शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

वारकऱ्यांच्या निवासाला खासगी शाळांचा नकार

By admin | Updated: July 2, 2016 12:50 IST

शहरामध्ये संत तुकाराममहाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्यांचे बुधवारी शहरात आगमन झाले

शहरामध्ये संत तुकाराममहाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्यांचे बुधवारी शहरात आगमन झाले, मात्र त्यांच्या निवासाची पुरेशी व्यवस्था न झाल्याने महिला व पुरुष वारकऱ्यांना रस्त्यांवर रात्र काढावी लागल्याचे चित्र बुधवारी रात्री दिसून आले. महापालिका शाळांच्या ११० इमारती प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या, मात्र खासगी शाळांमध्ये वारकऱ्यांची व्यवस्था होत नसल्याने त्यांना रस्ते, पदपथ यावर विसावा घ्यावा लागत आहे. शहरामध्ये संत तुकाराममहाराज, संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्यांसमवेत लाखो वारकऱ्यांचे आगमन होते. दोन दिवस त्यांचा शहरामध्ये मुक्काम असतो. दरवर्षी पालिकेच्या शाळा वारकऱ्यांना निवासासाठी उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र वारकऱ्यांची संख्या पाहता ही व्यवस्था खूपच तोकडी पडत आहे. खासगी शाळांच्या मोठ्या इमारती शहरामध्ये आहेत, तिथे वारकऱ्यांची चांगली सोय होऊ शकते. महापालिका शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे यांनी सांगितले, ‘‘वारकऱ्यांच्या मागणीनुसार शहरातील ११० इमारती त्यांच्या निवासासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांकडून केवळ शहराच्या मध्यवर्ती भागातील शाळांच्या इमारतींचीच मागणी होते. औंध, कात्रज अशा शहराच्या बाहेर असलेल्या शाळा त्यांना सोयीस्कर ठरत नाहीत.’’ पालखींचे आगमन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वच्छता करण्यासाठी अतिरिक्त १४०० कंटेनर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पालखी मार्गावर ५३८ वैयक्तिक शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाण्याचा मुबलक पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.बऱ्याच दिंड्यांमधील महिलांना अशा ठिकाणी जागा न मिळाल्याने रस्त्याच्या कडेला पहुडण्याची वेळ आलेली दिसली. माळशिरसहून आलेल्या अंबिकाबाई म्हणाल्या, ‘‘आम्ही गेल्या २० वर्षांपासून पंढरीच्या वारीला येत आहोत. वारीत प्रत्येक क्षणी आमच्यावर पांडुरंगाचा आशीर्वाद असतो. त्यामुळे, कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही. परंतु, रात्री उघड्यावर झोपायला लागत असल्याने काळजी मात्र लागून राहते. डोळ्याला डोळा लागत नाही. दोघींनी दोन तास झोपायचे, इतर दोघींनी जागे राहायचे; मग त्यांना उठवायचे आणि आपण झोपायचे, असे आम्ही आळीपाळीने ठरवून घेतो.’’