शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

चार सदस्यांचाच प्रभाग

By admin | Updated: May 28, 2016 04:29 IST

राज्य सरकारने अखेर महापालिकांसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यासाठीचा अध्यादेश शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्ध झाला; मात्र तो १९ मे रोजीचा

पुणे : राज्य सरकारने अखेर महापालिकांसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यासाठीचा अध्यादेश शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्ध झाला; मात्र तो १९ मे रोजीचा असून नगरपालिकांसंबंधीचा आहे व महापालिकांचा निर्णय अजून झालेलाच नाही, असे राजकीय तसेच पालिकेच्या प्रशासकीय वर्तुळातूनही रात्री उशिरापर्यंत सांगण्यात येत होते.प्रसिद्ध झालेल्या राजपत्रातील प्रकरण २ मध्ये महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या बाबतीत प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर चार पालिका सदस्य, परंतु तीनपेक्षा कमी नाहीत व पाचपेक्षा अधिक नाहीत एवढे पालिका सदस्य निवडून देण्यात येतील, असे स्पष्ट म्हटले आहे. त्याचबरोबर, प्रत्येक मतदाराला त्याच्या प्रभागातील निवडून द्यायच्या पालिका सदस्यांच्या संख्येइतकी मते देण्याचा हक्क असेल, असेही नमूद करण्यात आले आहे. या अध्यादेशाची पुढील प्रकरणे नगरपालिकांमध्ये अध्यक्ष थेट मतदारांमधून निवडून देण्याच्या बदलासंबंधीची आहेत. हा अध्यादेश अद्याप मिळालेला नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मंत्रिमंडळाने नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये बदल केला आहे. महापालिका प्रभाग सदस्यसंख्येतील बदलाला मात्र अद्याप मान्यता दिलेली नाही, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, प्रसिद्ध झालेल्या राजपत्रातून तरी महापालिकांच्या प्रभागसंख्येतही बदल केला असल्याचे स्पष्ट होते. महापालिकेचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी, संबंधित अध्यादेश प्रशासनाला अद्याप मिळालेला नसल्याचे सांगितले. पूर्ण अध्यादेश पाहिल्यानंतरच काय ते नक्की सांगता येईल, असे ते म्हणाले. राजकीय वर्तुळातही असा काही निर्णय झाला याबाबत अनभिज्ञता होती. अद्याप निर्णय झालेला नाही, येत्या मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा आहे. त्यानंतरच अध्यादेश जारी होईल, असे सांगण्यात येत होते. दरम्यान असा काही निर्णय राज्य सरकारने घेतलाच, तर त्याविरोधात थेट न्यायालयात दाद मागण्याचा इशारा भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. त्याशिवाय, राज्य सरकारचा मित्र पक्ष असलेल्या रामदास आठवलेप्रणीत रिपब्लिकन पक्षानेही चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीला विरोध केला आहे. (प्रतिनिधी) पुण्यात ३८ प्रभाग होण्याची शक्यतापुढील वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील १० महापालिकांची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तीत वर्चस्व मिळविण्याच्या दृष्टीने भाजपा सरकारने हा राजकीय निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळाच्या उपसमितीने बहुसदस्यीय प्रभाग करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली होती; मात्र अंतिम निर्णय झालेला नव्हता. आता तसे राजपत्रच प्रसिद्ध झाल्यामुळे पुण्यासह सर्वच पालिकांमध्ये ४ ते ५ सदस्यांचा एक प्रभाग राहणार, हे निश्चित झाले आहे. पुण्यात सध्या दोन सदस्यांचा एक प्रभाग आहे. आता प्रभागरचना नव्याने होऊन साधारण ८० ते ९० हजार मतदारांचा एक प्रभाग व त्यात चार सदस्य, असे साधारण ३८ प्रभाग होण्याची शक्यता आहे.