शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
4
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
5
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
6
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
7
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
8
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
9
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
10
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
11
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
12
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
13
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
14
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
15
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
16
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
17
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
18
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
19
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
20
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!

पाणी योजनेसाठी ४७ लाख खर्चूनही गाव तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:13 IST

सन २०१४-१५ या वर्षांत दोन कोटी ४७ लाख रुपये किमतीची राष्ट्रीय पेयजल योजनेतून धामणी गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात ...

सन २०१४-१५ या वर्षांत दोन कोटी ४७ लाख रुपये किमतीची राष्ट्रीय पेयजल योजनेतून धामणी गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. यासाठी ग्रामस्थांनी चोवीस लाख रुपये लोकवर्गणी जमा केली होती. मात्र, ठेकेदार व अधिकारी यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे दोन महिने सुद्धा धामणी गावाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. याची चौकशी करून अधिकारी व ठेकेदार यांच्यावर फौजदारी कारवाई करावी आणि गावाला पाणीपुरवठा करावा यासाठी जिल्हा परिषद पुणे येथे बुधवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सागर जाधव यांनी दिली.

पावसाने दडी मारल्याने आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागावर दुष्काळाचे सावट आहे. धामणी गाव व परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई जाणवत आहे. धामणी गावासाठी तब्बल २ कोटी ४७ लक्ष रुपयांची योजना पूर्ण होऊन काही अडचणींमुळे बंद आहे. या योजनेमध्ये अनेक ठिकाणी गळती, एअर वॉल गळती, पाण्याच्या टाक्या मधून गळती, मोटर पंप स्टार्टर बंद पडतो, पाण्याची टाकीवरील शिडी नादुरुस्त आणि अनेक ठिकाणी नळ योजना पाईप जोडणे बाकी आहे. विहिरीवरील दोन्ही मोटारी नादुरुस्त आहे. अशा अनेक गोष्टीमुळे ही योजना चालू नाही.

हे काम ८ दिवसांत नाही झाले, तर ग्रामपंचायत धामणी व ग्रामस्थांच्या वतीने येत्या बुधवारी २५ रोजी जि. प. पुणे येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. त्या संदर्भात निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या कार्यालयाला व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेंडगे यांच्याकडे देण्यात आले. त्या वेळी या समस्येतून मार्ग काढण्याचे आश्वासन शेंडगे यांनी दिले. यावेळेस पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, ॲड. विठ्ठल जाधव पाटील, खडकवाडी गावचे माजी सरपंच अनिल डोके, सरपंच सागर जाधव हे उपस्थित होते.

--

चौकट

धामणी परिसर दुष्काळग्रस्त भाग असून, या परिसरात ऐन पावसाळ्यात देखील टँकर चालू आहे. टॅंकरव्दारे येणारे पाणी पुरत नाही. दोन कोटी ४७ लाख रुपये किमतीची पाणीपुरवठा योजना पूर्ण असूनही काही कारणास्तव ती बंद असल्या कारणाने धामणी गाव पाण्यावाचून वंचित राहत आहे. मागील पाच वर्षांपासून धामणी गावात टँकर चालू आहे. ही योजना व्यवस्थित चालू झाली असती तर गावाला योग्य पद्धतीने पाणीपुरवठा होऊन टँकरसाठी वापरलेले शासनाचे लाखो रुपये वाचले असते. प्रशासकीय अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने धामणी गावाला टँकरची आवश्यकता लागली आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.