शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

हृदयविकारग्रस्तांना लसीकरणाबाबत वाटतेय शंका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:09 IST

------------- कोरोना महामारीच्या काळात साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. लस हे व्हायरसविरुद्ध लढण्याचे शस्त्र ...

-------------

कोरोना महामारीच्या काळात साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. लस हे व्हायरसविरुद्ध लढण्याचे शस्त्र आहे असे म्हणायला हरकत नाही. तसेच, प्रत्येकाने मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे आणि वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. कोविड-१९चा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. प्रकरणांमध्ये भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासनाच्या वतीने विविध टप्प्यांवर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिक, तसेच कोमॉर्बिड व्यक्तींचे लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.

हृदयरोगी, तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांनी ग्रासलेल्या व्यक्तींनी लसीकरण करावे की नाही, याबाबत अजूनही शंका दिसून येतात. अनेकांना याबाबत अनेक शंका असून केवळ अफवांवर विश्वास ठेवणे टाळावे. कोविड लस ही हृदयविकाराच्या रुग्णांसाठी सुरक्षित आहे. हृदयविकार व स्ट्रोक असलेल्या लोकांनी ही लस घ्यावी व कोविड-१९ ला प्रतिबंध करावे असे आवाहन केले जात आहे. कोविड-१९मुळे –हृदयविकाराच्या रुग्णांना गुंतागुंत होण्याचा धोका अधिक जास्त असतो. म्हणून वेळीच लसीकरण केल्यास तीव्र गुंतागुत टाळणे शक्य होते. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखीमचे घटक, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आदी समस्या असलेल्या व्यक्तींनी देखील लसीकरण करणे आवश्यक आहे. लसीकरणाचे सामान्य दुष्परिणाम म्हणजे वेदना, ताप येणे किंवा मळमळ होणे असे आहेत. हृदयरोग्यांनादेखील हेच दुष्परिणाम जाणवतील. ही लक्षणे २ दिवसांपर्यंत टिकू शकतात. तर त्यामुळे घाबरून जाऊ नका. ज्या रुग्णांची नुकतीच बायपास शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनी मात्र कमीतकमी महिनाभर थांबणे आवश्यक आहे.

लसीकरणानंतर आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे आणि हातांची स्वच्छता कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. शिवाय खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर रुमाल धरावा. आजारी व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळावे. कोविड १९ ला दूर ठेवण्यासाठी हृदयरोग्यांनी त्यांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. घरच्या घरी व्यायाम करणे, ताजी फळे, भाज्या, शेंगदाणे, सर्व प्रकारची धान्य आणि डाळी यांचे सेवन करणे आवश्यक आहे. प्रक्रिया केलेले पदार्थ, मसालेदार, तेलकट आणि जंक फूड यांचे सेवन टाळा. योग आणि ध्यान करून तणावमुक्त रहा.

- - डॉ. बिपीनचंद्र भाम