शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

असा करा मुलांचा बौद्धिक विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:14 IST

त्यामुळे दुसऱ्या वर्षापासून मुलांसमोर आपले आचरण कसे आहे त्यावर मुलाच्या भावनिक आणि बौद्धिक विकासाची जडण-घडण होत असते. त्यासाठी त्यांनी ...

त्यामुळे दुसऱ्या वर्षापासून मुलांसमोर आपले आचरण कसे आहे त्यावर मुलाच्या भावनिक आणि बौद्धिक विकासाची जडण-घडण होत असते. त्यासाठी त्यांनी काढलेली चित्रे, चांगले संभाषण, आदी गोष्टींबाबत मुलांना पालकांनी प्रोत्साहन देणे खूप गरजचे असते, मुलांकडून एखादी चूक झाली तर त्याची शिक्षा देताना मारणे किंवा ती मुले अगदी बिघडली आहेत असे वर्तन न करता त्यांना त्यांची चूक झाली हे लक्षात आणून देणं महत्वाचे आहे. जेणे करून तशी चूक त्यांच्याकडून पुन्हा होणार नाही उदा. मुलांनी काही अपशब्द वापरले तर त्याला मारण्यापेक्षा समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. मुलांना केवळ शाळेतील अभ्यास घेण्यापेक्षा बाहेरच्या जगाचे ज्ञान गोष्टीच्या माध्यमातून, पर्यटनाच्या माध्यमातून देणे आश्यक आहे. त्यासाठी त्यांना बागबगीच्या आदी ठिकाणी घेऊन जाणे, तेथील विविध झाडे, पक्षी यांची ओळख करून देणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या भाषेच्या विकासासाठी त्यांच्याबरोबर सारख्या गप्पा मारणे, पेपर मोठ्याने वाचताना एखादी बातमी किंवा बोधकथा सांगणे अशातून मुलांची शब्द संपत्ती वाढते. त्यांच्याबरोबर विनोद शेअर करणे हेही महत्त्वाचे व शब्दसंपत्तीसाठी पोषक ठरेल. त्यांना रंगांची ओळख करून देताना केवळ रंग दाखविणे महत्त्वाचे नाही तर त्यांना प्रत्यक्ष चित्र काढायला लावणे महत्वाचे.

दोन-तीन वर्षांच्या मुलांमध्ये प्रत्येक गोष्टीची उत्सुकता कमालीची असते. त्याची प्रशंसा करणे महत्त्वाचे ठरते. त्यांचे आरोग्य व्यवस्थित असेल की त्यांचा भावनिक व बौद्धिक विकासही छान होतो. त्यासाठी त्यांना पोषक आणि सकस आहार महत्त्वाचा आहे. या वयात अनेक मुले काही वेळेस कमी खातात मात्र त्यामुळे त्यांच्यावर जबरदस्ती न करता त्यांना दोन-तीन तासांनी सारखे थोडे थोडे खायला देणे महत्त्वाचे आहे.

सध्या इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट वापरणे अनिवार्य असले तरी त्यांच्या वापराची मर्यादा ठेवा आणि प्रत्यक्ष संवाद ठेवणे महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा. विभक्त कुटुंब पद्धतीत राहत असलात तरी त्यांना आजी-आजोबा नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्यात राहण्याची त्यांच्याशी बोलण्याची व ते नाते छान जपण्याची सवय लावा, एकटेपणापेक्षा माणसांची सवय असणे हे मानसिक व बौद्धिक विकासासाठी महत्त्वाचे ठरते.

--

डॉ. स्नेहल राज्यगुरू