शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

पिके गेली पाण्यात

By admin | Updated: October 11, 2016 02:03 IST

गेल्या महिनाभरापासून पावसाने थैमान घातले असून, या पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले

राजेगाव : राजेगाव (ता. दौंड) परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने थैमान घातले असून, या पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सततच्या पडणाऱ्या पावसाने तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागलेल्या या भागातील जनतेला आता ओल्या दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. पावसामुळे येथील पिके जमीनदोस्त झाली आहे. सततच्या पडणाऱ्या पावसाने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. काढणीला आलेली बाजरीची मळणी करताना शेतकरी मेटाकुटीला आलेले दिसत आहेत. त्यामुळे पुरे आता पाऊस, असे म्हणून पाऊस बंद होण्यासाठी शेतकरी देवाकडे विनवणी करू लागले आहेत. विविध ठिकाणच्या पाटबंधारे विभागाच्या वसाहतींतील पर्जन्यमापकांनुसार आज सकाळी नोंद झालेला पाऊस (कंसात या मोसमातील आजपर्यंतचा एकूण पाऊस) असा : दौंड ३ मिमी (३०३ मिमी), बोरीबेल ५६ (४३७), रावणगाव ६५ (४८६), भिगवण स्टेशन (राजेगाव परिसर) २७ मिमी (५२६ मिमी). पावसाचा जोर अजूनही कायम असून या परिसरातील ओढे-नाले खळाखळा वाहत असून, शेतातील काही सखल भागात चक्क पाण्याची तळी साचल्याचे चित्र वाटलूज, नायगाव, मलठण, राजेगाव या भागात पाहायला मिळत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कशीबशी जगवलेली पिके आज पाण्याखाली गेल्याचे विदारक चित्र दिसत आहे.वास्तविक पाहता, कोरडवाहू भागात घेतली जाणारी उडीद, तूर, मूग सोयाबीन ही पिके कमी पाण्यात व कमी दिवसांत समाधानकारक उत्पन्न मिळवून देतात म्हणून या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी घेतली होती. मात्र, पक्व होत आलेली ही पिके जादाच्या पावसाने सोडून द्यावी लागली आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)