शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

जीव होतोय कासावीस

By admin | Updated: June 1, 2016 00:49 IST

शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाईची समस्या उग्ररूप धारण करू लागली आहे. शिरूर तालुक्याच्या या भागातील डोंगरमाथ्यावरील गावे व वाड्यावस्त्यांवरील पाणीसाठ्यांनी तळ गाठला आहे

कान्हूर मेसाई : शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाईची समस्या उग्ररूप धारण करू लागली आहे. शिरूर तालुक्याच्या या भागातील डोंगरमाथ्यावरील गावे व वाड्यावस्त्यांवरील पाणीसाठ्यांनी तळ गाठला आहे. माणसाबरोबर पशुपक्ष्यांचाही जीव घोेटभर पाण्यासाठी कासावीस होत आहे.या भागातील पारंपरिक पाणवठे, बोर, विहिरी आटल्याने माणसांरोबरच जनावरांचे पाण्यावाचून हाल होऊ लागले आहेत. विहिरी खोल गेल्याने पाणी कसेबसे काढून तहान भागविली जात आहे. बायाबावडे यांचा दिवसाचा वेळ केवळ पाणी मिळविणे याच कामासाठी जात आहे. नंबर लावून पाणी भरण्यासाठी रात्रही बोरवर काढावी लागत आहे. पाण्यासाठी रात्र जागून निघत असल्याने या परिसरातील दिवसाची मजुरी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत आहे.या भागात जेमतेम शिल्लक असणारे पाणीही दूषित झाले आहे. या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या दूषित पाण्यामुळे जुलाब-उलट्यांमुळे आजारी पडलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मिळणारे पाणीही गढूळ व दूषित असले, तरी नाइलाजास्तव गाळून ते पिण्यासाठी वापरावे लागत आहे.(वार्ताहर)