शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय कुलगुरू, जिल्हाधिकाऱ्यांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:29 IST

राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून काही महाविद्यालये सुरू झाली. ...

राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून काही महाविद्यालये सुरू झाली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याने महाविद्यालये पुन्हा बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात पुण्यात पत्रकार परिषदेत उदय सामंत यांने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व कुलगुरूंनी एकूण परिस्थितीचा आढावा घ्यावा, असे स्पष्ट केले.

महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी अद्याप वसतिगृहे सुरू झाली नाहीत. त्यामुळे पुण्याबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळेच सध्या महाविद्यालये सुरू होऊनसुद्धा ऑफलाइन वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प दिसत आहे. याबाबत सामंत म्हणाले, राज्यात अजूनही काही वसतिगृहे क्वारंटाइन सेंटर म्हणून कार्यरत आहेत. तसेच वसतिगृहातील एका खोलीत किती विद्यार्थी राहू शकतात, याबाबत यूजीसीने दिलेल्या निर्देशानुसार विद्यापीठाने नियमावली तयार करणे आवश्यक आहे.

दरम्यान, पुण्यातील काही महाविद्यालयांनी सध्या केवळ प्रात्यक्षिकांसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलवले आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवले आहे. आठवड्याभरात एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने सुरू केले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाविद्यालये सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.