शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

असे आखावे मुलांचे आहाराचे वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST

जागतिक अन्न सुरक्षा दिवस ७ जून रोजी साजरा केला जातो. अन्नातील पोषक घटक मुलांच्या वाढीसाठी महत्त्वाचे असतात, त्यादृष्टीने अन्न ...

जागतिक अन्न सुरक्षा दिवस ७ जून रोजी साजरा केला जातो. अन्नातील पोषक घटक मुलांच्या वाढीसाठी महत्त्वाचे असतात, त्यादृष्टीने अन्न सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलांचा दररोजचा आहार कसा आणि किती असावा, पोषक घटकांचे प्रमाण किती असावे याबाबत पालक बारकाईने विचार करत असतात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना जास्त संसर्ग होण्याची शक्यता असताना आहाराच्या बाबतीत अधिक सजग राहण्याची गरज गरज आहे.

आहारतज्ज्ञ अर्चना रायरीकर म्हणाल्या, ''एका पोळीमध्ये साधारण ३ ग्रॅम, एक कप दुधात ४ ते ५ ग्रॅम, तर एक वाटी डाळीमध्ये ५ ग्रॅम प्रथिने असतात. प्रत्येकाच्या घरातील पोळीचा प्रकार, वाटीचा आकार वेगवेगळा असू शकतो. त्याप्रमाणे आहाराचे प्रमाण ठरवायला हवे. केवळ कोरोना काळातच नव्हे, तर नियमितपणे मुलांचा आहार आणि व्यायाम यावर भर देणे गरजेचे आहे.''

--------------

*आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तक्ता*

वयोगट वजन (किग्रॅ) कॅलरी (प्रतिदिन)

०-६ महिने ५.८ ५३०

६-१२ महिने ८.५ ६६०

१ ते ३ वर्षे १२.९ १११०

४ ते ६ वर्षे १८.३ १३६०

७ - ९ वर्षे २५.३ १७००

१० ते १२ वर्षे (मुले) ३४.९ २२२०

१० ते १२ वर्षे (मुली) ३६.४ २०६०

१३ ते १५ वर्षे (मुले) ५०.५ २८६०

१३ ते १५ वर्षे (मुली) ४९.६ २४००

१६ ते १८ (मुले) ६४.४ ३३२०

१६ ते १८ (मुली) ५५.७ २५००

-----------

वयोगट प्रोटिन (ग्रॅम प्रतिदिन)

०-६ महिने ७

६-१२ महिने ९

१ ते ३ वर्षे १०

४ ते ६ वर्षे १३

७ - ९ वर्षे १९

१० ते १२ वर्षे (मुले) २७

१० ते १२ वर्षे (मुली) २७

१३ ते १५ वर्षे (मुले) ३६

१३ ते १५ वर्षे (मुली) ३५

१६ ते १८ (मुले) ४५

१६ ते १८ (मुली) ३७

-----------

मुलांची उंची, वजन, वय, लिंग यानुसार पोषक आहाराची गरज ठरते. दही, दूध, डाळी, तृणधान्ये यातून शरीराला प्रथिने मिळतात. मुलांना सर्वंकष आहार देण्यावर पालकांचा भर असायला हवा. हंगामी फळे, सुका मेवा यांचा आहारातील समावेश लाभदायक ठरतो. आजकाल मुलांमध्ये स्थूलतेची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते आहे. जंक फूड, कमी झालेली शारीरिक हालचाल ही त्यामागील कारणे आहेत. फास्ट फूड आणि जंक फूडने केवळ वजन वाढत नाही, तर प्रतिकारशक्तीही कमी होते. कृत्रिम पदार्थांमुळे पेशींवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे आहारात नैसर्गिक पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश असायला हवा. हिरव्या पालेभाज्या या ''स्टोअर ऑफ न्यूट्रियनट्स'' मानल्या जातात. त्यामुळे मुलांना आवर्जून पालेभाज्या खाण्याची सवय लावावी.

- अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ