शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

नियोजनाअभावी दिवसाआड पाणी

By admin | Updated: October 14, 2015 03:32 IST

साठवण तलावाचे काम रेंगाळल्यामुळे बारामतीत ऐन सणाच्या काळात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. कमी पडलेला पाऊस, लांबलेल्या आवर्तनामुळे पाण्याचे नियोजन करावे लागत आहे

बारामती : साठवण तलावाचे काम रेंगाळल्यामुळे बारामतीत ऐन सणाच्या काळात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. कमी पडलेला पाऊस, लांबलेल्या आवर्तनामुळे पाण्याचे नियोजन करावे लागत आहे. तसे नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु, मागील तीन वर्षांपासून साठवण तलावाचे काम रेंगाळत चालले आहे. बारामती नगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पहिल्या साठवण तलावाचे काम देण्यात आले. या साठवण तलावाला वर्षभरातच मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. दररोज दोन ते अडीच लाख लिटर पाणी वाहून जाऊ लागले. गळती काढण्यासाठी अगोदर बांधलेल्या सिमेंटच्या साठवण तलावातील पाणी उपसा करावा लागला. त्यानंतर गळती थांबविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तलावाचा तळ काँक्रीट मजबूत नसल्यामुळे गळतीचे प्रमाण कमी झाले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून १२८ दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव बांधण्यात आला. त्यानंतर वर्षभरातच या तलावाला गळती लागली. पाणीपुरवठा विभागाने मोटारी लावून वाहून जाणारे पाणी पुन्हा तलावात सोडण्याचे काम ७ ते ८ महिने केले. सातत्याने जीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी केली. तलावातील पाण्याचा उपसा केला. लाखो लिटर पाणी वाया गेले. आता ऐन सणाच्या काळात पाण्याची टंचाई जाणवत आहे. ज्या ठेकेदाराने पहिल्या साठवण तलावाचे काम केले आहे, त्यालाच ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाणी साठवण तलावाचे काम तीन वर्षांपूर्वी देण्यात आले आहे. कामाचा वेग सुरुवातीपासूनच मंदावला आहे. दरम्यानच्या काळात पाणीटंचाई असल्याने तसेच, अगोदर बांधलेल्या तलावातील पाण्याची गळती होत असल्यामुळे केलेल्या खोदकामातच कालव्याचे पाणी अडविण्यात आले. त्यामुळे काम थांबले. त्यानंतर अगोदरच्या सिमेंट तलावाची गळती काढण्यासाठी पाण्याचा उपसा केला. त्यामुळे काम सुरू असलेल्या तलावात पुन्हा कालव्याचे पाणी साठविण्यात आले. आता तलावात सतत पाणी असल्याची ओरड ठेकेदाराकडून होत आहे. त्यामुळे साठवण तलावाचे काम पूर्ण होत नाही. तलाव रिकामा करून दिल्यास लवकरच काम पूर्ण होईल, असे त्यांच्याकडून सांगितले जाते. वास्तविक, या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. ठेकेदाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केलेल्या मागणीप्रमाणे वाढीव निधीलादेखील नगरपालिकेने मंजुरी दिली आहे. तरीदेखील काम रखडले आहे. (प्रतिनिधी)