शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

रसायनमिश्रित पाण्याने डाळींब बागाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:12 IST

पाटेठाण: येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने रसायनमिश्रित पाणी मुळा-मुठा नदीत सोडले. त्यानंतर तेच पाणी राहू येथील शेतकऱ्याने शेततळ्यास ...

पाटेठाण: येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने रसायनमिश्रित पाणी मुळा-मुठा नदीत सोडले. त्यानंतर तेच पाणी राहू येथील शेतकऱ्याने शेततळ्यास साठवून त्याचा पिकांसाठी वापर केल्याने डाळींब बागांचे नुकसान झाले आहे. तर शेततळ्यातील मासेदेखील मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, या शेतकऱ्याने रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात न सोडण्याबरोबर झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे.

राहू येथील रणजित देशमुख यांचे येथील श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यानजीकच शेतीक्षेत्र आहे. शेतात त्यांनी दोन शेततळी तयार केली असून, त्यामध्ये मुळा-मुठा नदीवरुन कृषी विद्युत पंपाच्या माध्यमातून पाणीउपसा करत उसाला, फळबागांना पाणी दिले जात आहे. मागील आठवड्यात वीजबिल वसुली कालावधीत अनेक विद्युत पंप बंद होते. परंतु देशमुख यांचे विद्युत मोटारी चालू असताना कारखान्यातून नदीपात्रात सोडलेले रसायनमिश्रित पाणी पाणी विद्युतपंपातून शेततळ्यात आले. त्यामुळे शेततळ्यातील मासे मृत पावले आहेत. त्याचबरेाबर या पाण्याचा वापर शेतीला देखील करण्यात आला होता. त्यामुळे डाळींब बागांचे नुकसान झाले असून त्याचबरोबर इतर पिकांना देखील फटका बसला आहे.

यासंदर्भात बोलताना रणजित देशमुख म्हणाले, संपूर्ण शेततळ्यातील पाण्यावर रसायनमिश्रित पाण्याचा तवंग तयार झाला असून तळ्यातील सगळेच मासे मृत्यू पावले आहेत. डाळिंब बागांना देखील याच शेततळ्यातील पाण्याचा वापर झाल्याने बागांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कारखान्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कारखाना व्यवस्थापनाकडून नदीत तसेच परिसरात कुठेही रसायनमिश्रित पाणी सोडले जात नसून प्रयोगशाळेत चाचणी घेऊन त्यातील एन.पी.के ची तपासणी करून पूर्ण प्रक्रियायुक्त हे पाणी असून ते रसायनमिश्रित नाही. येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. - प्रकाश मते सरव्यवस्थापक, श्रीनाथ म्हसकोबा कारखाना पाटेठाण.

२५ पाटेठाण