शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

वारकऱ्यांच्या निवासाला खासगी शाळांचा नकार

By admin | Updated: July 2, 2016 12:50 IST

शहरामध्ये संत तुकाराममहाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्यांचे बुधवारी शहरात आगमन झाले

शहरामध्ये संत तुकाराममहाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्यांचे बुधवारी शहरात आगमन झाले, मात्र त्यांच्या निवासाची पुरेशी व्यवस्था न झाल्याने महिला व पुरुष वारकऱ्यांना रस्त्यांवर रात्र काढावी लागल्याचे चित्र बुधवारी रात्री दिसून आले. महापालिका शाळांच्या ११० इमारती प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या, मात्र खासगी शाळांमध्ये वारकऱ्यांची व्यवस्था होत नसल्याने त्यांना रस्ते, पदपथ यावर विसावा घ्यावा लागत आहे. शहरामध्ये संत तुकाराममहाराज, संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्यांसमवेत लाखो वारकऱ्यांचे आगमन होते. दोन दिवस त्यांचा शहरामध्ये मुक्काम असतो. दरवर्षी पालिकेच्या शाळा वारकऱ्यांना निवासासाठी उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र वारकऱ्यांची संख्या पाहता ही व्यवस्था खूपच तोकडी पडत आहे. खासगी शाळांच्या मोठ्या इमारती शहरामध्ये आहेत, तिथे वारकऱ्यांची चांगली सोय होऊ शकते. महापालिका शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे यांनी सांगितले, ‘‘वारकऱ्यांच्या मागणीनुसार शहरातील ११० इमारती त्यांच्या निवासासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांकडून केवळ शहराच्या मध्यवर्ती भागातील शाळांच्या इमारतींचीच मागणी होते. औंध, कात्रज अशा शहराच्या बाहेर असलेल्या शाळा त्यांना सोयीस्कर ठरत नाहीत.’’ पालखींचे आगमन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वच्छता करण्यासाठी अतिरिक्त १४०० कंटेनर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पालखी मार्गावर ५३८ वैयक्तिक शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाण्याचा मुबलक पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.बऱ्याच दिंड्यांमधील महिलांना अशा ठिकाणी जागा न मिळाल्याने रस्त्याच्या कडेला पहुडण्याची वेळ आलेली दिसली. माळशिरसहून आलेल्या अंबिकाबाई म्हणाल्या, ‘‘आम्ही गेल्या २० वर्षांपासून पंढरीच्या वारीला येत आहोत. वारीत प्रत्येक क्षणी आमच्यावर पांडुरंगाचा आशीर्वाद असतो. त्यामुळे, कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही. परंतु, रात्री उघड्यावर झोपायला लागत असल्याने काळजी मात्र लागून राहते. डोळ्याला डोळा लागत नाही. दोघींनी दोन तास झोपायचे, इतर दोघींनी जागे राहायचे; मग त्यांना उठवायचे आणि आपण झोपायचे, असे आम्ही आळीपाळीने ठरवून घेतो.’’