शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

माऊलींच्या आजोळघर मुक्कामाला अडथळा

By admin | Updated: June 14, 2016 04:41 IST

गेल्या वर्षी माऊलींच्या आजोळघरी मुक्कामासाठी अडथळा ठरणारा जिना देवस्थानने लेखी आश्वासनानंतर अद्यापही काढला नसल्याने या वर्षीही माऊलींचे प्रस्थान विलंबानेच होणार का? असा प्रश्न

आळंदी : गेल्या वर्षी माऊलींच्या आजोळघरी मुक्कामासाठी अडथळा ठरणारा जिना देवस्थानने लेखी आश्वासनानंतर अद्यापही काढला नसल्याने या वर्षीही माऊलींचे प्रस्थान विलंबानेच होणार का? असा प्रश्न आता वारकरी विचारू लागले आहेत. ‘तो’ जिना हटवावा, या मागणीवर वारकरी संघटना ठाम असून, आता जिना हटविण्याची गरज राहिली नसल्याचे देवस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आजोळघराच्या जागी बांधण्यात आलेल्या नवीन दर्शनबारीच्या जिन्यामुळे पालखी मुक्कामास अडचण होत असल्याने तो हटवावा, या मागणीसाठी वारकरी संघटना, पालखी सोहळा मालक यांनी पालखी गतवर्षी दोन ते तीन तास उशिरा हलवली होती. या प्रकारामुळे देवस्थान व पालखी सोहळा मालक वारकरी संघटना यांमध्ये समन्वय नसल्याचे चव्हाट्यावर आले आहे. गतवर्षी जिना हलविण्याबाबत देवस्थानने लेखी आश्वासन दिल्यानंतरच पालखी हलविण्यात आली होती. मात्र, अद्यापही तो जिना हलविण्यात आलेला नाही. माऊलींच्या वैभवी पालखी प्रस्थान सोहळ्यास विलंब होणार नाही? समाज आरतीला प्रथा परंपरेने असलेल्या दिंड्या, वाढता समाज, वाढते सोहळ्याचे वैभव याचा विचार करून पहिल्या मुक्कामाचे ठिकाणी मध्येच जिना असल्याने जागा उपलब्ध व्हावी, याबाबत दक्षता घेऊन आळंदी देवस्थानाने तत्काळ खुलासा करावा, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)मुक्कामाच्या जागेत वाढ‘लोकमत’ने सदर जागेची पाहणी केली असता, देवस्थानकडून मुक्कामाच्या जागेत काहीअंशी वाढ करण्यात आली आहे. परंतु, अडसर ठरणारा जिना काढण्यात आलेला नाही. तत्कालीन गांधी वाड्यातील (आताची दर्शनबारी इमारत) विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचं छोटसं मंदिर अंदाजे दहा फूट दर्शन बारी मंडपात आत सरकविण्यात आले आहे. जिन्याला आडवी भिंत घालण्यात आली आहे. जिन्यापुढेच जागा वाढविण्यात आली आहे....असे आहे ‘जिना’ प्रकरण भाविकांच्या सोईसाठी प्रशस्त दर्शनबारीचे काम गांधी वाड्याच्या जागेत करण्यात आले असून, मुक्कामाच्या हॉलमध्ये मध्यभागी जिना उभारण्यात आला. यामुळे मुक्कामाला याचा अडथळा ठरत असल्याने गेल्या वर्षी माऊलींचा मुक्काम कुठे करायचा? असा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर चर्चा होऊन देवस्थानने लेखी आश्वासन देऊन तो हटविण्यात येईल, असे सांगितले होते. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ‘श्रीं’च्या वैभवी प्रस्थानाचा मार्ग मोकळा झाला होते. मात्र, उशिरा प्रस्थान होऊन नव्या इमारतीत पहिला मुक्काम झाला. जिना काढण्याची गरज नाहीगतवर्षी वारकरी, फडकरी, दिंडेकरी संघटनेने केलेली पालखी मुक्कामास जागा कमी पडत असल्याच्या मागणीची योग्य दखल घेऊन दर्शनबारीच्या बांधकामात काही बदल करण्यात आले. मुक्कामाच्या जागेवर समतोल भराव व काही बदल करून प्रशस्त जागा करण्यात आली आहे. जिना ज्या कारणासाठी काढला जावा, असा प्रश्न उद्भवला होता. ते कारणच बांधकामात बदल केल्याने राहिले नसून आता जिना हटविण्याची गरज राहिली नाही. संबंधित बदल हे सर्व मागणी करणाऱ्या संबंधित घटकांशी चर्चा करून करण्यात आले.- डॉ. अजित कुलकर्णी,प्रमुख विश्वस्त, संत ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटी, आळंदीश्रींचे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या आजोळघरीची जागा समाज आरतीचा समाज पाहता कमी पडत आहे. या सोयीसाठीचे कारण पुढे करून मागील वर्षी प्रस्थानला विलंब झाला. मात्र, आळंदी देवस्थानने दिलेल्या लेखी आश्वासनाचा जाब आणि खुलासा व्हावा, ही माफक अपेक्षा आहे. - बाळासाहेब आरफळकर संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचे मालक