शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

ऊसतोडणी कामगारांंची शरद पवारांशी चर्चा

By admin | Updated: October 23, 2014 05:22 IST

: ऊसगाळप हंगाम अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार व वाहतूकदारांचा संप सुरूच आहे.

सोमेश्वरनगर : ऊसगाळप हंगाम अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार व वाहतूकदारांचा संप सुरूच आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ऊसतोडणी कामगार व वाहतूकदार संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. यामध्ये संघटनेच्या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून येत्या चार दिवसांत त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी व वाहतूकदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मात्र, मध्यंतरीच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान यांच्या संपाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आज माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मेखळी (ता. बारामती) येथे संघटनेचे राज्याचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील, पदाधिकारी आश्रुदास कराड, बबनराव पाले, बाबासाहेब घायतोडक, रामदास पानवळ यांच्याशी संपाबाबत अर्धा तास चर्चा केली. या वेळी पवार यांनी संघटनेच्या विविध मागण्या समजून घेतल्या. तसेच, यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या वेळी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये कारखाना व संघटना यांच्यातील सामंजस्य करार संपून गेला आहे. ऊसतोडणी कामगारांना ऊसतोडणीमध्ये वाढ करावी, डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीमध्ये वाढ करावी, मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, राज्यातील प्रत्येक कारखान्याने ऊसतोडणी कामगारांचा दोन लाख रुपयांचा विमा उतरावा, मुकादमांच्या २० टक्के फरक बिलातील कमिशन द्यावे, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना निवासी आश्रमशाळा चालू कराव्यात, करारानुसार टायर बैलगाडीवर १० टक्के कमिशन आकारणी ठरलेली आहे. प्रत्यक्षात कारखाने २० टक्के आकरतात. उर्वरित पैसे परत मिळावेत. ऊसतोडणी व वाहतूकदार यांच्याकडून कपात केला जाणारा २ टक्के प्राप्तिकर करू नये, ऊसतोडणी कामगारांना शासनाने पक्की घरे बांधून द्यावीत, त्यांना अड्याच्या ठिकाणी स्वच्छ पाणी व लाईट पुरवावी, मुकादमांना राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत ओळखपत्रे देण्यात यावीत. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शासकीय व निमशासकीय क्षेत्रात नोकरीत आरक्षण द्यावे आदी मागण्यांविषयी शिष्टमंडळाची पवार यांच्याशी चर्चा झाली. (वार्ताहर)