शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात

By admin | Updated: May 4, 2015 03:18 IST

एप्रिल महिन्यापर्यंत वाट पहायला लावणारा फळांचा राजा अखेर सर्वसामान्य पुणकरांच्या अवाक्यात आला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये मागील आठवड्याच्या

पुणे : एप्रिल महिन्यापर्यंत वाट पहायला लावणारा फळांचा राजा अखेर सर्वसामान्य पुणकरांच्या अवाक्यात आला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत रविवारी पेटीमागे ४०० ते ५०० रुपयांची घसरण झाली. हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला असल्याची माहिती व्यापारी युवराज काची यांनी रविवारी दिली. याबाबत माहिती देताना फळांचे व्यापारी युवराज काची म्हणाले, ‘‘रत्नागिरी हापूसची आवक वाढत आहे. शिवाय ग्राहकांची प्रमुख मागणी असलेला तयार आंबा बऱ्यापैकी उपलब्ध होत आहे. गेल्या आठवड्यामध्ये दोन ते अडीच हजार पेट्यांची आवक झाली होती. आता रोजची आवक ५ हजार पेट्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच दरात घसरण झाली.’’दुसरीकडे कर्नाटक आंब्याची दैनंदिन आवकही ३५ ते ४० हजार पेटी आणि ७ हजार करंडी इतकी होत आहे. यामुळे कर्नाटक हापूसचे दर कमी झाल आहेत. ‘‘कर्नाटक हापूसच्या ३ ते ५ डझन पेटीस ६०० ते १२००, ३ ते ५ डझन पायरीला ५०० ते ८००, अडीच डझनाच्या पायरी करंडीस १५० ते २२०, ३ डझन लालबाग करंडीस १०० ते १५०, तर महाराष्ट्र केसरला प्रति किलो ४० ते ५० रुपये भाव आहे,’’ अशी माहिती कर्नाटक आंब्याचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली. या आठवड्यात उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम म्हणून कच्चा आंबा लवकर तयार होत आहे. त्यामुळे बाजारात तयार माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे.