शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

असे आखावे मुलांचे आहाराचे वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST

जागतिक अन्न सुरक्षा दिवस ७ जून रोजी साजरा केला जातो. अन्नातील पोषक घटक मुलांच्या वाढीसाठी महत्त्वाचे असतात, त्यादृष्टीने अन्न ...

जागतिक अन्न सुरक्षा दिवस ७ जून रोजी साजरा केला जातो. अन्नातील पोषक घटक मुलांच्या वाढीसाठी महत्त्वाचे असतात, त्यादृष्टीने अन्न सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलांचा दररोजचा आहार कसा आणि किती असावा, पोषक घटकांचे प्रमाण किती असावे याबाबत पालक बारकाईने विचार करत असतात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना जास्त संसर्ग होण्याची शक्यता असताना आहाराच्या बाबतीत अधिक सजग राहण्याची गरज गरज आहे.

आहारतज्ज्ञ अर्चना रायरीकर म्हणाल्या, ''एका पोळीमध्ये साधारण ३ ग्रॅम, एक कप दुधात ४ ते ५ ग्रॅम, तर एक वाटी डाळीमध्ये ५ ग्रॅम प्रथिने असतात. प्रत्येकाच्या घरातील पोळीचा प्रकार, वाटीचा आकार वेगवेगळा असू शकतो. त्याप्रमाणे आहाराचे प्रमाण ठरवायला हवे. केवळ कोरोना काळातच नव्हे, तर नियमितपणे मुलांचा आहार आणि व्यायाम यावर भर देणे गरजेचे आहे.''

--------------

*आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तक्ता*

वयोगट वजन (किग्रॅ) कॅलरी (प्रतिदिन)

०-६ महिने ५.८ ५३०

६-१२ महिने ८.५ ६६०

१ ते ३ वर्षे १२.९ १११०

४ ते ६ वर्षे १८.३ १३६०

७ - ९ वर्षे २५.३ १७००

१० ते १२ वर्षे (मुले) ३४.९ २२२०

१० ते १२ वर्षे (मुली) ३६.४ २०६०

१३ ते १५ वर्षे (मुले) ५०.५ २८६०

१३ ते १५ वर्षे (मुली) ४९.६ २४००

१६ ते १८ (मुले) ६४.४ ३३२०

१६ ते १८ (मुली) ५५.७ २५००

-----------

वयोगट प्रोटिन (ग्रॅम प्रतिदिन)

०-६ महिने ७

६-१२ महिने ९

१ ते ३ वर्षे १०

४ ते ६ वर्षे १३

७ - ९ वर्षे १९

१० ते १२ वर्षे (मुले) २७

१० ते १२ वर्षे (मुली) २७

१३ ते १५ वर्षे (मुले) ३६

१३ ते १५ वर्षे (मुली) ३५

१६ ते १८ (मुले) ४५

१६ ते १८ (मुली) ३७

-----------

मुलांची उंची, वजन, वय, लिंग यानुसार पोषक आहाराची गरज ठरते. दही, दूध, डाळी, तृणधान्ये यातून शरीराला प्रथिने मिळतात. मुलांना सर्वंकष आहार देण्यावर पालकांचा भर असायला हवा. हंगामी फळे, सुका मेवा यांचा आहारातील समावेश लाभदायक ठरतो. आजकाल मुलांमध्ये स्थूलतेची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते आहे. जंक फूड, कमी झालेली शारीरिक हालचाल ही त्यामागील कारणे आहेत. फास्ट फूड आणि जंक फूडने केवळ वजन वाढत नाही, तर प्रतिकारशक्तीही कमी होते. कृत्रिम पदार्थांमुळे पेशींवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे आहारात नैसर्गिक पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश असायला हवा. हिरव्या पालेभाज्या या ''स्टोअर ऑफ न्यूट्रियनट्स'' मानल्या जातात. त्यामुळे मुलांना आवर्जून पालेभाज्या खाण्याची सवय लावावी.

- अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ