शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

साठ हजार मतदारांचा होणार प्रभाग

By admin | Updated: June 14, 2016 04:42 IST

महापालिका निवडणुकीत प्रभाग चार वॉर्डांचा झाल्याने एका प्रभागात सुमारे ६० हजार मतदार असतील. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांना कसरत करावी लागणार असून, त्यासाठी

पिंपरी : महापालिका निवडणुकीत प्रभाग चार वॉर्डांचा झाल्याने एका प्रभागात सुमारे ६० हजार मतदार असतील. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांना कसरत करावी लागणार असून, त्यासाठी आतापासूनच नियोजन केले जात आहे. चार वॉर्डांच्या प्रभागामुळे महापालिकेची निवडणूक मिनी विधानसभा झाली आहे. राज्य शासनाने महापालिका निवडणुकांसाठी चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. सध्या दोन वॉर्डचा एक प्रभाग आहे. त्यामुळे चार वॉर्डांचा एक प्रभाग करताना मोठ्या प्रमाणात प्रभाग रचनेमध्ये बदल होणार आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेत ३२ प्रभाग होण्याची शक्यता आहे. प्रभागरचना जाहीर केल्यानंतर ती नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर नागरिकांना सूचना, हरकती नोंदविता येतील. निवडणूक विभागाकडून सध्या मतदारनोंदणीवर भर देण्यात आला आहे. अधिकाधिक मतदारनोंदणी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या सूचनेनुसार कामकाज केले जाणार आहे. प्रभागरचनेचे कामकाज १ सप्टेंबरला सुरू होईल. निवडणूक आयोगामार्फत मतदारनोंदणी अभियान आणि मतदारयादी अद्ययावतीकरणाबाबत काही निर्देश दिले आहेत. मतदारयादीमध्ये नाव चुकणे, पत्ता चुकीचा असणे, मतदारयादीत संबंधित मतदाराऐवजी दुसऱ्याचा फोटो असणे, दुबार नावे याबाबत तक्रारी असतात. त्यामुळे मतदारयादी अद्ययावत करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नवमतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शहरातील प्रत्येक महाविद्यालयात मतदारनोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हे अभियान राबविले जाणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठकही बोलाविण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार चालू शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मतदारनोंदणीसाठी जुलैपासून कॉलेजांमध्ये हे मतदारनोंदणी अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)चार वॉर्डांच्या प्रभागात प्रचारादरम्यान मतदारांपर्यंत पोहोचताना कसरत करावी लागणार आहे. तसेच निवडून येण्यासाठी मोठी ताकतही लावावी लागणार आहे. सध्या एका प्रभागामध्ये दोन नगरसेवक असल्याने विकास कामाला उशीर होत आहे. नेमकं उद्घाटन कोणी करायचे? या प्रश्नावरूनच वादंग उटत आहे. एका नगरसेवकाने काम केले तर दुसरा नगरसेवक कामास अडथळा आणत आहे. त्याचा परिणाम विकासकामावर झाला आहे. आता याच ठिकाणी चार नगरसेवक झाल्यानंतर विकास कामे कशी होणार असा प्रश्न विचारला जात आहे.