शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

समाविष्ट ३४ गावांबाबत २४ तासांत निर्णय घ्या

By admin | Updated: October 27, 2016 05:15 IST

राज्य शासनाकडून पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये ३४ गावांचा समावेश केला जाणार आहे अथवा नाही, याबाबतचा निर्णय कळविण्यासाठी उच्च न्यायालयाने शेवटची २४ तासांची

पुणे : राज्य शासनाकडून पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये ३४ गावांचा समावेश केला जाणार आहे अथवा नाही, याबाबतचा निर्णय कळविण्यासाठी उच्च न्यायालयाने शेवटची २४ तासांची मुदत दिली आहे. गुरुवारी दुपारी ११ वाजेपर्यंत शासनाने याबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश बुधवारी उच्च न्यायालयाने दिले आहे. गावांच्या समावेशाबाबत अनुकूल व प्रतिकूल अशी कोणतीही भूमिका घेतली तरी त्याचे पडसाद महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये उमटण्याची शक्यता असल्याने भाजपा सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. महापालिकेच्या हद्दीलगतची मांजरी, फुरसुंगी, उरुळी, गुजरवाडी, मांगडेवाडी, नांदोशी, किरकटवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, खडकवासला, नांदेड, आंबेगाव खुर्द, धायरी, नऱ्हे आदी ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या दरबारी प्रलंबित आहे. याप्रकरणी हवेली तालुका नागरी कृती समितीच्या वतीने अध्यक्ष श्रीरंग चव्हाण, पोपटराव खेडेकर, बाळासाहेब हगवणे, संदीप तुपे, सुभाष नाणेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महापालिका निवडणुकींची ४ सदस्यीय प्रभागरचना नुकतीच जाहीर झाली आहे, त्यामुळे गावांचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यास प्रभागरचनेचे काम पुन्हा नव्याने करावे लागणार आहे. या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गावांचा पालिकेत समावेश करण्याचा शासनाचा विचार नाही. त्याचबरोबर गावांचा समावेश करायचा नसल्याची भूमिका शासनाने मांडल्यास जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्याचा मोठा फटका भाजपाला बसू शकतो. त्यामुळे दुहेरी पेचामध्ये सरकार अडकले आहे. शासन या पेचातून काय मार्ग काढते, याबाबत उत्सुकता वाढली आहे.महापालिकेमध्ये ३४ गावांचा समावेश करण्यासंदर्भात हरकती आणि सूचना मागवून २०१४ मध्ये याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गावांचा समावेश करण्यासंदर्भात एकमत नसल्यामुळे आघाडी सरकारच्या काळात या गावांचा पालिकेत समावेश होऊ शकला नाही. त्यानंतर राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनीही गावांचा पालिकेत समावेश करण्याबाबत कोणतीच भूमिका घेतलेली नव्हती. सहा महिने मुदतवाढीस नकारबुधवारी न्यायालयामध्ये या याचिकेवर सुनावणी सुरू झाल्यानंतर राज्य शासनाने याबाबतचा निर्णय घेण्यासाठी पुन्हा ६ महिन्यांची मुदतवाढ मिळावी, असे म्हणणे सरकारी वकिलांमार्फत मांडले. न्यायालयाने पुन्हा मुदतवाढ देण्यास नकार देऊन गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत.