शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

गर्दीच्या नियमांचा दुकानदारांना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:11 IST

पिंपरी : जमावबंदी कायद्यातील नियमांवर बोट ठेवत सर्वच दुकानांवर कारवाई केली जात आहे. एक टेबल असणारे दोनशे चौरस फूट ...

पिंपरी : जमावबंदी कायद्यातील नियमांवर बोट ठेवत सर्वच दुकानांवर कारवाई केली जात आहे. एक टेबल असणारे दोनशे चौरस फूट दुकान आणि दोन हजार चौरस फुटांच्या दुकानालाही एकच न्याय लावला जात आहे. नियम सुस्पष्ट नसल्याने कारवाईचा बडगा उगारला जात आहे. नियमात स्पष्टता आणावी आणि टाळेबंदी करू नये, अशी भूमिका मिठाई विक्रेत्यांनी मांडली आहे.

संपूर्ण टाळेबंदी असल्याची समजूत झाल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मिठाई नाशवंत असल्याने ती फेकून देण्याची वेळ येते की काय, अशी धास्ती विक्रेत्यांमध्ये पसरली होती. गुढीपाडव्याला मिठाईच्या पदार्थांना मोठी मागणी असते. त्यासाठीची लगबग सुरू झाली आहे. अशातच टाळेबंदी लागू झाल्याचा समज झाल्याने मिठाई विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मिठाई आणि बेकरीला त्यातून सूट दिली असल्याने विक्रेत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

——

शनिवार आणि रविवारी मिठाई दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे की नाही, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. जमावबंदी कायद्यानुसार पाच जणांना एकत्र येता येत नाही. हा नियम खासगी दुकानांना सरसकट लावला जात आहे. एखादे दुकान दोन हजार चौरस फुटांचे असल्यास तेथे अनेक काउंटर असतात. अशा दुकानांना पाचचा नियम कसा लागू होईल.

- श्रीकृष्ण चितळे, कार्याध्यक्ष, मिठाई फरसाण असोसिएशन

——

टाळेबंदीसारखा निर्णय मिठाई उत्पादकांना परवडणारा नाही. खव्यासारखे पदार्थ टाकून द्यावे लागतील. दुकान भाडे, आचारी आणि कामगारांचे वेतन, वीज असे अनेक खर्च आहे. गुढीपाडवा तोंडावर आहे. आम्ही नियमांचे पालन करून ग्राहकांना दुकानात प्रवेश देतो. नोंदवही, तापमापकाद्वारे तपासणी करणे आणि एकाच वेळी दुकानात पाच जण उपस्थित असतील याची दक्षता घेतली जाते.

- सारंग अगरवाल, मिठाई व्यावसायिक, पीसीएमसी लिंक रोड