शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

कोवळी पानगळ रोखण्यासाठी दहासूत्री

By admin | Updated: October 26, 2015 02:02 IST

भारतात शासकीय यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यरत नसल्याने आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. नवजात अर्भकांचा मृत्युदर हे त्यांचेच एक उदाहरण असून,

पुणे : भारतात शासकीय यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यरत नसल्याने आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. नवजात अर्भकांचा मृत्युदर हे त्यांचेच एक उदाहरण असून, अर्भक मृत्युदरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. बाळ वर्षभराचे होण्यापूर्वीच हजार बालकांमध्ये ४५ बालके दगावतात. तर ३० दिवसांचे वय होण्यापूर्वीच हजार बालकांमध्ये ३० चिमुकली दगावतात. अशाप्रकारे जन्माला येऊन मृत्यूला कवटाळण्याची वेळ येत असेल तर ते आपल्या आरोग्यव्यवस्थेचे अपयश आहे. अशाप्रकारे होणारी कोवळी पानगळ रोखण्यासाठी नवजात अर्भकांचा मृत्युदर कमी करण्यासाठी भारतीय बालरोग संघटनेतर्फे दहासूत्री कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे बालरोग संघटनेचे २०१६चे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांनी सांगितले. भारतात कमी वजनाची बालके, मुदतीपूर्व जन्मलेले बालक यांच्या मृत्यूचा दर २० टक्क्यांहून अधिक आहे. तर हृदयविकार, मणक्याची समस्या, मेंदूतील समस्या किंवा पोटाच्या आतड्यांचे त्रास यामुळे जन्मल्यानंतर अतिशय कमी कालावधीत मृत्यू होणाऱ्या बालकांचे प्रमाण ५ ते ६ टक्के इतके आहे. मातांमधील कुपोषण हे ग्रामीण भागातील अर्भक मृत्यूचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. मातेचे लहान वय आणि योग्य ते पोषण न झाल्याने उद्भवणारी स्थिती यामुळे ग्रामीण भागातील महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो. तर शहरी भागात याच्या उलट परिस्थिती असून, अतिपोषण आणि मूल उशिरा होण्याने मृत्युदर जास्त असल्याचे दिसते. याविषयी डॉ. जोग म्हणाले, उपजत मृत्यूंचा अभ्यास केला असता अर्भक मृत्यूचे विदारक वास्तव पुढे आले आहे. ३० दिवसांचे वय होण्यापूर्वी हजारात ३० तर ७ दिवसांचे वय होण्यापूर्वी २० आणि २४ तास होण्यापूर्वीच ७ चिमुकले वर्षाला दगावतात. यासाठी चिमुकल्यांमध्ये जन्माच्या वेळी होणारा जंतुसंसर्ग, जन्मत:च नातेवाइकांकडून हाताळणे, जन्माच्या वेळी बाळ गर्भातच गुदमरणे, आई कुपोषित असणे अशी कारणे दिसून येतात. त्यामुळे नवजात शिशूंचा मृत्युदर कमी होत नाही. यावर उपाय म्हणून दहासूत्री कार्यक्रमांचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला. यात जन्मानंतर अर्ध्या तासात मातेकडून स्तनपान, नाळ कापताना घ्यावयाची काळजी, व्हिटॅमिनची मात्रा देणे, गरज नसताना वैद्यकीय उपचार टाळणे, अशा विविध कारणांचा शोध घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)