शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

देश अडचणीत; सोनियांचा पुढाकार त्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भाजपला सत्तेचा माज आला आहे, त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आलेला देश वाचवण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भाजपला सत्तेचा माज आला आहे, त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आलेला देश वाचवण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुढाकार घेत विरोधी पक्षांंना एकत्र करत आहोत, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आलेल्या पटोले यांनी पक्षाच्या दिवसभराच्या कार्यक्रमांनंतर पत्रकारांबरोबर काँग्रेस भवनमध्ये संवाद साधला.

पटोले म्हणाले, दिल्लीत शेतकरी अनेक महिने आंदोलन करत आहेत, इंधनाचे दर आकाशाला भिडले, बेरोजगारी वाढत आहे व देशाचे पंतप्रधान यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. संपूर्ण देशच त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे त्रस्त आहे, काँग्रेसच्या काळात शांतता होती, आता अशांतता आहे.

भाजप म्हणजे भ्रष्टाचाराचे केंद्र अशी टीका करून पटोले म्हणाले, त्यांच्याच पक्षाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मागील ७ वर्षात स्वीस बँकेतील संपत्ती ३०० पट वाढल्याचे म्हटले आहे. पुण्यात प्राईम लोकेशनच्या जागा विकायला काढल्या. यांचा स्थायी समिती अध्यक्ष लाचखोरीत सापडतो. वरपासून खालपर्य़ंत तिथे हेच सुरू आहे. हे मर्यादा ओलांडणारे लोक आहेत, आता देशातील जनताच त्यांना बरखास्त करेल.

पक्षाच्या प्रभारी सोनल पटेल, निरीक्षक बसवराज पाटील, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.