शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

उद्योगासह सर्वच क्षेत्रांत निराशेचे वातावरण

By admin | Updated: November 15, 2015 00:39 IST

देशात सध्या सर्वच क्षेत्रांत निराशेचे वातावरण आहे. यामध्ये कृषी, अ‍ॅटोमोबाईल क्षेत्र देखील अपवाद नाही. ही बाब अर्थव्यवस्थेसाठी फारशी चांगली नाही,

बारामती : देशात सध्या सर्वच क्षेत्रांत निराशेचे वातावरण आहे. यामध्ये कृषी, अ‍ॅटोमोबाईल क्षेत्र देखील अपवाद नाही. ही बाब अर्थव्यवस्थेसाठी फारशी चांगली नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्योगक्षेत्राबाबत चिंता व्यक्त केली.बारामती येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रयत भवन येथे दिवाळी पाडव्यानिमित्त व्यापाऱ्यांचा मेळावा आयोगित करण्यात आला होता. पवार म्हणाले, की देशात शेतकरी, व्यापारीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. सरकारची धोरणे पोषक नसल्याने निराशेचे वातावरण झाले आहे. देशाच्या अर्थमंत्र्यांनी काही वर्षांपूर्वी परदेशी गुंतवणुकीला विरोध केला. मात्र, आता त्यांनीच परदेशी गुंतवणूुकदारांना संधी दिली आहे. यामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांचा शिरकाव झाला आहे. याचा परिणाम रिटेल क्षेत्रावर होऊन दुकाने बंद होण्याची भीती आहे. गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत सोने, वाहन क्षेत्रात विक्रीमध्ये घट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत. गुंतवणुुकीचे प्रमाण वाढविण्यासाठी निर्णय होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारबाबत एका वर्षात निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मात्र, एका वर्षात प्रोत्साहन देणारी दिशा दिसत नाही, असेही पवार म्हणाले. (प्रतिनिधी)