शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू
2
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
3
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
4
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
5
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
6
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
7
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
8
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
9
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
10
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
11
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
12
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
13
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
14
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
15
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
16
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
18
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
19
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
20
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

डॉक्टरांवर विश्वास ठेवलाच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:11 IST

पुणे : “किमान गरजांसह जीवन जगता येते, ही शिकवण आपल्याला कोरोनाने दिली आहे. त्याचबरोबरीने आरोग्य किती महत्त्वाचे आहे ...

पुणे : “किमान गरजांसह जीवन जगता येते, ही शिकवण आपल्याला कोरोनाने दिली आहे. त्याचबरोबरीने आरोग्य किती महत्त्वाचे आहे याची जाणीवदेखील करून दिली. स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टरांनी रुग्णांना सेवा दिली. भविष्यात कोरोनासारखी महामारी पुन्हा उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे डॉक्टरांवर विश्वास ठेवलाच पाहिजे,” असे मत पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले.

‘लोकमत’च्या व्यासपीठावर प्रफुल्ल कोठारी यांच्या डायग्नोपेन सेंटर प्रस्तुत आणि डॉ. अनुज गजभिये यांचे हिरल आर्मीस आर्थोपेडिक क्लिनिक यांच्या विशेष सहयोगाने सोमवारी (दि. १५) ‘हेल्थ हार्मनी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कोरोनाकाळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, सध्याच्या परिस्थितीचा सामना कसा करावा, कुटुंबाचे आरोग्याचे बजेट कसे असावे यावर चर्चा करण्यात आली.

पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या बघून समाजात डॉक्टरांविषयी अनेक गैरसमज पसरविले गेले. डॉक्टर हा देखील समाजाचा घटक आहे याचा विसर पडून अनेकांनी डॉक्टरांना दोष दिला. हे योग्य नसून डॉक्टरांच्या उपचार पद्धतीवर आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला तर अनेक गोष्टी सोप्या होतील, याकडे लक्ष वेधण्यात आले.

डॉक्टरांचा सल्ला

- लसीकरणावर विश्वास ठेवावा.

- प्रत्येकाने लस घ्यावी.

- हेल्थ इन्शुरन्स ही काळाची गरज.

- आरोग्याचे बजेट असले पाहिजे.

- वृद्धांना मानसिक आधार दिला पाहिजे.

- मानसिक स्थैर्य महत्त्वाचे.

- उपचारावर झालेला खर्च वाया जातो, ही मानसिकता बदलण्याची गरज

- सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

कोट

“कोरोनामुळे आता प्रत्येक जण आरोग्याची काळजी घेत आहे. रोगाचे निदान होण्यासाठी पूर्व तपासण्या आवश्यक असतात. त्यासाठी सर्वसामान्यांना कमीत कमी खर्चात तपासण्या करता याव्यात हे मुख्य उद्दिष्ट आहे. आरोग्य चांगले असेल तर सर्व काही सुरळीत चालते. यासाठी जनजागृतीची गरज आहे.”

- प्रफुल्ल कोठारी, प्रमुख, डायग्नोपेन सेंटर

चौकट

“प्रत्येकाला स्वतःचे जीवन आरोग्यमयी असावे असे वाटते. त्यासाठी रोग जडू नयेत यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. रोग जडले तर डॉक्टरांच्या सल्ल्याने काळजी घेतली पाहिजे. आरोग्याला प्राधान्य देत बजेट ठरविणे ही काळाची गरज आहे. चांगल्या आरोग्यासाठी पैसे खर्च केला पाहिजे.”

-डॉ. अनुज गजभिये, प्रमुख, हिरल आर्मीस आर्थोपेडिक क्लिनिक.