शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

उद्योगासह सर्वच क्षेत्रांत निराशेचे वातावरण

By admin | Updated: November 15, 2015 00:39 IST

देशात सध्या सर्वच क्षेत्रांत निराशेचे वातावरण आहे. यामध्ये कृषी, अ‍ॅटोमोबाईल क्षेत्र देखील अपवाद नाही. ही बाब अर्थव्यवस्थेसाठी फारशी चांगली नाही,

बारामती : देशात सध्या सर्वच क्षेत्रांत निराशेचे वातावरण आहे. यामध्ये कृषी, अ‍ॅटोमोबाईल क्षेत्र देखील अपवाद नाही. ही बाब अर्थव्यवस्थेसाठी फारशी चांगली नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्योगक्षेत्राबाबत चिंता व्यक्त केली.बारामती येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रयत भवन येथे दिवाळी पाडव्यानिमित्त व्यापाऱ्यांचा मेळावा आयोगित करण्यात आला होता. पवार म्हणाले, की देशात शेतकरी, व्यापारीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. सरकारची धोरणे पोषक नसल्याने निराशेचे वातावरण झाले आहे. देशाच्या अर्थमंत्र्यांनी काही वर्षांपूर्वी परदेशी गुंतवणुकीला विरोध केला. मात्र, आता त्यांनीच परदेशी गुंतवणूुकदारांना संधी दिली आहे. यामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांचा शिरकाव झाला आहे. याचा परिणाम रिटेल क्षेत्रावर होऊन दुकाने बंद होण्याची भीती आहे. गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत सोने, वाहन क्षेत्रात विक्रीमध्ये घट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत. गुंतवणुुकीचे प्रमाण वाढविण्यासाठी निर्णय होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारबाबत एका वर्षात निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मात्र, एका वर्षात प्रोत्साहन देणारी दिशा दिसत नाही, असेही पवार म्हणाले. (प्रतिनिधी)