शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

उत्सवावर डेंगी, स्वाइन फ्लूचे सावट

By admin | Updated: September 16, 2015 02:51 IST

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, शहरात स्वाइन फ्लू आणि डेंगीने थैमान घातले आहे. गेल्या दोन आठवड्यांत डेंगीची लागण झालेले

पुणे : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, शहरात स्वाइन फ्लू आणि डेंगीने थैमान घातले आहे. गेल्या दोन आठवड्यांत डेंगीची लागण झालेले तब्बल १४०, तर स्वाइन फ्लूची लागण झालेले ९२ नवीन रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची धांदल उडाली आहे. या उत्सवासाठी देशभरातून भाविक शहरात येत असल्याने आणि वारंवार होणाऱ्या पावसामुळे तसेच वातावरणातील बदलामुळे आरोग्य विभागाला या आजारांवर नियंत्रण मिळविण्यात अपयश येत असल्याचे दिसून येते. मागील वर्षी शहरात डेंगीने थैमान घातले होते, तर पाच वर्षांपासून पुणे हे स्वाइन फ्लूचे केंद्रच बनले आहे. त्यामुळे दर वर्षी या आजाराचे रुग्ण शहरात मोठ्या प्रमाणात वाढतात. मात्र, या वर्षी ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीतच या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, रुग्णालयांमधील गर्दी वाढू लागली आहे. (प्रतिनिधी)डेंगीचे १४०, तर स्वाइन फ्लूचे ९२ रुग्णसप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शहरात डेंगीची लागण झालेले तब्बल १४० रुग्ण आढळून आले आहेत. तर, स्वाइन फ्लूच्या रुग्णांचा आकडा ९२वर पोहोचला आहे. म्हणजेच प्रत्येक आठवड्याला सरासरी या दोन्ही आजारांचे पन्नासहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. डेंगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेकडून घरोघरी जाऊन तसेच शाळा आणि इतर माध्यमांमधून जनजागृती केली जात आहे. मात्र, पावसामुळे बांधकामे तसेच घरांच्या टेरेस आणि इतर ठिकाणी पाणी साठून डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यात आरोग्य विभागाला अपयश येत असल्याने हा रुग्णांचा आकडा शहरात गर्दी वाढल्यास आणखी वाढण्याची शक्यता आहे.१५ दिवसांत १२ मृत्यू शहरातील स्वाइन फ्लूची स्थितीही गंभीर बनत चालली आहे. गेल्या १५ दिवसांत शहरात स्वाइन फ्लूने १२ जणांचा मृत्यू झाला. यांतील बहुतांश रुग्ण हे शहराबाहेरील असले, तरी शहरात नव्याने लागण होणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. आॅगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूने ९, तर जुलै महिन्यात २ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान मंगळवारी शहरात आणखी दोन रग्णांचा मृत्यू झाला. त्यात आंबेगाव तालुक्यातील फुलेवाडी येथील एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा, तर दौंड तालुक्यातील पाटस येथील एका ४२ वर्षीय युवकाचा शहरातील खासगी रूग्णांलयांमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. कपातीने डेंगीचे संकट वाढणार डेंगीच्या डासांची पैदास ही प्रामुख्याने स्वच्छ पाण्यामध्ये आढळून येते. शहरात मागील आठवड्यापासून एक वेळ पाणीकपात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवले जात आहे.हे पाणी जास्त दिवस साठविले गेल्यास त्यात डासांची पैदास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त तीन ते चार दिवसच पाणी साठवून ठेवावे, तसेच साठविलेल्या पाण्याच्या भांड्यावर अथवा बॅरेलवर झाकण ठेवावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत शहरातील डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र, ही संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार, घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. तसेच, दंडात्मक कारवाईही केली जात आहे. डेंगीच्या तपासणी वेळी शहरातील अनेक टेरेसच्या ठिकाणी डासांची पैदास आढळून आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात स्वच्छ पाण्याचे साठे होणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. याशिवाय, शाळा तसेच गणेश मंडळांच्या माध्यमातूनही या आजाराविषयी जनजागृती करून ही साथ रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.- डॉ. एस. टी. परदेशी, आरोग्यप्रमुख