शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांच्या निवासाला खासगी शाळांचा नकार

By admin | Updated: July 2, 2016 12:50 IST

शहरामध्ये संत तुकाराममहाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्यांचे बुधवारी शहरात आगमन झाले

शहरामध्ये संत तुकाराममहाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्यांचे बुधवारी शहरात आगमन झाले, मात्र त्यांच्या निवासाची पुरेशी व्यवस्था न झाल्याने महिला व पुरुष वारकऱ्यांना रस्त्यांवर रात्र काढावी लागल्याचे चित्र बुधवारी रात्री दिसून आले. महापालिका शाळांच्या ११० इमारती प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या, मात्र खासगी शाळांमध्ये वारकऱ्यांची व्यवस्था होत नसल्याने त्यांना रस्ते, पदपथ यावर विसावा घ्यावा लागत आहे. शहरामध्ये संत तुकाराममहाराज, संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्यांसमवेत लाखो वारकऱ्यांचे आगमन होते. दोन दिवस त्यांचा शहरामध्ये मुक्काम असतो. दरवर्षी पालिकेच्या शाळा वारकऱ्यांना निवासासाठी उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र वारकऱ्यांची संख्या पाहता ही व्यवस्था खूपच तोकडी पडत आहे. खासगी शाळांच्या मोठ्या इमारती शहरामध्ये आहेत, तिथे वारकऱ्यांची चांगली सोय होऊ शकते. महापालिका शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे यांनी सांगितले, ‘‘वारकऱ्यांच्या मागणीनुसार शहरातील ११० इमारती त्यांच्या निवासासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांकडून केवळ शहराच्या मध्यवर्ती भागातील शाळांच्या इमारतींचीच मागणी होते. औंध, कात्रज अशा शहराच्या बाहेर असलेल्या शाळा त्यांना सोयीस्कर ठरत नाहीत.’’ पालखींचे आगमन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वच्छता करण्यासाठी अतिरिक्त १४०० कंटेनर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पालखी मार्गावर ५३८ वैयक्तिक शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाण्याचा मुबलक पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.बऱ्याच दिंड्यांमधील महिलांना अशा ठिकाणी जागा न मिळाल्याने रस्त्याच्या कडेला पहुडण्याची वेळ आलेली दिसली. माळशिरसहून आलेल्या अंबिकाबाई म्हणाल्या, ‘‘आम्ही गेल्या २० वर्षांपासून पंढरीच्या वारीला येत आहोत. वारीत प्रत्येक क्षणी आमच्यावर पांडुरंगाचा आशीर्वाद असतो. त्यामुळे, कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही. परंतु, रात्री उघड्यावर झोपायला लागत असल्याने काळजी मात्र लागून राहते. डोळ्याला डोळा लागत नाही. दोघींनी दोन तास झोपायचे, इतर दोघींनी जागे राहायचे; मग त्यांना उठवायचे आणि आपण झोपायचे, असे आम्ही आळीपाळीने ठरवून घेतो.’’