शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूच्या डंखामुळे प्लेटलेटची वानवा, पुरवठा करताना रक्तपेढ्यांची कसरत, शिबिरे आयोजिण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:44 IST

डेंग्यू आणि इतर विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याने सध्या शहरात प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. सप्टेंबर महिन्यापासून वाढत चाललेली प्लेटलेट्सची मागणी अद्यापही कमी झालेली नसून त्यात वाढच होत चालली आहे.

पुणे : डेंग्यू आणि इतर विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याने सध्या शहरात प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. सप्टेंबर महिन्यापासून वाढत चाललेली प्लेटलेट्सची मागणी अद्यापही कमी झालेली नसून त्यात वाढच होत चालली आहे. त्यामुळे शहरातील रक्तपेढ्यांना प्लेटलेट्स मागणी पूर्ण करताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.पावसाळा सुरू झाला की शहरात दरवर्षी डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढते. यंदाही ही परिस्थती उद्भवली असून शहरात जुलै महिन्यापासून डेंग्युच्या संशयित रुग्णांची तसेच लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. आॅगस्ट महिन्यापासून यामध्ये अचानक मोठी वाढ झाल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. सप्टेबर महिन्यात डेंग्यूचे १११४ संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी २५१ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आॅक्टोबर महिन्यात हे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. दि. १७ आॅक्टोबरपर्यंतच १०१९ संशयित रुग्णांपैकी लागण झालेले २९६ रुग्ण आढळले आहेत. आॅक्टोबरअखेरपर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण झपाट्याने घटत जाते. सध्या अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील सर्वच रक्तपेढ्यांकडे प्लेटलेट्सची मागणी वाढू लागली आहे. याविषयी माहिती देताना जनकल्याण रक्तपपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकणी म्हणाले, ‘डेंग्यूप्रमाणेच इतर विषाणूजन्य आजारांमध्ये सध्या प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे. सप्टेंबर महिन्यापासून ही वाढ झाली आहे. नियमितपणे सधारणत एक ते दोन रुग्णांची मागणी होत असते. सध्या ही मागणी ८ ते १० हून अधिक रुग्णांपर्यंत गेली आहे. ही मागणी जास्त असली तरी मोठ्या रक्तपेढ्यांकडून सद्य:स्थितीत ही मागणी पूर्ण केली जात आहे. त्यासाठी स्वेच्छा रक्तदात्यांकडून सहकार्य मिळत आहे. दिवाळीच्या काळात रक्तदान शिबिरे होत नसल्याने काही प्रमाणात कमतरता जाणवत आहे.’‘शहरासह बाहेरगावांहूनही प्लेटलेट्सची मागणी होत आहे. नियमितपणे ६० मिलीच्या २० ते २५ बॅग प्लेटलेट्सची गरज भासते.ही मागणी सध्या १२५ बॅगपर्यंतगेली आहे. लक्ष्मीपुजन वपाडव्याच्या दिवशी रक्तदानशिबिर घेतल्याने ही मागणी पूर्णकरता आली. सध्या सुट्ट्यांमुळेशिबिरे होत नसल्याने प्लेटलेट्सची कमतरता जाणवत आहे,’ अशी माहिती आचार्य आनंदऋषिजी रक्तपेढीच्या प्रमुख हीना गुजरयांनी दिली.