शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

आक्रोश शांत करण्यासाठी निर्णय; मात्र लढा चालूच ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:09 IST

मराठा समाजातील विविध संघटनांचा निर्धार पुणे : केंद्र शासनाने केलेल्या १०३ व्या घटना दुरुस्तीनुसार आर्थिकदृष्ट्या आणि दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक ...

मराठा समाजातील विविध संघटनांचा निर्धार

पुणे : केंद्र शासनाने केलेल्या १०३ व्या घटना दुरुस्तीनुसार आर्थिकदृष्ट्या आणि दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक आणि शासकीय सेवेतील नियुक्त्यांसाठी १० टक्के आरक्षण दिले आहे. त्यानुसारच मराठा समाजाची नाराजी, आक्रोश दूर करण्यासाठी काहीसा निर्णय घेतल्याचे जाणवत आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र, मूळ मागणीनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही लढा चालूच ठेवणार असल्याचा निर्धार मराठा संघटनांनी केला आहे.

चौकट

संभाजीराजेंच्या विरोधामुळे मराठा समाजाचे नुकसान झाले

“घटनादुरुस्ती कलम १०३ लागू करावे म्हणून आम्ही सातत्याने मागणी करत होतो. देशभर हे आरक्षण लागू केले आहे. मात्र, महाराष्ट्रात छत्रपती संभाजीराजे ज्या पद्धतीचे आरक्षण मागत आहे, ते ५० टक्क्यांच्या पुढे जात आहे. ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही. हे आम्ही वारंवार सांगत होतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे १०३ व्या घटनादुरुस्तीनुसार आरक्षणाची आम्ही मागणी करत होतो. मात्र, संभाजीराजे यांच्या विरोधामुळे राज्यशासन ते लागू करत नव्हते. त्यामुळे मराठा समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. आता मात्र हे आरक्षण जाहीर केल्याने आम्ही स्वागत करत आहोत.”

- अमोल काटे, खजिनदार, संभाजी ब्रिगेड

चौकट

आरक्षणाचा लढा चालूच ठेवणार

“मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी हा निर्णय चांगला आहे. तो मराठा समाजाला लाभदायक नाही. त्यामुळे आमच्या मूळ मागणीप्रमाणे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत आरक्षणाचा लढा चालूच ठेवणार आहे.”

- तुषार काकडे, प्रदेश प्रवक्ते, शिवसंग्राम संघटना

चौकट

शासनाने ठाम भूमिका मांडावी

“शासनाच्या निर्णयाचा आम्ही स्वीकार करतो. आरक्षणाची आमची व्यापक मागणी मात्र पूर्ण झालेली नाही. हा निर्णय मराठा समाजाला शांत करण्यासाठी घेतला आहे. आम्ही राज्य शासनाबरोबर यापुढेही पाठपुरावा करणार आहोत. राज्यातील अनेकांनी मराठा आरक्षणाबाबत खूप राजकारण केले आहे. ते मराठा समाजाला कळाले आहे. राज्य शासनाने आपली भूमिका मांडावी. त्यानंतर मराठा समाज पुढील दिशा ठरवणार आहे.”

- ॲड. अमृता मगर, पुणे जिल्हाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड