शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कृतिशील विचारवंत हरपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:14 IST

अमेरिकेत तत्कालीन काळात झालेल्या विद्यार्थ्यांच्या बंडात तिने सहभाग घेतला होता. त्यानंतर भारतात आल्यावर ती हातात गिटार घेऊन क्रांतीची गाणी ...

अमेरिकेत तत्कालीन काळात झालेल्या विद्यार्थ्यांच्या बंडात तिने सहभाग घेतला होता. त्यानंतर भारतात आल्यावर ती हातात गिटार घेऊन क्रांतीची गाणी म्हणत असे. डाव्या विचारांवर तिची निष्ठा होती. परंतु, खुल्या अर्थ व्यवस्थेनंतर ती बाजारपेठीय विचारांशी जुळली आणि शेतकरी संघटनेबरोबर काम करू लागली. दरम्यानच्या काळात समग्र महिला आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्रपणे काम करू लागलो. गेल अतिशय साध्या, मेहनती, लोकांशी नाळ जुळवून काम करणारी व्यक्ती होती. काही मतभेदांमुळे मी समग्र महिला आघाडीतून बाहेर पडले. मात्र, तिने शरद जोशी यांच्याबरोबर काम सुरू ठेवले. महिलांना जमिनीचा अधिकार मिळावा, याबाबत गेल आणि मधू किश्वर यांनी काम केले. शेतकरी संघटनेपासून मी दूर गेल्यानंतरही आमची मैत्री तशीच राहिली. गेल एक अतिशय मनमिळावू सुंदर व्यक्तिमत्त्व होतं. ती सतत कृतिशील विचारांचा पाठपुरावा करणारी होती.

कासेगाव येथे ती नेहमी सर्वांबरोबर मिळून मिसळून राहिली. शेतकऱ्यांचे कष्टप्रद आयुष्य तिने स्वीकारले. ती पाटणकर यांच्या घरात राहिली. मुलगी प्राची हिला जन्म दिला. भारत पाटणकर यांचे वडील बाबूजी हे त्या काळात नव्या विचाराचे प्रतिनिधित्व करत होते. भारत पाटणकर यांच्याशी विवाह हा गेलचा फार मोठा निर्णय होता. भारत हे तिच्यापेक्षा वयाने लहान होते. अल्झायमर आजार झाल्यानंतर शेवटच्या काळात त्यांनी तिची सेवा केली. पाटणकर यांनी तिच्यासाठी विविध ठिकाणी प्रवास करून खऱ्या अर्थाने हेतूपूर्वक तिला जिवंत ठेवलं. भारतीय संस्कृतीमध्ये पती किती एकनिष्ठ असू शकतो हे भारत पाटणकर यांनी दाखवून दिलं. अमेरिकेसारख्या सुस्थित देशात कदाचित तिला घरात राहावे लागले असते. मात्र, आजारी असूनही ती अनेक ठिकाणी फिरली. हळूहळू स्मृती जात असतानाही कार्यरत राहिली. पाटणकर कुटुंबाने गेलसाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे. तिला एकटे पडू दिले नाही. अमेरिकेसारख्या संपन्न देशात माणसं एकाकी होतात. परंतु, पाटणकर व निकम कुटुंबीयांनी एकत्रितपणे हात घट्ट धरून काम करत भारतीय कुटुंब व्यवस्थेचे आदर्शरूप दाखवले.

गेलची साहित्य संपदा खूप मोठी आहे. भारत पाटणकर यांच्याशी लग्न झाल्यानंतर ती ‘शलाका पाटणकर’ झाली. तिने सुध्दा हे परिवर्तन मनापासून स्वीकारले. भारत यांनी तिला लिहतं केलं. आपल्या लेखनातून तिने विद्यार्थ्यांनी एखाद्या प्रश्नाकडे कसे पाहावे, याची दृष्टी दिली. अनेकांना तिनं संशोधनाकडं, अभ्यासाकडं वळवलं. त्यामुळं एक कृतिशील विचारवंत असंच तिला म्हणता येईल. अमेरिकेशी जोडली गेलेली नाळ तोडून तिनं भारताचं नागरिकत्व स्वीकारलं, हे खूप महत्त्वाचं वाटतं. अमेरिकेत विद्यार्थ्यांनी केलेल्या बंडाची ती स्वत: साक्षीदार होती. त्यामुळं क्रांतिकारी विचारांचा धागा घेऊनच ती भारतात आली होती.

वेगवेगळ्या विषयांवर आमच्यात नेहमी चर्चा होत असत. या चर्चांमध्ये गेल खुल्या अर्थव्यवस्थेबाबतच्या सर्व गोष्टी स्पष्ट करू शकत नसे. त्यामुळं नवं अर्थ विषयक धोरण आणि जागतिकीकरण याबाबत आमच्यात नेहमी मतभेद होत होते. ‘एक तीळ सात जणांनी वाटून खावा,’ हे सांगणारी गरिबांची आणि कष्टकऱ्यांची भारतीय संस्कृती आहे. गेलनं सुध्दा आयुष्यभर कष्ट करून एक मोठी उंची गाठली.

- विद्युत भागवत, माजी विभागप्रमुख, स्त्री अभ्यास केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

(शब्दांकन : राहुल शिंदे)