वेगळे असून कॉंग्रेसच्या स्वबळाबाबत बहुसंख्यांना शंका आहे.

राज्यातील सरकारमध्ये काँग्रेस सहभागी असली तरी तिसऱ्या क्रमाकांवर आहे. अवघा एक खासदार आणि ४४ आमदार अशी कॉंग्रेसची राज्यातली स्थिती आहे. मोठ्या महापालिकांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नगण्य उरले आहे. पक्षाची नागरिकांशी नाळ तुटली आहे. ती पुन्हा जोडायची तर एकट्याने न चालता कोणाचा तरी हात धरूनच पुढे जायला हवे असे काहीजणांना वाटते.

पुण्यासारख्या बालेकिल्ल्यात पक्षाचा एकही आमदार नाही. सलग तीन वेळा खासदारकीला पराभव झाला. महापालिकेतील ८२ नगरसेवकांची संख्या २९ आणि आता तर फक्त ९ इतकीच उरली आहे. राज्यातील अन्य शहरातली स्थिती यापेक्षा वेगळी नाही, याकडे कॉंग्रेस कार्यकर्ते लक्ष वेधतात.

राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस आजही महाविकास आघाडीतील अन्य दोन्ही पक्षांपेक्षा मोठाच पक्ष आहे. त्याचा आधार घेत एकत्र राहूनही शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसला दबावात ठेवणे शक्य आहे. त्यासाठी नेत्यांनी ठाम राहावे असे अनेक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना वाटते. स्वबळावर लढण्यासारखी स्थिती आज नसल्याचे दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे.

चौकट

सेवादलासह अन्य ‘फ्रंटल’चे मत वेगळे

काँग्रेस सेवा दल तसेच महिला, युवक अशा विविध आघाड्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मात्र एकत्र राहून लढण्यात पक्ष म्हणून राजकीय नुकसान असल्याचे वाटते. पक्षाचा पाया वाढवायचा असेल तर स्वबळावर राहूनच नवी ओळख निर्माण करता येईल. त्यासाठी नेत्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी, गाड्याघोड्यावरुन फिरण्याची सवय बंद करावी असे त्यांना वाटते.