शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

सीईटी परीक्षेच्या अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:10 IST

पुणे : कोरोनामुळे घ्यावे लागत असलेले ऑनलाइन शिक्षण, बारावीच्या परीक्षेबाबतचा संभ्रम आणि सीईटी परीक्षांसदर्भातील अनिश्चिततेमुळे सध्या बारावीचे विद्यार्थी अस्वस्थ ...

पुणे : कोरोनामुळे घ्यावे लागत असलेले ऑनलाइन शिक्षण, बारावीच्या परीक्षेबाबतचा संभ्रम आणि सीईटी परीक्षांसदर्भातील अनिश्चिततेमुळे सध्या बारावीचे विद्यार्थी अस्वस्थ आहेत. तसेच, सीईटीच्या अभ्यासाबाबत निरुत्साही आहेत. त्यामुळे शासनाने परीक्षा घेतली जाणार आहे किंवा नाही हे स्पष्ट करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करून सर्वांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. परंतु, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. या परीक्षा केव्हा होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच जेईई, नीट या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या असल्या, तरी त्या होणार आहेत. हे विद्यार्थ्यांना माहीत आहे. मात्र, सीईटी संदर्भात शासनाकडून अद्याप कोणत्याही घोषणा केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी अस्वस्थ आहेत. तब्बल ४० टक्के विद्यार्थ्यांनी तर सीईटी परीक्षा द्यायचीच नाही, असा निश्चय केल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

राज्यातील महाविद्यालयांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सीईटी परीक्षा घेतली जाते. लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होतात. परंतु, बारावीच्या परीक्षेला विलंब झाल्याने सीईटीचा अभ्यास करावा की बारावीच्या परीक्षेचा अभ्यास करावा, या द्विधा मनस्थितीत विद्यार्थी सापडले आहेत. त्यामुळे शासनाने याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याची आवश्यकता आहे.

--

यंदा सीईटी परीक्षा होणारच नाही केवळ इयत्ता बारावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांवरच प्रवेश मिळेल, असा समज काही विद्यार्थ्यांनी करून घेतला आहे. परिणामी, सुमारे चाळीस टक्के विद्यार्थ्यांनी सीईटीचा अभ्यास करण्याचे सोडून दिले आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांमध्ये सीईटीबाबत निर्माण झालेला संभ्रम लवकर दूर करण्याची आवश्यकता आहे.

- केदार टाकळकर, प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक

--

नीट, जेईई आदी परीक्षांचा अभ्यास विद्यार्थी गांभीर्याने करताना दिसतात. परंत, सीईटी परीक्षेबाबत अभ्यास करणारे विद्यार्थी सध्या निरुत्साही झाले आहेत. परीक्षा होणार की नाही, याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे. शासनाने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्याशिवाय विद्यार्थी परीक्षेची तयारी सुरू करतील, असे वाटत नाही. त्यामुळे शासनाने सीईटीबाबतची भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.

- दुर्गेश मंगेशकर, प्रवेश पूर्व परीक्षांचा अभ्यासक