शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

साठ हजार मतदारांचा होणार प्रभाग

By admin | Updated: June 14, 2016 04:42 IST

महापालिका निवडणुकीत प्रभाग चार वॉर्डांचा झाल्याने एका प्रभागात सुमारे ६० हजार मतदार असतील. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांना कसरत करावी लागणार असून, त्यासाठी

पिंपरी : महापालिका निवडणुकीत प्रभाग चार वॉर्डांचा झाल्याने एका प्रभागात सुमारे ६० हजार मतदार असतील. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांना कसरत करावी लागणार असून, त्यासाठी आतापासूनच नियोजन केले जात आहे. चार वॉर्डांच्या प्रभागामुळे महापालिकेची निवडणूक मिनी विधानसभा झाली आहे. राज्य शासनाने महापालिका निवडणुकांसाठी चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. सध्या दोन वॉर्डचा एक प्रभाग आहे. त्यामुळे चार वॉर्डांचा एक प्रभाग करताना मोठ्या प्रमाणात प्रभाग रचनेमध्ये बदल होणार आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेत ३२ प्रभाग होण्याची शक्यता आहे. प्रभागरचना जाहीर केल्यानंतर ती नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर नागरिकांना सूचना, हरकती नोंदविता येतील. निवडणूक विभागाकडून सध्या मतदारनोंदणीवर भर देण्यात आला आहे. अधिकाधिक मतदारनोंदणी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या सूचनेनुसार कामकाज केले जाणार आहे. प्रभागरचनेचे कामकाज १ सप्टेंबरला सुरू होईल. निवडणूक आयोगामार्फत मतदारनोंदणी अभियान आणि मतदारयादी अद्ययावतीकरणाबाबत काही निर्देश दिले आहेत. मतदारयादीमध्ये नाव चुकणे, पत्ता चुकीचा असणे, मतदारयादीत संबंधित मतदाराऐवजी दुसऱ्याचा फोटो असणे, दुबार नावे याबाबत तक्रारी असतात. त्यामुळे मतदारयादी अद्ययावत करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नवमतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शहरातील प्रत्येक महाविद्यालयात मतदारनोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हे अभियान राबविले जाणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठकही बोलाविण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार चालू शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मतदारनोंदणीसाठी जुलैपासून कॉलेजांमध्ये हे मतदारनोंदणी अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)चार वॉर्डांच्या प्रभागात प्रचारादरम्यान मतदारांपर्यंत पोहोचताना कसरत करावी लागणार आहे. तसेच निवडून येण्यासाठी मोठी ताकतही लावावी लागणार आहे. सध्या एका प्रभागामध्ये दोन नगरसेवक असल्याने विकास कामाला उशीर होत आहे. नेमकं उद्घाटन कोणी करायचे? या प्रश्नावरूनच वादंग उटत आहे. एका नगरसेवकाने काम केले तर दुसरा नगरसेवक कामास अडथळा आणत आहे. त्याचा परिणाम विकासकामावर झाला आहे. आता याच ठिकाणी चार नगरसेवक झाल्यानंतर विकास कामे कशी होणार असा प्रश्न विचारला जात आहे.