शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पिके, फळबागांचे अतोनात नुकसान

By admin | Updated: March 3, 2015 22:59 IST

पुरंदर तालुक्यात शनिवार, रविवार दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपले. शेतकऱ्यांच्या शेतातील पिके, फळबागा यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

खळद : पुरंदर तालुक्यात शनिवार, रविवार दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपले. शेतकऱ्यांच्या शेतातील पिके, फळबागा यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सासवड, राजुरी, नायगाव, रिसे, पिसे, खळद, शिवरी, वाळुंज, निळुंज, एखतपूर-मुंजवडी, पारगाव, खानवडी, कुंभारवळण, पोमणनगर व तालुक्यात सर्वत्र दोन दिवस भीज पाऊस झाला. सोमवारी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे सर्वत्र पाणी साचले असून, रस्ते, शिवार जलमय झाल्याचे दिसत आहे. राजुरी येथील शेतकरी मा. ग्रा. सदस्य रमेश भगत, सुधाकर भगत, किसन भगत, मल्हारी चव्हाण, मुक्ताजी भगत, संपत भगत, बबन भगत, वाळुंजचे संजय चौरे, राजाराम म्हेत्रे, खळदचे गणेश जाधव, राजेंद्र चव्हाण यांनी या वर्षी पावसाने ओढ दिली होती. यामुळे खरिपाच्या पेरण्याही झाल्या नव्हत्या, तर उशिरा झालेल्या थोड्या फार पावसाने रब्बीच्या पेरण्या झाल्या व कशीबशी पिके आली होती. सध्या शेतात ज्वारी, हरभरा, गहू यांची काढणी सुरू आहे. काही भागांत शेतात काढलेली ज्वारी, गहू, कांदा, हरभरा, वैरण जशीच्या तशीच पडून आहे. अचानक आलेल्या पावसाने याचे अतोनात नुकसान झाले आहे. यंदा आंबाही चांगला बहरला होता. पण, हवामानातील बदल व अवकाळी पाऊस याने मोहोराची गळती होऊन झाडे मोकळी झाली असल्याचे दिसत आहे. शासनाने या भागाची पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.४मार्च महिन्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी घेतलेल्या सोसायटीच्या कर्जाची परतफेड करावी लागते. यासाठी रब्बीत चांगले उत्पन्न मिळाले, तर चार पैसे शेतक ऱ्यांना मिळतात व यातून हा भरणा होतो. पण, आता पिकांचेच नुकसान झाल्याने उत्पन्नात घट होत आर्थिक फटका बसला आहे.पंचनाम्यांना सुरुवात४नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असल्याचे जेजुरी मंडल कृषी अधिकारी आर. डब्लू. नलावडे यांनी सांगितले. यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आपापल्या गावोगावी नुकसानीचे पंचनामे करतील. यात कोणतेही बोगस पंचनामे होणार नाही, यासाठी मंडल, तालुका, जिल्हा, विभागीयस्तरावरूनही फेरतपासणी होणार असल्याचे सांगत एकही बोगस पंचनामा होणार नसल्याचा विश्वास दिला.ओझर : दोन दिवसांपूर्वी सलग २४ तास झालेल्या अवकाळी पावसामुळे जुन्नर तालुक्यात सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभाग व महसूल विभागाच्या वतीने संयुक्तपणे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांनी दिले. तालुक्यात द्राक्ष, डाळिंब, गहू, कांदा, आंबा, हरभरा, या पिकांचे नुकसान झाले. द्राक्षपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, तालुक्यात गुुंजाळवाडी, नारायणगाव व गोळेगाव या गावांमध्ये द्राक्षपीक मोठ्या प्रमाणात आहे. गोलेगावमधील द्राक्षे नुकसानापासून वाचली आहेत.तालुक्यात १५० हेक्टर द्राक्षे, १०० हेक्टर आंबा, १ हजार ५०० हेक्टर गहू, ७ हजार एकर कांदा व डांळिबाचे क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम तातडीने सुरू असून कृषी व महसूल विभागांचे तलाठी, ग्र्रामसेवकांनी दि. ३ पासून पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. चार दिवसांत पंचनामे पूर्ण करण्यात येणारे असल्याचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी बी. बी. वाणी यांनी सांगितले.