शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

निवडणुका पुढे ढकलू नका, अन्यथा राज्य निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोना व इम्पेरिकल डेटाचे कारण पुढे करीत राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: कोरोना व इम्पेरिकल डेटाचे कारण पुढे करीत राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या तयारीत आहे. मात्र, कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना मुदतवाढ देता येत नाही. असे असताना राज्य सरकार मुदतवाढ देण्याच्या विचारात आहे. जर असे झाले तर आम्ही राज्य निवडणूक आयोगावर आम्ही खटला दाखल करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

भारतीय संविधान अनुच्छेद २४३ क आणि २४३ झ अ नुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली घेतल्या जातात. तसेच, २४३ इ नुसार त्यांना मुदतवाढ देता येत नाही. कॅबिनेट मंत्रिमंडळाला देखील तो अधिकार नाही. असे असताना राज्य सरकार निवडणुका पुढे ढकलण्याच्या विचारात आहे. तेव्हा आमचा त्यास विरोध असणार असून जर निवडणुका पुढे ढकलल्या तर आम्ही थेट राज्य निवडणूक आयोगावरच फौजदारी खटला दाखल करणार असल्याचे रेखा ठाकूर यांनी सांगितले. या वेळी सर्वोजित बनसोडे, ॲड. प्रियदर्शनी तेलंग, अनिल जाधव, मुनावर कुरेशी, आदी मान्यवर उपस्थित होते.

ओबीसी आरक्षणाबाबत वाद अयोग्य :

केंद्र सरकारने १९५० साली जातीनिहाय जनगणना न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंडळ आयोगाने ओबीसीची ५२ टक्के लोकसंख्या निश्चित करताना १९३१ सालचा जनगणनेचा आधार घेतला. ओबीसीची लोकसंख्या ५२ टक्के असली, तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ५० टक्केच्यावर आरक्षण देता येत नाही. त्यामुळेच मंडळ आयोगाने २७ टक्के आरक्षणाची तरतूद केली. कारण, एससी १५ टक्के व एसटी ७.५ टक्के आरक्षण आहे. एससी व एसटीचे आरक्षण वगळता उरलेल्या २७ टक्केच्या आरक्षणाची तरतूद केली आहे. १९९० साली संसदेत मंडल आयोगाच्या शिफारसीचा अंशतः अंमलबजावणीचा निर्णय झाला. २७ टक्केबाबत संसदेने मान्यता दिल्यानंतर आता याबाबत वारंवार वाद निर्माण करणे अयोग्य असल्याचे रेखा ठाकूर यांनी सांगितले.