शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

काँग्रेस कार्यकर्त्यांवर शहराध्यक्ष लादू नका

By admin | Updated: October 27, 2014 03:19 IST

लोकसभा व विधासनभा निवडणुकीमध्ये शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले

पुणे : लोकसभा व विधासनभा निवडणुकीमध्ये शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले असून, पराभवातून सावरणाऱ्या नेतृत्वाची काँग्रेसला आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांवर शहराध्यक्ष लादू नका, अशी एकत्रित मागणी ब्लॉक अध्यक्ष करणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतरही काँग्रेसची पडझड थांबलेली नाही. शहरातील काँग्रेसच्या दिग्गज आमदारांचा पराभव झाला. त्यामुळे शहरातील आठही जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. संपूर्ण शहर व जिल्ह्यातील एकूण २१ जागांपैकी केवळ भोरची जागा वगळता काँग्रेसच्या उमेदवारांचा सर्व ठिकाणी पराभव झाला आहे. तर १५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. शहरातील सहा ठिकाणी काँग्रेस उमेदवार स्पर्धेतही राहिले नाहीत. त्यामुळे आगामी महापालिकेच्या दृष्टीने काँग्रेस नेतृत्वाने धोक्यांची घंटा ओळखली पाहिजे. काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवून सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या सक्षम नेतृत्वाची गरज आहे. गेल्या ८ ते १० वर्षांपासून शहर काँग्रेसचे नेतृत्व अ‍ॅड. अभय छाजेड यांच्याकडे होते. त्या काळात काँग्रेसने भरभराटही पाहिली अन् आता ओहोटी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून छाजेड यांनी राजीनामा दिला. मात्र, कॉँग्रेस अडचणीच्या काळात असताना त्यांनी राजीनामा न देता नेतृत्वाचे कसब दाखविणे गरजेचे आहे, अशी ब्लॉक अध्यक्षांची भावना आहे. पंडित नेहरू स्टेडियमचे ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर म्हणाले, की पूर्वी लोकसभा, विधानसभा ते महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटप करताना ब्लॉक अध्यक्षांना विश्वासात घेतले जायचे. शहरातील आठ मतदारसंघांत १२ ब्लॉक अध्यक्ष ही काँग्रेसची खरी ताकद आहे. ती वाढविण्याचा प्रयत्न अभय छाजेड यांनी केला आहे. मे २०१५ ला लोकशाही मार्गाने निवडणुकी होईपर्यंत छाजेड यांनीच नेतृत्व केले पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर सर्व ब्लॉक अध्यक्षांची एकत्रित बैठक दोन दिवसांत होणार आहे. पर्वती ब्लॉकचे कार्याध्यक्ष सतीश पवार म्हणाले, काँग्रेसच्या पराभवातून कार्यकर्त्यांना सावरण्यासाठी मनोबल वाढविणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारे खंबीर व सक्षम नेतृत्वाची गरज आहे. (प्रतिनिधी)