शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पाणी योजनेसाठी ४७ लाख खर्चूनही गाव तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:13 IST

सन २०१४-१५ या वर्षांत दोन कोटी ४७ लाख रुपये किमतीची राष्ट्रीय पेयजल योजनेतून धामणी गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात ...

सन २०१४-१५ या वर्षांत दोन कोटी ४७ लाख रुपये किमतीची राष्ट्रीय पेयजल योजनेतून धामणी गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. यासाठी ग्रामस्थांनी चोवीस लाख रुपये लोकवर्गणी जमा केली होती. मात्र, ठेकेदार व अधिकारी यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे दोन महिने सुद्धा धामणी गावाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. याची चौकशी करून अधिकारी व ठेकेदार यांच्यावर फौजदारी कारवाई करावी आणि गावाला पाणीपुरवठा करावा यासाठी जिल्हा परिषद पुणे येथे बुधवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सागर जाधव यांनी दिली.

पावसाने दडी मारल्याने आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागावर दुष्काळाचे सावट आहे. धामणी गाव व परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई जाणवत आहे. धामणी गावासाठी तब्बल २ कोटी ४७ लक्ष रुपयांची योजना पूर्ण होऊन काही अडचणींमुळे बंद आहे. या योजनेमध्ये अनेक ठिकाणी गळती, एअर वॉल गळती, पाण्याच्या टाक्या मधून गळती, मोटर पंप स्टार्टर बंद पडतो, पाण्याची टाकीवरील शिडी नादुरुस्त आणि अनेक ठिकाणी नळ योजना पाईप जोडणे बाकी आहे. विहिरीवरील दोन्ही मोटारी नादुरुस्त आहे. अशा अनेक गोष्टीमुळे ही योजना चालू नाही.

हे काम ८ दिवसांत नाही झाले, तर ग्रामपंचायत धामणी व ग्रामस्थांच्या वतीने येत्या बुधवारी २५ रोजी जि. प. पुणे येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. त्या संदर्भात निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या कार्यालयाला व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेंडगे यांच्याकडे देण्यात आले. त्या वेळी या समस्येतून मार्ग काढण्याचे आश्वासन शेंडगे यांनी दिले. यावेळेस पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, ॲड. विठ्ठल जाधव पाटील, खडकवाडी गावचे माजी सरपंच अनिल डोके, सरपंच सागर जाधव हे उपस्थित होते.

--

चौकट

धामणी परिसर दुष्काळग्रस्त भाग असून, या परिसरात ऐन पावसाळ्यात देखील टँकर चालू आहे. टॅंकरव्दारे येणारे पाणी पुरत नाही. दोन कोटी ४७ लाख रुपये किमतीची पाणीपुरवठा योजना पूर्ण असूनही काही कारणास्तव ती बंद असल्या कारणाने धामणी गाव पाण्यावाचून वंचित राहत आहे. मागील पाच वर्षांपासून धामणी गावात टँकर चालू आहे. ही योजना व्यवस्थित चालू झाली असती तर गावाला योग्य पद्धतीने पाणीपुरवठा होऊन टँकरसाठी वापरलेले शासनाचे लाखो रुपये वाचले असते. प्रशासकीय अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने धामणी गावाला टँकरची आवश्यकता लागली आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.