शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग बांधवांनी मंजुरीसाठी दिलेली प्रकरणे हरवली, मोर्चा काढण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST

आंबेगाव तालुक्यात ३५०० दिव्यांग असून २७४३ दिव्यांग संजय गांधी योजनेचा लाभ घेतात. या योजनेतून ८०० रु. ते १००० ...

आंबेगाव तालुक्यात ३५०० दिव्यांग असून २७४३ दिव्यांग संजय गांधी योजनेचा लाभ घेतात. या योजनेतून ८०० रु. ते १००० रु. मानधन मिळते. अडचणीच्या काळात या योजनेचा खूप मोठा आधार दिव्यांग बांधवांना होतो. अलीकडच्या काळात या योजनेकडे तहसीलदार तसेच अधिकारी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या कार्यालयात दिव्यांग बांधवांनी मंजुरीसाठी दिलेली प्रकरणे हरवली आहेत. शोध घेऊनही ती सापडत नाहीत. सहा ते आठ महिन्यांपासून मंजूर झालेली प्रकरणे पत्रांअभावी धूळ खात पडून आहेत. तलाठी यांजकडे पोच करण्यास दिलेली संजय गांधी योजनेची पत्रे तलाठी सांगूनही घेऊन जात नाहीत. नवीन प्रकरणे मंजूर होऊनसुद्धा ६ महिन्यांपासून काही दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यात पेन्शनचे पैसे आजपर्यंत जमाच केलेले नाहीत. तसेच काही विधवा निराधार योजनेच्या खात्यावर १०० रू प्रतिमहिना एवढी अल्प रक्कम जमा केली जाते. तसेच इतर जिल्ह्यांतील सर्व दिव्यांग बांधवांना सरसकट १००० रू. पेन्शन सुरू झालेली असतानाही याच तालुक्यातील दिव्यांग बांधवांना या लाभापासून वंचित ठेवले गेले आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांत या योजनेचा १०० टक्के लाभ दिला जातोय. तहसीलदार यांच्या निदर्शनास या सर्व गोष्टी आणून देखील त्यांच्या दुर्लक्षपणामुळे आंबेगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींवर अन्याय होत आहे. यासंबंधी तहसीलदार मॅडम भेटू देत नाही. फोन केल्यावर फोन घेत नाहीत. मेसेज केल्यावर संबंधित अधिकारी यांचा नंबर दिला जातो. संबंधित अधिकारी यांना फोन केला असता फोन बंद केलेला असतो. येणाऱ्या आठवड्यांत दिव्यांग संघटना जिल्हाधिकारी यांजकडे यासंबंधी तक्रार दाखल करणार असून, तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आंदोलन करणार आहेत, असा इशारा दिव्यांग संघटना व सेवा संस्था यांच्या वतीने समीर टावरे, सुनील दरेकर, ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिला आहे.

यासंदर्भात तहसीलदार रमा जोशी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.