शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

पिके, फळबागांचे अतोनात नुकसान

By admin | Updated: March 3, 2015 22:59 IST

पुरंदर तालुक्यात शनिवार, रविवार दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपले. शेतकऱ्यांच्या शेतातील पिके, फळबागा यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

खळद : पुरंदर तालुक्यात शनिवार, रविवार दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपले. शेतकऱ्यांच्या शेतातील पिके, फळबागा यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सासवड, राजुरी, नायगाव, रिसे, पिसे, खळद, शिवरी, वाळुंज, निळुंज, एखतपूर-मुंजवडी, पारगाव, खानवडी, कुंभारवळण, पोमणनगर व तालुक्यात सर्वत्र दोन दिवस भीज पाऊस झाला. सोमवारी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे सर्वत्र पाणी साचले असून, रस्ते, शिवार जलमय झाल्याचे दिसत आहे. राजुरी येथील शेतकरी मा. ग्रा. सदस्य रमेश भगत, सुधाकर भगत, किसन भगत, मल्हारी चव्हाण, मुक्ताजी भगत, संपत भगत, बबन भगत, वाळुंजचे संजय चौरे, राजाराम म्हेत्रे, खळदचे गणेश जाधव, राजेंद्र चव्हाण यांनी या वर्षी पावसाने ओढ दिली होती. यामुळे खरिपाच्या पेरण्याही झाल्या नव्हत्या, तर उशिरा झालेल्या थोड्या फार पावसाने रब्बीच्या पेरण्या झाल्या व कशीबशी पिके आली होती. सध्या शेतात ज्वारी, हरभरा, गहू यांची काढणी सुरू आहे. काही भागांत शेतात काढलेली ज्वारी, गहू, कांदा, हरभरा, वैरण जशीच्या तशीच पडून आहे. अचानक आलेल्या पावसाने याचे अतोनात नुकसान झाले आहे. यंदा आंबाही चांगला बहरला होता. पण, हवामानातील बदल व अवकाळी पाऊस याने मोहोराची गळती होऊन झाडे मोकळी झाली असल्याचे दिसत आहे. शासनाने या भागाची पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.४मार्च महिन्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी घेतलेल्या सोसायटीच्या कर्जाची परतफेड करावी लागते. यासाठी रब्बीत चांगले उत्पन्न मिळाले, तर चार पैसे शेतक ऱ्यांना मिळतात व यातून हा भरणा होतो. पण, आता पिकांचेच नुकसान झाल्याने उत्पन्नात घट होत आर्थिक फटका बसला आहे.पंचनाम्यांना सुरुवात४नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असल्याचे जेजुरी मंडल कृषी अधिकारी आर. डब्लू. नलावडे यांनी सांगितले. यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आपापल्या गावोगावी नुकसानीचे पंचनामे करतील. यात कोणतेही बोगस पंचनामे होणार नाही, यासाठी मंडल, तालुका, जिल्हा, विभागीयस्तरावरूनही फेरतपासणी होणार असल्याचे सांगत एकही बोगस पंचनामा होणार नसल्याचा विश्वास दिला.ओझर : दोन दिवसांपूर्वी सलग २४ तास झालेल्या अवकाळी पावसामुळे जुन्नर तालुक्यात सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभाग व महसूल विभागाच्या वतीने संयुक्तपणे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांनी दिले. तालुक्यात द्राक्ष, डाळिंब, गहू, कांदा, आंबा, हरभरा, या पिकांचे नुकसान झाले. द्राक्षपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, तालुक्यात गुुंजाळवाडी, नारायणगाव व गोळेगाव या गावांमध्ये द्राक्षपीक मोठ्या प्रमाणात आहे. गोलेगावमधील द्राक्षे नुकसानापासून वाचली आहेत.तालुक्यात १५० हेक्टर द्राक्षे, १०० हेक्टर आंबा, १ हजार ५०० हेक्टर गहू, ७ हजार एकर कांदा व डांळिबाचे क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम तातडीने सुरू असून कृषी व महसूल विभागांचे तलाठी, ग्र्रामसेवकांनी दि. ३ पासून पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. चार दिवसांत पंचनामे पूर्ण करण्यात येणारे असल्याचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी बी. बी. वाणी यांनी सांगितले.