शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी दिवसाआड पाणी

By admin | Updated: October 14, 2015 03:32 IST

साठवण तलावाचे काम रेंगाळल्यामुळे बारामतीत ऐन सणाच्या काळात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. कमी पडलेला पाऊस, लांबलेल्या आवर्तनामुळे पाण्याचे नियोजन करावे लागत आहे

बारामती : साठवण तलावाचे काम रेंगाळल्यामुळे बारामतीत ऐन सणाच्या काळात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. कमी पडलेला पाऊस, लांबलेल्या आवर्तनामुळे पाण्याचे नियोजन करावे लागत आहे. तसे नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु, मागील तीन वर्षांपासून साठवण तलावाचे काम रेंगाळत चालले आहे. बारामती नगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पहिल्या साठवण तलावाचे काम देण्यात आले. या साठवण तलावाला वर्षभरातच मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. दररोज दोन ते अडीच लाख लिटर पाणी वाहून जाऊ लागले. गळती काढण्यासाठी अगोदर बांधलेल्या सिमेंटच्या साठवण तलावातील पाणी उपसा करावा लागला. त्यानंतर गळती थांबविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तलावाचा तळ काँक्रीट मजबूत नसल्यामुळे गळतीचे प्रमाण कमी झाले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून १२८ दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव बांधण्यात आला. त्यानंतर वर्षभरातच या तलावाला गळती लागली. पाणीपुरवठा विभागाने मोटारी लावून वाहून जाणारे पाणी पुन्हा तलावात सोडण्याचे काम ७ ते ८ महिने केले. सातत्याने जीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी केली. तलावातील पाण्याचा उपसा केला. लाखो लिटर पाणी वाया गेले. आता ऐन सणाच्या काळात पाण्याची टंचाई जाणवत आहे. ज्या ठेकेदाराने पहिल्या साठवण तलावाचे काम केले आहे, त्यालाच ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाणी साठवण तलावाचे काम तीन वर्षांपूर्वी देण्यात आले आहे. कामाचा वेग सुरुवातीपासूनच मंदावला आहे. दरम्यानच्या काळात पाणीटंचाई असल्याने तसेच, अगोदर बांधलेल्या तलावातील पाण्याची गळती होत असल्यामुळे केलेल्या खोदकामातच कालव्याचे पाणी अडविण्यात आले. त्यामुळे काम थांबले. त्यानंतर अगोदरच्या सिमेंट तलावाची गळती काढण्यासाठी पाण्याचा उपसा केला. त्यामुळे काम सुरू असलेल्या तलावात पुन्हा कालव्याचे पाणी साठविण्यात आले. आता तलावात सतत पाणी असल्याची ओरड ठेकेदाराकडून होत आहे. त्यामुळे साठवण तलावाचे काम पूर्ण होत नाही. तलाव रिकामा करून दिल्यास लवकरच काम पूर्ण होईल, असे त्यांच्याकडून सांगितले जाते. वास्तविक, या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. ठेकेदाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केलेल्या मागणीप्रमाणे वाढीव निधीलादेखील नगरपालिकेने मंजुरी दिली आहे. तरीदेखील काम रखडले आहे. (प्रतिनिधी)