शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय कुलगुरू, जिल्हाधिकाऱ्यांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:29 IST

राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून काही महाविद्यालये सुरू झाली. ...

राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून काही महाविद्यालये सुरू झाली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याने महाविद्यालये पुन्हा बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात पुण्यात पत्रकार परिषदेत उदय सामंत यांने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व कुलगुरूंनी एकूण परिस्थितीचा आढावा घ्यावा, असे स्पष्ट केले.

महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी अद्याप वसतिगृहे सुरू झाली नाहीत. त्यामुळे पुण्याबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळेच सध्या महाविद्यालये सुरू होऊनसुद्धा ऑफलाइन वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प दिसत आहे. याबाबत सामंत म्हणाले, राज्यात अजूनही काही वसतिगृहे क्वारंटाइन सेंटर म्हणून कार्यरत आहेत. तसेच वसतिगृहातील एका खोलीत किती विद्यार्थी राहू शकतात, याबाबत यूजीसीने दिलेल्या निर्देशानुसार विद्यापीठाने नियमावली तयार करणे आवश्यक आहे.

दरम्यान, पुण्यातील काही महाविद्यालयांनी सध्या केवळ प्रात्यक्षिकांसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलवले आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवले आहे. आठवड्याभरात एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने सुरू केले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाविद्यालये सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.