शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
2
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
5
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
6
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
7
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
8
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
9
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
10
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
11
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
12
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
13
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
14
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
15
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
16
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
17
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
18
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

दहा दिवस व्हेंटिलेटरवर राहून डॉक्टरांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:10 IST

डॉ. अरूणकुमार पाटील : प्रबळ इच्छा रोगाला पळवू शकेल पुणे : रुग्णांवर उपचार करता करता डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाल्याची ...

डॉ. अरूणकुमार पाटील : प्रबळ इच्छा रोगाला पळवू शकेल

पुणे : रुग्णांवर उपचार करता करता डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाल्याची उदाहरणे आपण पाहत आहोत. भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमधील कार्डिअँक युनिट विभागात कार्यरत असलेले डॉ. अरुणकुमार पाटील यांनाही अशा संकटाचा सामना करावा लागला. गावाहून पुण्याला परत येत असताना औरंगाबादच्या दरम्यान बसमधील दोन प्रवाशांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. अशा वेळी डॉ. अरुणकुमार पाटील त्याच बसमधून प्रवास करत असल्याने त्यांनी दोन्ही रुग्णांना तपासले, औषधे दिली. त्यानंतर पुण्याला परत आल्यावर दोन-तीन दिवसांमध्ये त्यांना अस्वस्थ वाटू लागले, अशक्तपणा जाणवू लागला. ऑक्सिजनची पातळीही कमी झाली होती. पण ते यातून सहीसलामत बाहेर पडले.

ऑक्सिजनची पातळी खालावल्याने ते भारती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. दोन-तीन दिवसांनंतर त्यांची तब्येत खूपच खालावली आणि व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली. पुढील दहा दिवस अत्यंत कसोटीचे होते. डॉ. पाटील यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वच डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. फुफ्फुुसाला मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. डॉक्टर तब्बल दहा दिवस व्हेंटिलेटरवर होते. दहाव्या दिवशी ते शुद्धीवर आले. मात्र आपल्याला व्हेंटिलेटर लावून किती दिवस झाले आहेत, याची त्यांना कल्पना नव्हती. मी एक-दोन दिवस व्हेंटिलेटरवर होतो का, असे त्यांनी डॉक्टरांना विचारले असता, तुम्ही संपूर्ण दहा दिवस इंक्युबेशनमध्ये होतात, हे सांगितले. डॉ. पाटील यांची तब्येत हळूहळू सुधारू लागली. मात्र या काळात त्यांचे वजन तब्बल १५ किलोने कमी झाले होते, प्रचंड थकवा आला होता.

घरी आल्यानंतरही थकवा कायम होता. दोन पायऱ्या उतरल्या तरी दम लागत होता. कार्यक्षमता वाढावी या दृष्टीने डॉ. अरुणकुमार पाटील दर तासाला दहा मिनिटे चालण्याचा व्यायाम करत होते. असे करत करत हळूहळू त्यांनी आपली चालण्याची क्षमता वाढवली. पौष्टिक आहार, औषधोपचार, श्‍वासाचे व्यायाम, प्राणायाम या सर्वांचीही जोड होतीच; सुदैवाने घरातील इतर कोणालाही कोरोनाची लागण झाली नाही. कोरोना आजाराच्या रुपाने आपल्या समोर आला आहे आणि आपल्याला त्याच्याशी लढून जिंकायचं आहे, अशी प्रत्येकाच्या मनात प्रबळ इच्छा असेल तर या आजारातून नक्कीच बाहेर पडता येते, असा कानमंत्र डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.