शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कल्पनेच्या भराऱ्या नको

By admin | Updated: February 20, 2017 03:02 IST

इतिहासाचे लेखन करताना उगाच कल्पना आणि प्रतिभेचे पंख उडवू नयेत. लोकांना रूचणार नाही, अशा प्रकारे इतिहासात बदल केल्यास

पुणे : इतिहासाचे लेखन करताना उगाच कल्पना आणि प्रतिभेचे पंख उडवू नयेत. लोकांना रूचणार नाही, अशा प्रकारे इतिहासात बदल केल्यास संस्कृतीबद्दल वाद उद्भवू शकतात आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो, अशा शब्दात ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी लेखकांना टोला लगावला. वसंत वसंत लिमये यांच्या ‘विश्वस्त’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. साचेबद्द चौकटीमधील प्रकाशन सोहळ्याला बगल देत ‘बुक टे्रलर’ या अभिनव संकल्पनेच्या मांडणीतून या कादंबरीचा चित्तथरारक प्रवास रसिकांसमोर उलगडण्यात आला. रंगमंचावरील नेपथ्य, कार्यक्रमाला एका सूत्रात बांधणारा संचालक, चार अतिथीगण, नाट्यरूपांतर, अभिवाचन अशा रंजक सादरीकरणातून कादंबरीसह लेखकाच्या भावविश्वाचे विविधांगी पदर हळूवारपणे रसिकांसमोर उलगडले. सूत्रसंचालकाच्या भूमिकेतील सौमित्र ऊर्फ किशोर कदम हे पाहुण्यांशी संवाद साधत या कादंबरीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करीत होते. कवी संदीप खरे आणि भार्गवी चिरमुले यांनी अभिवाचनातून कादंबरीची उत्सुकता वाढवत नेली.देगलूरकर म्हणाले, ‘‘भाषासौष्ठव हे ‘विश्वस्त’ या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. मात्र काल्पनिक इतिहासाचे लेखन करताना उगाच कल्पना आणि प्रतिभेच्या भराऱ्या घेता कामा नयेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रतिभेच्या आधारावर साहित्याची निर्मिती केली जाते, हा गैरसमज आहे त्याला अभ्यासाची जोड हवी, असे संजय भास्कर जोशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)