शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

श्रेयवादामुळे मंचर नगरपंचायत होण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:08 IST

मंचर : मंचर शहराच्या विकासासाठी नगरपंचायत होणे गरजेचे आहे. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेयवादामुळे नगरपंचायत होऊ शकली नाही. ...

मंचर : मंचर शहराच्या विकासासाठी नगरपंचायत होणे गरजेचे आहे. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेयवादामुळे नगरपंचायत होऊ शकली नाही. त्यामुळे मंचर शहराचा विकास खुंटला आहे, असा आरोप भाजपाचे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे यांनी केला.

मंचर येथे भाजपाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी किसान मोर्चा पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय थोरात, तालुका भाजप अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले, उपाध्यक्ष भाजप पुणे विजय पवार, मंचर शहर अध्यक्ष नवनाथ बाणखेले, सुशांत थोरात, गणेश बाणखेले, रोहन खानदेशे, विकास बाणखेले, सोनल काळे, स्नेहल चासकर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

एरंडे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार म्हणून काम करताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आश्वासने देऊनही मागील सहा महिन्यांत मंचर येथे नगरपंचायत करू शकले नाही. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा महिन्यांपूर्वीच माळेगाव, देहूगाव येथे नगरपरिषद करून दाखवली आहे. महाविकास आघाडी सरकारने मंचर ग्रामस्थांची दिशाभूल करून विकासाचे गाजर दाखवले. राष्ट्रवादी व शिवसेनेला शहरात नगरपंचायत होऊनच द्यायची नाही, असे चित्र सध्या दिसत आहे. मात्र मंचर ग्रामपंचायतीमध्ये तिजोरीत खडखडाट असल्याने मंचर शहराचा विकास खुंटला आहे.

डॉ. ताराचंद कराळे म्हणाले, मंचर व घोडेगाव या दोन्ही गावांचा नगरपंचायतीचा प्रस्ताव पाठवून अनेक वेळा सर्वांनी पाठपुरावा केला. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री दिलीप वळसे पाटील व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असणारे शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या श्रेयवादामुळे मंचर शहराची नगरपंचायत होणे थांबले आहे. महाविकास आघाडी लोकांच्या भावनेशी खेळ करत असून नागरिकांना रस्ता, पाणी, वीज, आरोग्य या मूलभूत सेवा देण्यास ग्रामपंचायत कमी पडली आहे. यासंदर्भात कारवाई न झाल्यास आंबेगाव भाजपच्या वतीने आंदोलन छेडणार असल्याचे कराळे यांनी सांगितले.

संजय थोरात म्हणाले की मंचर शहरात महाविकास आघाडी होऊन नागरिकांचा तोटा झाला आहे. यांच्या हातात राज्याची सत्ता असूनही मंचर शहराचा विकास थांबला आहे. मंचर शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर असून यांना ती चालू करता आली नाही. तर शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग असून वेळेवर पाणी मिळत नाही, असेही त्यांनी सांगितले.