शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कल्पनेच्या भराऱ्या नको

By admin | Updated: February 20, 2017 03:02 IST

इतिहासाचे लेखन करताना उगाच कल्पना आणि प्रतिभेचे पंख उडवू नयेत. लोकांना रूचणार नाही, अशा प्रकारे इतिहासात बदल केल्यास

पुणे : इतिहासाचे लेखन करताना उगाच कल्पना आणि प्रतिभेचे पंख उडवू नयेत. लोकांना रूचणार नाही, अशा प्रकारे इतिहासात बदल केल्यास संस्कृतीबद्दल वाद उद्भवू शकतात आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो, अशा शब्दात ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी लेखकांना टोला लगावला. वसंत वसंत लिमये यांच्या ‘विश्वस्त’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. साचेबद्द चौकटीमधील प्रकाशन सोहळ्याला बगल देत ‘बुक टे्रलर’ या अभिनव संकल्पनेच्या मांडणीतून या कादंबरीचा चित्तथरारक प्रवास रसिकांसमोर उलगडण्यात आला. रंगमंचावरील नेपथ्य, कार्यक्रमाला एका सूत्रात बांधणारा संचालक, चार अतिथीगण, नाट्यरूपांतर, अभिवाचन अशा रंजक सादरीकरणातून कादंबरीसह लेखकाच्या भावविश्वाचे विविधांगी पदर हळूवारपणे रसिकांसमोर उलगडले. सूत्रसंचालकाच्या भूमिकेतील सौमित्र ऊर्फ किशोर कदम हे पाहुण्यांशी संवाद साधत या कादंबरीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करीत होते. कवी संदीप खरे आणि भार्गवी चिरमुले यांनी अभिवाचनातून कादंबरीची उत्सुकता वाढवत नेली.देगलूरकर म्हणाले, ‘‘भाषासौष्ठव हे ‘विश्वस्त’ या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. मात्र काल्पनिक इतिहासाचे लेखन करताना उगाच कल्पना आणि प्रतिभेच्या भराऱ्या घेता कामा नयेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रतिभेच्या आधारावर साहित्याची निर्मिती केली जाते, हा गैरसमज आहे त्याला अभ्यासाची जोड हवी, असे संजय भास्कर जोशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)