शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

कोवळी पानगळ रोखण्यासाठी दहासूत्री

By admin | Updated: October 26, 2015 02:02 IST

भारतात शासकीय यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यरत नसल्याने आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. नवजात अर्भकांचा मृत्युदर हे त्यांचेच एक उदाहरण असून,

पुणे : भारतात शासकीय यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यरत नसल्याने आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. नवजात अर्भकांचा मृत्युदर हे त्यांचेच एक उदाहरण असून, अर्भक मृत्युदरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. बाळ वर्षभराचे होण्यापूर्वीच हजार बालकांमध्ये ४५ बालके दगावतात. तर ३० दिवसांचे वय होण्यापूर्वीच हजार बालकांमध्ये ३० चिमुकली दगावतात. अशाप्रकारे जन्माला येऊन मृत्यूला कवटाळण्याची वेळ येत असेल तर ते आपल्या आरोग्यव्यवस्थेचे अपयश आहे. अशाप्रकारे होणारी कोवळी पानगळ रोखण्यासाठी नवजात अर्भकांचा मृत्युदर कमी करण्यासाठी भारतीय बालरोग संघटनेतर्फे दहासूत्री कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे बालरोग संघटनेचे २०१६चे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांनी सांगितले. भारतात कमी वजनाची बालके, मुदतीपूर्व जन्मलेले बालक यांच्या मृत्यूचा दर २० टक्क्यांहून अधिक आहे. तर हृदयविकार, मणक्याची समस्या, मेंदूतील समस्या किंवा पोटाच्या आतड्यांचे त्रास यामुळे जन्मल्यानंतर अतिशय कमी कालावधीत मृत्यू होणाऱ्या बालकांचे प्रमाण ५ ते ६ टक्के इतके आहे. मातांमधील कुपोषण हे ग्रामीण भागातील अर्भक मृत्यूचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. मातेचे लहान वय आणि योग्य ते पोषण न झाल्याने उद्भवणारी स्थिती यामुळे ग्रामीण भागातील महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो. तर शहरी भागात याच्या उलट परिस्थिती असून, अतिपोषण आणि मूल उशिरा होण्याने मृत्युदर जास्त असल्याचे दिसते. याविषयी डॉ. जोग म्हणाले, उपजत मृत्यूंचा अभ्यास केला असता अर्भक मृत्यूचे विदारक वास्तव पुढे आले आहे. ३० दिवसांचे वय होण्यापूर्वी हजारात ३० तर ७ दिवसांचे वय होण्यापूर्वी २० आणि २४ तास होण्यापूर्वीच ७ चिमुकले वर्षाला दगावतात. यासाठी चिमुकल्यांमध्ये जन्माच्या वेळी होणारा जंतुसंसर्ग, जन्मत:च नातेवाइकांकडून हाताळणे, जन्माच्या वेळी बाळ गर्भातच गुदमरणे, आई कुपोषित असणे अशी कारणे दिसून येतात. त्यामुळे नवजात शिशूंचा मृत्युदर कमी होत नाही. यावर उपाय म्हणून दहासूत्री कार्यक्रमांचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला. यात जन्मानंतर अर्ध्या तासात मातेकडून स्तनपान, नाळ कापताना घ्यावयाची काळजी, व्हिटॅमिनची मात्रा देणे, गरज नसताना वैद्यकीय उपचार टाळणे, अशा विविध कारणांचा शोध घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)