शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळा अंधारात

By admin | Updated: March 31, 2017 23:51 IST

भारताची डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असताना देशाचे भवितव्य घडविणाऱ्या सामान्यांची जिल्हा परिषद

भिगवण : भारताची डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असताना देशाचे भवितव्य घडविणाऱ्या सामान्यांची जिल्हा परिषद शाळांची वीज महावितरण कंपनीने कापल्यामुळे जिल्हा परिषद शाळा अंधारात गेल्या असल्याचे इंदापूर तालुक्यात दिसून येत आहे. वीज कापल्यामुळे ई-लर्निंग, कॉम्प्युटर लॅब तसेच पाण्यासाठी बसविण्यात आलेले आरो सिस्टीमही बंद पडली आहेत.शाळेत शिकणारी पिढी हे देशाचे उज्ज्वल भविष्य मानले जाते. सामान्य नागरिकांना खासगी शाळेचे शुल्क परवडणारे नसल्याने आपली मुले जिल्हा परिषद शाळेत घालतात. त्याच जिल्हा परिषद शाळांची वीज महावितरण कंपनीने थकबाकी असल्याचे कारण सांगत बंद केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. भिगवण केंद्रातील १२ पैकी ९ शाळांची वीज थकबाकीमुळे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी शिकविली जाणारी ई- लर्निंग तसेच कॉम्प्युटर सिस्टीम बंद पडली आहे. याकडे जिल्हा परिषदेने लक्ष देण्याची गरज असताना कोणताही अधिकारी अथवा जिल्हा परिषद सदस्यही लक्ष देताना दिसून येत नाही. एकतर खासगी शाळांच्या तोडीस तोड देण्यासाठी शाळांना उच्च दर्जाचे साहित्य व शिक्षण देणे गरजेचे असताना रोटरी क्लब आणि लोकसहभागातून मिळालेल्या ई- लर्निंग आणि कॉम्प्युटर वीज तोडल्याने बंद अवस्थेत आहेत. रोटरीच्या माध्यमातून मुलांना स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे या उद्देशाने बसविण्यात आलेले आरओही वीज कापल्यामुळे बंद पडले आहेत.सध्या सूर्य आग ओकत असताना आणि उष्णतेचे नवनवीन विक्रम होत असताना याच दिवसात वीज तोडल्याने विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात शिजून निघत आहे. वीजबिल थकण्यासाठी शाळा प्रशासन जसे जबाबदार आहे तसेच वीज वितरण कंपनीही जबाबबदार आहे. कारण शाळांना कमर्शियल पद्धतीने बिल आकारले जात असल्यामुळे ते जास्तीचे बिल भरताना शाळांच्या नाकीनऊ येते. शाळांचे वीजबिल जिल्हा परिषदने भरण्याची आवश्यकता असताना याविषयी कोणताही निर्णय घेतला जात नाही. तसेच पाठीमागे प्रत्येक शिक्षकाचे पगाराच्या ४ टक्के एवढा सादील खर्च देण्यात येत होता. त्यातून हे वीज बिल भरले जात होते. तो सादील खर्च अचानक बंद केल्याने वीजबिल थकले. काही शाळा लोकसहभागातून वीजबिल भरत आहेत.(वार्ताहर)शाळेतील संच पडले बंदजिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख नानासाहेब दराडे यांनी केंद्रातील १२पैकी ९ शाळांची वीज महावितरणने कापल्याचे सांगितले. तसेच महावितरण शाळांना घरगुती ऐवजी कमर्शियल वीजबिल आकारत असल्याने थकबाकी वाढत असल्याचे सांगितले. तसेच ९ शाळांपैकी ६ शाळांचे ई-लर्निंग आणि कॉम्प्युटर बंद असल्याने त्याचा मोठा परिणाम होत असल्याचे सांगितले.शाळांना दिल्या जाणाऱ्या देखभाल दुरुस्ती खर्चातून आणि लोक सहभागातून सध्या शाळांनी वीजबिल भरावे, असे सांगितले. तसेच जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना याबाबत कळवले असून लवकरच याबाबत ठोस निर्णय घेतला जाणार आहे.- चंद्रकात उगले,गटशिक्षणाधिकारी