शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

रसायनमिश्रित पाण्याने डाळींब बागाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:12 IST

पाटेठाण: येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने रसायनमिश्रित पाणी मुळा-मुठा नदीत सोडले. त्यानंतर तेच पाणी राहू येथील शेतकऱ्याने शेततळ्यास ...

पाटेठाण: येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने रसायनमिश्रित पाणी मुळा-मुठा नदीत सोडले. त्यानंतर तेच पाणी राहू येथील शेतकऱ्याने शेततळ्यास साठवून त्याचा पिकांसाठी वापर केल्याने डाळींब बागांचे नुकसान झाले आहे. तर शेततळ्यातील मासेदेखील मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, या शेतकऱ्याने रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात न सोडण्याबरोबर झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे.

राहू येथील रणजित देशमुख यांचे येथील श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यानजीकच शेतीक्षेत्र आहे. शेतात त्यांनी दोन शेततळी तयार केली असून, त्यामध्ये मुळा-मुठा नदीवरुन कृषी विद्युत पंपाच्या माध्यमातून पाणीउपसा करत उसाला, फळबागांना पाणी दिले जात आहे. मागील आठवड्यात वीजबिल वसुली कालावधीत अनेक विद्युत पंप बंद होते. परंतु देशमुख यांचे विद्युत मोटारी चालू असताना कारखान्यातून नदीपात्रात सोडलेले रसायनमिश्रित पाणी पाणी विद्युतपंपातून शेततळ्यात आले. त्यामुळे शेततळ्यातील मासे मृत पावले आहेत. त्याचबरेाबर या पाण्याचा वापर शेतीला देखील करण्यात आला होता. त्यामुळे डाळींब बागांचे नुकसान झाले असून त्याचबरोबर इतर पिकांना देखील फटका बसला आहे.

यासंदर्भात बोलताना रणजित देशमुख म्हणाले, संपूर्ण शेततळ्यातील पाण्यावर रसायनमिश्रित पाण्याचा तवंग तयार झाला असून तळ्यातील सगळेच मासे मृत्यू पावले आहेत. डाळिंब बागांना देखील याच शेततळ्यातील पाण्याचा वापर झाल्याने बागांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कारखान्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कारखाना व्यवस्थापनाकडून नदीत तसेच परिसरात कुठेही रसायनमिश्रित पाणी सोडले जात नसून प्रयोगशाळेत चाचणी घेऊन त्यातील एन.पी.के ची तपासणी करून पूर्ण प्रक्रियायुक्त हे पाणी असून ते रसायनमिश्रित नाही. येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. - प्रकाश मते सरव्यवस्थापक, श्रीनाथ म्हसकोबा कारखाना पाटेठाण.

२५ पाटेठाण