शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

वाघ्या मुरळी लोककलावंतांच्या मानधनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:27 IST

पुणे: देवीचा गोंधळ, जागरण गोंधळ, धर्मजागरण, या द्वारे समाजसेवेचे कार्य करणारे वाघ्या मुरळी लोक कलावंतांच्या कामाला सुरुवात झाली. परंतु ...

पुणे: देवीचा गोंधळ, जागरण गोंधळ, धर्मजागरण, या द्वारे समाजसेवेचे कार्य करणारे वाघ्या मुरळी लोक कलावंतांच्या कामाला सुरुवात झाली. परंतु कोरोनामुळे त्यांना बोलावणे कमी झाले असून, त्यांच्या मानधनही अर्धे झाले आहे.

राज्यात लोककलावंतांचे ३ हजार १०० संच आहेत. एका संचात पाच ते आठ याप्रमाणे १० ते १५ हजार लोककलावंत आहेत.

संचारबंदीच्या काळात गोंधळाचे कार्यक्रम होऊ शकले नाही. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने सर्व गोष्टी चालू झाल्या आहेत. तसेच मंदिरे उघडल्याने धार्मिक विधींनाही सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने गोंधळीशी संवाद साधला.

मुंबई विद्यापीठ शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयक प्रा डॉ प्रकाश खांडगे म्हणाले,

लग्नसराईला सुरुवात झाली तरी वाघ्या मुरळी कलाकारांना बोलावण्याचे प्रमाण कमी आहे. सध्या जागेअभावी या मंडळींच्या वावरण्यावर मर्यादा येत आहेत. लोक घाबरून या मंडळींना बोलवत नाहीत. त्यांच्या मनातून अजूनही कोरोनाची भीती गेली नाही. सध्याचा गोंधळाचा कार्यक्रम एक तासभरच चालतो.

..............................

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर कलाकारांना शासकीय मदत मिळत आहे. कलाकारांच्या वतीने आर्थिक मदतीची मागणीही झाली आहे. पण वाघ्या मुरळी लोककलावंतांचा त्याबाबत विचार केला जात नाही. कार्यक्रमात मिळेल त्या मानधनात या कलावंतांना काम करावे लागत आहे.

राहुल पवार, सरचिटणीस,

वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य

.............................

सध्या आठवड्यातून एखादे काम मिळत आहे. आमच्या संचात आठ लोक आहेत. कोरोनाच्या अगोदर एका कार्यक्रमाला १५ हजार मिळत असतील. तर आता ८ हजार मध्ये काम करावं लागते. यंदा अनेकांनी गोंधळाचे कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.

-राजेंद्र माळवे , गोंधळी

.................................

संचारबंदीत परिस्थिती फारच बिकट होती. आता कामाला सुरुवात झाली आहे. आठवड्यात दोन कामे मिळतात. आता मिळेल त्या मानधनात काम करावे लागते. गोंधळाच्या कार्यक्रमाला येताना पाच ऐवजी दोनच माणसे घेऊन या. असेही सांगितले जाते.

अनिल शिंदे, गोंधळी