शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

दहावी परीक्षा रद्दचा निर्णय योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:10 IST

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेला दहावी परीक्षा रद्दचा निर्णय योग्य असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उचितच आहे. तसेच, काही ...

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेला दहावी परीक्षा रद्दचा निर्णय योग्य असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उचितच आहे. तसेच, काही वर्षांपासून इयत्ता दहावीला फारसे महत्त्व राहिले नाही. त्यामुळे परीक्षा रद्द झाल्याने फारसा फरक पडणार नाही. त्याचबरोबर परीक्षा देता आली नाही याबाबत अनेक हुशार विद्यार्थ्यांच्या मनात खंत राहणार आहे, अशा संमिश्र प्रतिक्रिया शिक्षण विश्वातून व्यक्त होत आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे करण्याचे शासनाने जाहीर केले. याबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शासन आदेशानुसार राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांचे गुण सर्व शाळांकडून मागविले जाणार आहे. इयत्ता नववी व दहावी विद्यार्थ्यांची मूल्यांकन पद्धती एकसारखी आहे. त्यामुळे निकाल जाहीर करण्यास फारशी अडचण येणार नाही, असे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून सांगितले जात आहे.

--------------

राज्य शासन व राज्य मंडळाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांनुसार आता इयत्ता दहावीचा निकाल तयार करावा लागणार आहे. सर्व शिक्षकांनी त्यास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. इयत्ता नववी व दहावीची मूल्यमापन पद्धती एक सारखी आहे. त्यामुळे विद्यार्थी व शाळांच्या दृष्टीने हा निर्णय समाधानकारक आहे.

- हरिश्चंद्र गायकवाड ,अध्यक्ष मुख्याध्यापक संघ, पुणे

-----------

वर्षभर अभ्यास करूनही आपल्याला परीक्षा देऊन क्षमता दाखवता आली नाही, याबाबतची खंत हुशार विद्यार्थ्यांमध्ये असणार आहे. तसेच इयत्ता अकरावीसाठी प्रवेश पूर्व परीक्षेची तयारी करावी किंवा करू नये, असा संभ्रम अनेक विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

- नारायण शिंदे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना, पुणे

-------------------

गेल्या काही वर्षांपासून इयत्ता दहावीच्या परीक्षेला फारसे महत्त्व राहिले असे वाटत नाही. फुगलेले गुण म्हणजे काय? हे यामुळे कदाचित समजू शकेल. तसेच आपल्या ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष व्यवहारात करतात तेच पुढील काळात स्पर्धेत टिकतात. हे अधोरेखित होईल.

- पुष्पलता पवार, माजी सचिव, पुणे विभागीय शिक्षण मंडळ

---------------------

शिक्षकांनी वेळ घालवू नये

शाळांनी राज्य मंडळाकडे कोणत्या आराखड्यामध्ये इयत्ता दहावीच्या निकालासाठी गुण पाठवावेत, याबाबतच्या सूचना अद्याप शाळांना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या आराखड्यात निकाल तयार करण्यामध्ये आपला वेळ घालवू नये, असे आवाहन मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी केले आहे.