शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

इंदापुरात विकासकामांचा बोजवारा, निधीअभावी सदस्यांची मोठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 02:18 IST

जिल्हा परिषद व ग्रामपंचायतमधील दुवा म्हणून ओळखल्या जाणाºया पंचायत समितींना निधीअभावी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे विकासकामांचा तालुक्यात बोजवारा उडाला आहे.

काटी : जिल्हा परिषद व ग्रामपंचायतमधील दुवा म्हणून ओळखल्या जाणा-या पंचायत समितींना निधीअभावी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे विकासकामांचा तालुक्यात बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पंचायत समितींना ‘अच्छे दिन’ कधी येणार, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला आहे.इंदापूर तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये १४ सदस्य आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पंचायत समितीचे सदस्यपद नाममात्र बनले आहे. सदस्यांनी निवडणुकीत मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना विकासकामांचा निधीचा मोठा अडसर पडू लागला आहे.त्यामुळे सदस्यांना गावपातळीवर मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.शासनाकडून निधी मिळावा, यासाठी विविध मागण्यांसाठी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती सदस्यांनी उभा केलेला लढा शासनाच्या अनावस्थेमुळे केवळ कागदावरच राहिला आहे. जो तो सदस्य आपल्या परीने निधी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, शासनाकडून निधीला कात्री लावण्यात आल्याने विकासकामे कशी करायची, असा प्रश्न सदस्यांना पडला आहे.पंचायत समितीच्या गणामध्ये फिरताना सदस्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहन आहे तर डिझेल नाही आणि डिझेल आहे तर चालक नाही, अशी अवस्था झाली आहे. शिक्षक, ग्रामसेवक यांच्या बदलीचे अधिकारदेखील हिरावून घेतले आहेत. तसेच पंचायत समितीमध्ये येणाºया नागरिकांच्या गावपातळीवर तक्रारी ऐकून निवारण करणे एवढेच काम शिल्लक असल्याच्या भावना पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीमधून व्यक्त होत आहेत.जिल्ह्याच्या विकासकामांसाठी येणाºया निधीतील काही रक्कम कर्जमाफीकडे वळवण्याचा घाट शासनाने घातला आहे, तर उर्वरित निधी प्रशासनावर खर्च होणार आहे, निधीच नाही तर विकासकामे कुठून करावयाची, असा यक्ष प्रश्न सभापती व उपसभापतींच्या पुढे पडला आहे. उगाच निवडणूक लढवली आणि नागरिकांच्या रोषाला दररोज सामोरे जावे लागत असल्याने आगीतून उठून फुफाट्यात पडलो आहे, अशी अवस्था सदस्यांची झाली आहे.पंचायत समिती सदस्यांकडून अधिकाराची मागणीराज्याच्या अंदाजपत्रकात नियोजन खात्याने पंचायत समितीस बजेटमध्ये तरतूद करावी १४ व्या वित्त आयोगाप्रमाणे राज्य वित्त आयोगाचे अनुदान पंचायत समितीस मिळावे. जिल्हा परिषदेला मिळणाºया अनुदान व उत्पन्नातून पंचायत समितीला हिस्सा मिळावा, जिल्हा नियोजन समितीद्वारे देण्यात येणाºया अनुदानामध्ये आमदार व खासदार जिल्हा परिषद सदस्यांनी काम सुचविल्यानुसार योजना राबविता येते. त्या धर्तीवर पंचायत समिती सदस्यांना काम सुचविण्याचे अधिकार मिळावे.पंचायत समितींना वाढीव उपकराच्या दरामध्ये वाढ करावी. जि. प. सदस्यांना शासनाकडून जिल्हा नियोजन समितीकडून अनुदान देताना आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्यांच्या मागण्याप्रमाणे पंचायत समिती सदस्यांचा विचार करावा, मानधनात वाढ करावी, अशा मागण्या वारंवार करून ही दखल घेतली नाही. त्यामुळे सदस्यांना अच्छे दिन कधी येणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे२५/१५ जनसुविधा योजनेतून प्रत्येक पंचायत समिती गणाला वीस लाख रुपये ग्रामविकास खात्याकडून पंचवीस लाख प्रत्येक वर्षी मिळावेत. आतापर्यंत काहीच निधी न आल्यामुळे विकासकामे होत नाहीत. अशीच परिस्थिती राहिली तर ग्रामीण भागातील विकासांना खीळ बसेल. शासनाने दखल घेऊन ग्रामीण विकासावर भर द्यावा व निधी वर्ग करावा.- सतीश पांढरे,इंदापूर पंचायत समिती सदस्य

टॅग्स :Puneपुणे