शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

श्रेयवादामुळे मंचर नगरपंचायत होण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:08 IST

मंचर : मंचर शहराच्या विकासासाठी नगरपंचायत होणे गरजेचे आहे. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेयवादामुळे नगरपंचायत होऊ शकली नाही. ...

मंचर : मंचर शहराच्या विकासासाठी नगरपंचायत होणे गरजेचे आहे. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेयवादामुळे नगरपंचायत होऊ शकली नाही. त्यामुळे मंचर शहराचा विकास खुंटला आहे, असा आरोप भाजपाचे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे यांनी केला.

मंचर येथे भाजपाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी किसान मोर्चा पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय थोरात, तालुका भाजप अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले, उपाध्यक्ष भाजप पुणे विजय पवार, मंचर शहर अध्यक्ष नवनाथ बाणखेले, सुशांत थोरात, गणेश बाणखेले, रोहन खानदेशे, विकास बाणखेले, सोनल काळे, स्नेहल चासकर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

एरंडे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार म्हणून काम करताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आश्वासने देऊनही मागील सहा महिन्यांत मंचर येथे नगरपंचायत करू शकले नाही. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा महिन्यांपूर्वीच माळेगाव, देहूगाव येथे नगरपरिषद करून दाखवली आहे. महाविकास आघाडी सरकारने मंचर ग्रामस्थांची दिशाभूल करून विकासाचे गाजर दाखवले. राष्ट्रवादी व शिवसेनेला शहरात नगरपंचायत होऊनच द्यायची नाही, असे चित्र सध्या दिसत आहे. मात्र मंचर ग्रामपंचायतीमध्ये तिजोरीत खडखडाट असल्याने मंचर शहराचा विकास खुंटला आहे.

डॉ. ताराचंद कराळे म्हणाले, मंचर व घोडेगाव या दोन्ही गावांचा नगरपंचायतीचा प्रस्ताव पाठवून अनेक वेळा सर्वांनी पाठपुरावा केला. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री दिलीप वळसे पाटील व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असणारे शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या श्रेयवादामुळे मंचर शहराची नगरपंचायत होणे थांबले आहे. महाविकास आघाडी लोकांच्या भावनेशी खेळ करत असून नागरिकांना रस्ता, पाणी, वीज, आरोग्य या मूलभूत सेवा देण्यास ग्रामपंचायत कमी पडली आहे. यासंदर्भात कारवाई न झाल्यास आंबेगाव भाजपच्या वतीने आंदोलन छेडणार असल्याचे कराळे यांनी सांगितले.

संजय थोरात म्हणाले की मंचर शहरात महाविकास आघाडी होऊन नागरिकांचा तोटा झाला आहे. यांच्या हातात राज्याची सत्ता असूनही मंचर शहराचा विकास थांबला आहे. मंचर शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर असून यांना ती चालू करता आली नाही. तर शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग असून वेळेवर पाणी मिळत नाही, असेही त्यांनी सांगितले.