शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोवळी पानगळ रोखण्यासाठी दहासूत्री

By admin | Updated: October 26, 2015 02:02 IST

भारतात शासकीय यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यरत नसल्याने आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. नवजात अर्भकांचा मृत्युदर हे त्यांचेच एक उदाहरण असून,

पुणे : भारतात शासकीय यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यरत नसल्याने आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. नवजात अर्भकांचा मृत्युदर हे त्यांचेच एक उदाहरण असून, अर्भक मृत्युदरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. बाळ वर्षभराचे होण्यापूर्वीच हजार बालकांमध्ये ४५ बालके दगावतात. तर ३० दिवसांचे वय होण्यापूर्वीच हजार बालकांमध्ये ३० चिमुकली दगावतात. अशाप्रकारे जन्माला येऊन मृत्यूला कवटाळण्याची वेळ येत असेल तर ते आपल्या आरोग्यव्यवस्थेचे अपयश आहे. अशाप्रकारे होणारी कोवळी पानगळ रोखण्यासाठी नवजात अर्भकांचा मृत्युदर कमी करण्यासाठी भारतीय बालरोग संघटनेतर्फे दहासूत्री कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे बालरोग संघटनेचे २०१६चे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांनी सांगितले. भारतात कमी वजनाची बालके, मुदतीपूर्व जन्मलेले बालक यांच्या मृत्यूचा दर २० टक्क्यांहून अधिक आहे. तर हृदयविकार, मणक्याची समस्या, मेंदूतील समस्या किंवा पोटाच्या आतड्यांचे त्रास यामुळे जन्मल्यानंतर अतिशय कमी कालावधीत मृत्यू होणाऱ्या बालकांचे प्रमाण ५ ते ६ टक्के इतके आहे. मातांमधील कुपोषण हे ग्रामीण भागातील अर्भक मृत्यूचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. मातेचे लहान वय आणि योग्य ते पोषण न झाल्याने उद्भवणारी स्थिती यामुळे ग्रामीण भागातील महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो. तर शहरी भागात याच्या उलट परिस्थिती असून, अतिपोषण आणि मूल उशिरा होण्याने मृत्युदर जास्त असल्याचे दिसते. याविषयी डॉ. जोग म्हणाले, उपजत मृत्यूंचा अभ्यास केला असता अर्भक मृत्यूचे विदारक वास्तव पुढे आले आहे. ३० दिवसांचे वय होण्यापूर्वी हजारात ३० तर ७ दिवसांचे वय होण्यापूर्वी २० आणि २४ तास होण्यापूर्वीच ७ चिमुकले वर्षाला दगावतात. यासाठी चिमुकल्यांमध्ये जन्माच्या वेळी होणारा जंतुसंसर्ग, जन्मत:च नातेवाइकांकडून हाताळणे, जन्माच्या वेळी बाळ गर्भातच गुदमरणे, आई कुपोषित असणे अशी कारणे दिसून येतात. त्यामुळे नवजात शिशूंचा मृत्युदर कमी होत नाही. यावर उपाय म्हणून दहासूत्री कार्यक्रमांचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला. यात जन्मानंतर अर्ध्या तासात मातेकडून स्तनपान, नाळ कापताना घ्यावयाची काळजी, व्हिटॅमिनची मात्रा देणे, गरज नसताना वैद्यकीय उपचार टाळणे, अशा विविध कारणांचा शोध घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)