शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

महिला दक्षता समित्याही करणार समुपदेशन

By admin | Updated: September 20, 2015 00:36 IST

महिलांसाठी कार्य करणाऱ्या विविध एनजीओ, पोलीस स्टेशनमधील समुपदेशन केंद्रे, महिला दक्षता समिती, जिल्हा परिषदेतील समुपदेशन केंद्रे, कौटुंबिक समुपदेशन केंद्रे किंवा

पुणे : महिलांसाठी कार्य करणाऱ्या विविध एनजीओ, पोलीस स्टेशनमधील समुपदेशन केंद्रे, महिला दक्षता समिती, जिल्हा परिषदेतील समुपदेशन केंद्रे, कौटुंबिक समुपदेशन केंद्रे किंवा इतर कोणत्याही समुपदेशन केंद्रातील समुपदेशकांना कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गातील पीडित महिलेला समुपदेशन करण्याची दारे पुन्हा खुली झाली आहेत. कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पीडित महिलेला न्यायालयाच्या आदेशाशिवाय अन्य कोणतीही एजन्सी समुपदेशन करू नये, असे २४ जुलै २०१४ रोजी शासनाने काढलेले परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले आहे. त्यामुळे इथून पुढे कौटुंबिक हिंसाचारातील पीडित महिलेला न्यायालयाच्या कक्षेबाहेरही समुपदेशन करून उभारी देण्यावर एनजीओ व इतर केंद्रावर असणारा मज्जाव राहणार नाही. शासनाने २४ जुलै २०१४ रोजी परिपत्रक काढले होते व त्यात नमूद केले होते, की कौटुंबिक हिंसाचार कायद्यात खटला दाखल केल्यानंतरच पीडित महिलेला समुपदेशन किंवा मध्यस्थी करता येणार आहे आणि तेही त्या खटल्यात न्यायालयाने समुपदेशन करण्याबाबत आदेश दिल्यानंतरच शक्य आहे आणि हे समुपदेशन न्यायालयातील समुपदेशक व मध्यस्थी न्यायाधीशांशिवाय अन्य कोणत्याही एजन्सीला करता येणार नाही. परिपत्रकात नमूद करून न्यायालयाच्या आदेशाशिवाय समुपदेशन केल्यास कायद्याचे उल्लंघन मानले जाईल, असे सांगण्यात आले होते. या परिपत्रकाविरुद्ध आयएलएस लॉ कॉलेजच्या महिला अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉ. जया सागडे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेत याचिकाकर्त्यांनी नमूद केले होते, की एजन्सीने केवळ महिलांना माहिती देणे आणि न्यायालयाविषयी सांगणे म्हणजे त्यांचे काम केवळ ‘संदर्भ’ देण्याचेच उरेल. कित्येक महिलांना थेट कोर्टकचेऱ्या करायच्या नसतात. त्यांना योग्य रितीने कायदेशीर सल्ला देण्याचे काम एनजीओच करू शकतात. त्यामुळे एनजीओ व इतर समुपदेशन केंद्राच्या समुपदेशनावर बंदी आणणे चुकीचे ठरेल. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोहित शहा व रोशन दळवी यांच्या खंडपीठाने २४ जुलै २०१४ चे परिपत्रक हे भेदभाव, अनियंत्रित व अवास्तव असल्याचे नमूद करत तो रद्दबातल ठरवला. एजन्सीने केवळ महिलांना माहिती देणे आणि न्यायालयाविषयी सांगणे म्हणजे त्यांचे काम केवळ ‘संदर्भ’ देण्याचेच उरेल. मुळात अनेक एजन्सी अशा आहेत ज्या महिलांसाठीचा कायदा अस्तित्वात येण्याआधी पासूनच पीडितांचे समुपदेशन करत आहेत आणि त्यासाठी त्यांचा दशकानुदशकांचा अनुभव आहे. मुळात तिच्या हक्कांविषयी तिला सांगणे हा छोटा भाग आहे, तिला स्वत:साठी उभे राहण्याची उभारी देणे, हिंसेपासून स्वत:चा बचाव करणे. त्याचप्रमाणे कित्येक महिलांना थेट कोर्टकचेऱ्या करायच्या नसतात. त्यांना योग्य रितीने कायदेशीर सल्ला देण्याचे काम एनजीओच करू शकतात. त्यामुळे एनजीओ व इतर समुपदेशन केंद्राच्या समुपदेशनावर बंदी आणणे चुकीचे ठरेल.