शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

उत्सवावर डेंगी, स्वाइन फ्लूचे सावट

By admin | Updated: September 16, 2015 02:51 IST

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, शहरात स्वाइन फ्लू आणि डेंगीने थैमान घातले आहे. गेल्या दोन आठवड्यांत डेंगीची लागण झालेले

पुणे : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, शहरात स्वाइन फ्लू आणि डेंगीने थैमान घातले आहे. गेल्या दोन आठवड्यांत डेंगीची लागण झालेले तब्बल १४०, तर स्वाइन फ्लूची लागण झालेले ९२ नवीन रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची धांदल उडाली आहे. या उत्सवासाठी देशभरातून भाविक शहरात येत असल्याने आणि वारंवार होणाऱ्या पावसामुळे तसेच वातावरणातील बदलामुळे आरोग्य विभागाला या आजारांवर नियंत्रण मिळविण्यात अपयश येत असल्याचे दिसून येते. मागील वर्षी शहरात डेंगीने थैमान घातले होते, तर पाच वर्षांपासून पुणे हे स्वाइन फ्लूचे केंद्रच बनले आहे. त्यामुळे दर वर्षी या आजाराचे रुग्ण शहरात मोठ्या प्रमाणात वाढतात. मात्र, या वर्षी ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीतच या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, रुग्णालयांमधील गर्दी वाढू लागली आहे. (प्रतिनिधी)डेंगीचे १४०, तर स्वाइन फ्लूचे ९२ रुग्णसप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शहरात डेंगीची लागण झालेले तब्बल १४० रुग्ण आढळून आले आहेत. तर, स्वाइन फ्लूच्या रुग्णांचा आकडा ९२वर पोहोचला आहे. म्हणजेच प्रत्येक आठवड्याला सरासरी या दोन्ही आजारांचे पन्नासहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. डेंगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेकडून घरोघरी जाऊन तसेच शाळा आणि इतर माध्यमांमधून जनजागृती केली जात आहे. मात्र, पावसामुळे बांधकामे तसेच घरांच्या टेरेस आणि इतर ठिकाणी पाणी साठून डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यात आरोग्य विभागाला अपयश येत असल्याने हा रुग्णांचा आकडा शहरात गर्दी वाढल्यास आणखी वाढण्याची शक्यता आहे.१५ दिवसांत १२ मृत्यू शहरातील स्वाइन फ्लूची स्थितीही गंभीर बनत चालली आहे. गेल्या १५ दिवसांत शहरात स्वाइन फ्लूने १२ जणांचा मृत्यू झाला. यांतील बहुतांश रुग्ण हे शहराबाहेरील असले, तरी शहरात नव्याने लागण होणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. आॅगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूने ९, तर जुलै महिन्यात २ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान मंगळवारी शहरात आणखी दोन रग्णांचा मृत्यू झाला. त्यात आंबेगाव तालुक्यातील फुलेवाडी येथील एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा, तर दौंड तालुक्यातील पाटस येथील एका ४२ वर्षीय युवकाचा शहरातील खासगी रूग्णांलयांमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. कपातीने डेंगीचे संकट वाढणार डेंगीच्या डासांची पैदास ही प्रामुख्याने स्वच्छ पाण्यामध्ये आढळून येते. शहरात मागील आठवड्यापासून एक वेळ पाणीकपात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवले जात आहे.हे पाणी जास्त दिवस साठविले गेल्यास त्यात डासांची पैदास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त तीन ते चार दिवसच पाणी साठवून ठेवावे, तसेच साठविलेल्या पाण्याच्या भांड्यावर अथवा बॅरेलवर झाकण ठेवावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत शहरातील डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र, ही संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार, घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. तसेच, दंडात्मक कारवाईही केली जात आहे. डेंगीच्या तपासणी वेळी शहरातील अनेक टेरेसच्या ठिकाणी डासांची पैदास आढळून आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात स्वच्छ पाण्याचे साठे होणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. याशिवाय, शाळा तसेच गणेश मंडळांच्या माध्यमातूनही या आजाराविषयी जनजागृती करून ही साथ रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.- डॉ. एस. टी. परदेशी, आरोग्यप्रमुख