शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

नियोजनाअभावी दिवसाआड पाणी

By admin | Updated: October 14, 2015 03:32 IST

साठवण तलावाचे काम रेंगाळल्यामुळे बारामतीत ऐन सणाच्या काळात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. कमी पडलेला पाऊस, लांबलेल्या आवर्तनामुळे पाण्याचे नियोजन करावे लागत आहे

बारामती : साठवण तलावाचे काम रेंगाळल्यामुळे बारामतीत ऐन सणाच्या काळात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. कमी पडलेला पाऊस, लांबलेल्या आवर्तनामुळे पाण्याचे नियोजन करावे लागत आहे. तसे नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु, मागील तीन वर्षांपासून साठवण तलावाचे काम रेंगाळत चालले आहे. बारामती नगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पहिल्या साठवण तलावाचे काम देण्यात आले. या साठवण तलावाला वर्षभरातच मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. दररोज दोन ते अडीच लाख लिटर पाणी वाहून जाऊ लागले. गळती काढण्यासाठी अगोदर बांधलेल्या सिमेंटच्या साठवण तलावातील पाणी उपसा करावा लागला. त्यानंतर गळती थांबविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तलावाचा तळ काँक्रीट मजबूत नसल्यामुळे गळतीचे प्रमाण कमी झाले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून १२८ दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव बांधण्यात आला. त्यानंतर वर्षभरातच या तलावाला गळती लागली. पाणीपुरवठा विभागाने मोटारी लावून वाहून जाणारे पाणी पुन्हा तलावात सोडण्याचे काम ७ ते ८ महिने केले. सातत्याने जीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी केली. तलावातील पाण्याचा उपसा केला. लाखो लिटर पाणी वाया गेले. आता ऐन सणाच्या काळात पाण्याची टंचाई जाणवत आहे. ज्या ठेकेदाराने पहिल्या साठवण तलावाचे काम केले आहे, त्यालाच ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाणी साठवण तलावाचे काम तीन वर्षांपूर्वी देण्यात आले आहे. कामाचा वेग सुरुवातीपासूनच मंदावला आहे. दरम्यानच्या काळात पाणीटंचाई असल्याने तसेच, अगोदर बांधलेल्या तलावातील पाण्याची गळती होत असल्यामुळे केलेल्या खोदकामातच कालव्याचे पाणी अडविण्यात आले. त्यामुळे काम थांबले. त्यानंतर अगोदरच्या सिमेंट तलावाची गळती काढण्यासाठी पाण्याचा उपसा केला. त्यामुळे काम सुरू असलेल्या तलावात पुन्हा कालव्याचे पाणी साठविण्यात आले. आता तलावात सतत पाणी असल्याची ओरड ठेकेदाराकडून होत आहे. त्यामुळे साठवण तलावाचे काम पूर्ण होत नाही. तलाव रिकामा करून दिल्यास लवकरच काम पूर्ण होईल, असे त्यांच्याकडून सांगितले जाते. वास्तविक, या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. ठेकेदाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केलेल्या मागणीप्रमाणे वाढीव निधीलादेखील नगरपालिकेने मंजुरी दिली आहे. तरीदेखील काम रखडले आहे. (प्रतिनिधी)