शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

डोर्लेवाडीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार निवेदनाद्वारे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:13 IST

डोर्लेवाडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देवकाते यांच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने थेट उपमुख्यमंत्री ...

डोर्लेवाडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देवकाते यांच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धाव घेतली आहे. बारामती येथे उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली करावी, असे निवेदन उपमुख्यमंत्री पवार यांना दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनानुसार, डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजासंदर्भात गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे दैनंदिन कामाकाजामध्ये विस्कळीतपणा आलेला आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये याठिकाणी सामान्य गोरगरीब नागरिक जात असतात; परंतु नागरिकांना या ठिकाणी योग्य वागणूक दिली जात नाही. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणारी डोर्लेवाडी, झारगडवाडी, सोनगाव, गुणवडी, मळद ही गावे कोरोना हॉटस्पॉट झाली आहेत. मात्र, तरीही येथे लसीकरणामध्ये वशिलेबाजीमुळे सावळा गोंधळ उडाला आहे. विशेष म्हणजे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देवकाते यांचे पती डॉ. बापूराव दडस देखील या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावातील नागरिकांना लस न देता बाहेरील गावातील व कंपनीतील लोकांना पैसे घेऊन लस देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. गावातली लसीकरण कमी झाल्यामुळे कोविड रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. हे वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनादेखील दुय्यम दर्जाची वागणूक देत आहेत. ‘आमचं कोणीही काहीही करू शकत नाही. आमची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सीइओ साहेब यांच्याकडे तक्रार करा’ असे ते वारंवार म्हणत असतात.

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेली १०-१२ वर्षांपासून अधिक काळ वैद्यकीय अधिकारी म्हणून हे पती-पत्नी कार्यरत आहेत. त्यांची बदली करण्याबाबत ५ ऑक्टोबर २०१८ च्या ग्रामसभेमध्ये ठराव देखील करण्यात आलेला आहे. वारंवार पत्रव्यवहार करून देखील या दाम्पत्याची बदली होत नाही, अशी तक्रार या निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी सरपंच पाडुरंग सलवदे, सदस्य रामभाऊ कालगावकर, शहाजी दळवी, दिगंबर भोपळे आदी प्रमुख ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.