शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

साठ हजार मतदारांचा होणार प्रभाग

By admin | Updated: June 14, 2016 04:42 IST

महापालिका निवडणुकीत प्रभाग चार वॉर्डांचा झाल्याने एका प्रभागात सुमारे ६० हजार मतदार असतील. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांना कसरत करावी लागणार असून, त्यासाठी

पिंपरी : महापालिका निवडणुकीत प्रभाग चार वॉर्डांचा झाल्याने एका प्रभागात सुमारे ६० हजार मतदार असतील. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांना कसरत करावी लागणार असून, त्यासाठी आतापासूनच नियोजन केले जात आहे. चार वॉर्डांच्या प्रभागामुळे महापालिकेची निवडणूक मिनी विधानसभा झाली आहे. राज्य शासनाने महापालिका निवडणुकांसाठी चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. सध्या दोन वॉर्डचा एक प्रभाग आहे. त्यामुळे चार वॉर्डांचा एक प्रभाग करताना मोठ्या प्रमाणात प्रभाग रचनेमध्ये बदल होणार आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेत ३२ प्रभाग होण्याची शक्यता आहे. प्रभागरचना जाहीर केल्यानंतर ती नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर नागरिकांना सूचना, हरकती नोंदविता येतील. निवडणूक विभागाकडून सध्या मतदारनोंदणीवर भर देण्यात आला आहे. अधिकाधिक मतदारनोंदणी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या सूचनेनुसार कामकाज केले जाणार आहे. प्रभागरचनेचे कामकाज १ सप्टेंबरला सुरू होईल. निवडणूक आयोगामार्फत मतदारनोंदणी अभियान आणि मतदारयादी अद्ययावतीकरणाबाबत काही निर्देश दिले आहेत. मतदारयादीमध्ये नाव चुकणे, पत्ता चुकीचा असणे, मतदारयादीत संबंधित मतदाराऐवजी दुसऱ्याचा फोटो असणे, दुबार नावे याबाबत तक्रारी असतात. त्यामुळे मतदारयादी अद्ययावत करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नवमतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शहरातील प्रत्येक महाविद्यालयात मतदारनोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हे अभियान राबविले जाणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठकही बोलाविण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार चालू शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मतदारनोंदणीसाठी जुलैपासून कॉलेजांमध्ये हे मतदारनोंदणी अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)चार वॉर्डांच्या प्रभागात प्रचारादरम्यान मतदारांपर्यंत पोहोचताना कसरत करावी लागणार आहे. तसेच निवडून येण्यासाठी मोठी ताकतही लावावी लागणार आहे. सध्या एका प्रभागामध्ये दोन नगरसेवक असल्याने विकास कामाला उशीर होत आहे. नेमकं उद्घाटन कोणी करायचे? या प्रश्नावरूनच वादंग उटत आहे. एका नगरसेवकाने काम केले तर दुसरा नगरसेवक कामास अडथळा आणत आहे. त्याचा परिणाम विकासकामावर झाला आहे. आता याच ठिकाणी चार नगरसेवक झाल्यानंतर विकास कामे कशी होणार असा प्रश्न विचारला जात आहे.