शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

दहावी परीक्षा रद्दचा निर्णय योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:10 IST

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेला दहावी परीक्षा रद्दचा निर्णय योग्य असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उचितच आहे. तसेच, काही ...

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेला दहावी परीक्षा रद्दचा निर्णय योग्य असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उचितच आहे. तसेच, काही वर्षांपासून इयत्ता दहावीला फारसे महत्त्व राहिले नाही. त्यामुळे परीक्षा रद्द झाल्याने फारसा फरक पडणार नाही. त्याचबरोबर परीक्षा देता आली नाही याबाबत अनेक हुशार विद्यार्थ्यांच्या मनात खंत राहणार आहे, अशा संमिश्र प्रतिक्रिया शिक्षण विश्वातून व्यक्त होत आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे करण्याचे शासनाने जाहीर केले. याबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शासन आदेशानुसार राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांचे गुण सर्व शाळांकडून मागविले जाणार आहे. इयत्ता नववी व दहावी विद्यार्थ्यांची मूल्यांकन पद्धती एकसारखी आहे. त्यामुळे निकाल जाहीर करण्यास फारशी अडचण येणार नाही, असे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून सांगितले जात आहे.

--------------

राज्य शासन व राज्य मंडळाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांनुसार आता इयत्ता दहावीचा निकाल तयार करावा लागणार आहे. सर्व शिक्षकांनी त्यास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. इयत्ता नववी व दहावीची मूल्यमापन पद्धती एक सारखी आहे. त्यामुळे विद्यार्थी व शाळांच्या दृष्टीने हा निर्णय समाधानकारक आहे.

- हरिश्चंद्र गायकवाड ,अध्यक्ष मुख्याध्यापक संघ, पुणे

-----------

वर्षभर अभ्यास करूनही आपल्याला परीक्षा देऊन क्षमता दाखवता आली नाही, याबाबतची खंत हुशार विद्यार्थ्यांमध्ये असणार आहे. तसेच इयत्ता अकरावीसाठी प्रवेश पूर्व परीक्षेची तयारी करावी किंवा करू नये, असा संभ्रम अनेक विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

- नारायण शिंदे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना, पुणे

-------------------

गेल्या काही वर्षांपासून इयत्ता दहावीच्या परीक्षेला फारसे महत्त्व राहिले असे वाटत नाही. फुगलेले गुण म्हणजे काय? हे यामुळे कदाचित समजू शकेल. तसेच आपल्या ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष व्यवहारात करतात तेच पुढील काळात स्पर्धेत टिकतात. हे अधोरेखित होईल.

- पुष्पलता पवार, माजी सचिव, पुणे विभागीय शिक्षण मंडळ

---------------------

शिक्षकांनी वेळ घालवू नये

शाळांनी राज्य मंडळाकडे कोणत्या आराखड्यामध्ये इयत्ता दहावीच्या निकालासाठी गुण पाठवावेत, याबाबतच्या सूचना अद्याप शाळांना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या आराखड्यात निकाल तयार करण्यामध्ये आपला वेळ घालवू नये, असे आवाहन मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी केले आहे.