शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

शहरात सायंकाळी ५ नंतर संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:09 IST

पुणे : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे शहरात सायंकाळी ५ ...

पुणे : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे शहरात सायंकाळी ५ वाजल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कामे संपवून सायंकाळी ५ वाजण्याच्या आत घरी परतावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

राज्य शासनाने कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार वाढू नये म्हणून राज्यात पुन्हा कडक नियम लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शहरातील आस्थापना सायंकाळी ४ वाजेपर्यंतच उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. हॉटेलदेखील ४ वाजेनंतर बंद राहतील. त्यानंतरचा एक तास हा नागरिकांना आपापल्या घरी जाण्यासाठी देण्यात आला आहे.

शहरात सोमवारपासून पुढील आदेशापर्यंत सायंकाळी पाच ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेदरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावेळी नागरिकांना फक्त अत्यावश्यक कारणासाठीच बाहेर पडण्यास परवानगी राहणार आहे. नागरिकांनी सायंकाळी पाचनंतर विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस सहआयुक्तांनी केले आहे. विनाकारण बाहेर पडल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.