शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनेसाठी ४७ लाख खर्चूनही गाव तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:13 IST

सन २०१४-१५ या वर्षांत दोन कोटी ४७ लाख रुपये किमतीची राष्ट्रीय पेयजल योजनेतून धामणी गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात ...

सन २०१४-१५ या वर्षांत दोन कोटी ४७ लाख रुपये किमतीची राष्ट्रीय पेयजल योजनेतून धामणी गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. यासाठी ग्रामस्थांनी चोवीस लाख रुपये लोकवर्गणी जमा केली होती. मात्र, ठेकेदार व अधिकारी यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे दोन महिने सुद्धा धामणी गावाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. याची चौकशी करून अधिकारी व ठेकेदार यांच्यावर फौजदारी कारवाई करावी आणि गावाला पाणीपुरवठा करावा यासाठी जिल्हा परिषद पुणे येथे बुधवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सागर जाधव यांनी दिली.

पावसाने दडी मारल्याने आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागावर दुष्काळाचे सावट आहे. धामणी गाव व परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई जाणवत आहे. धामणी गावासाठी तब्बल २ कोटी ४७ लक्ष रुपयांची योजना पूर्ण होऊन काही अडचणींमुळे बंद आहे. या योजनेमध्ये अनेक ठिकाणी गळती, एअर वॉल गळती, पाण्याच्या टाक्या मधून गळती, मोटर पंप स्टार्टर बंद पडतो, पाण्याची टाकीवरील शिडी नादुरुस्त आणि अनेक ठिकाणी नळ योजना पाईप जोडणे बाकी आहे. विहिरीवरील दोन्ही मोटारी नादुरुस्त आहे. अशा अनेक गोष्टीमुळे ही योजना चालू नाही.

हे काम ८ दिवसांत नाही झाले, तर ग्रामपंचायत धामणी व ग्रामस्थांच्या वतीने येत्या बुधवारी २५ रोजी जि. प. पुणे येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. त्या संदर्भात निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या कार्यालयाला व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेंडगे यांच्याकडे देण्यात आले. त्या वेळी या समस्येतून मार्ग काढण्याचे आश्वासन शेंडगे यांनी दिले. यावेळेस पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, ॲड. विठ्ठल जाधव पाटील, खडकवाडी गावचे माजी सरपंच अनिल डोके, सरपंच सागर जाधव हे उपस्थित होते.

--

चौकट

धामणी परिसर दुष्काळग्रस्त भाग असून, या परिसरात ऐन पावसाळ्यात देखील टँकर चालू आहे. टॅंकरव्दारे येणारे पाणी पुरत नाही. दोन कोटी ४७ लाख रुपये किमतीची पाणीपुरवठा योजना पूर्ण असूनही काही कारणास्तव ती बंद असल्या कारणाने धामणी गाव पाण्यावाचून वंचित राहत आहे. मागील पाच वर्षांपासून धामणी गावात टँकर चालू आहे. ही योजना व्यवस्थित चालू झाली असती तर गावाला योग्य पद्धतीने पाणीपुरवठा होऊन टँकरसाठी वापरलेले शासनाचे लाखो रुपये वाचले असते. प्रशासकीय अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने धामणी गावाला टँकरची आवश्यकता लागली आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.