शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

मुख्य सभेत निरोप घेताना भावुक झाले नगरसेवक

By admin | Updated: March 15, 2017 03:42 IST

महापालिकेच्या मावळत्या सभागृहातील सभासदांची शेवटची निरोपाची मुख्य सभा मंगळवारी पार पडली. सलग २५ वर्षांपासून सभागृहात असलेल्या सभासदांसह पहिल्यांदाच

पुणे : महापालिकेच्या मावळत्या सभागृहातील सभासदांची शेवटची निरोपाची मुख्य सभा मंगळवारी पार पडली. सलग २५ वर्षांपासून सभागृहात असलेल्या सभासदांसह पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांसह ८५ सभासदांना निरोप देण्यात आला. ईव्हीईम मशीनचा गोंधळ, निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांचा पक्षपातीपणा यामुळे पराभवाला सामोरे जावे लागल्याची भावना सभासदांनी या वेळी व्यक्त केली. सभागृहात नसलो तरी रस्त्यावरची लढाई यापुढील काळातही लढत राहण्याचा निर्धार या वेळी काही सभासदांनी व्यक्त केला. महापालिकेच्या १५२ जुन्या सदस्यांपैकी सभागृहात ६७ नगरसेवक पुन्हा निवडून आले. मात्र उर्वरित ८५ नगरसेवक नवीन सभागृहामध्ये असणार नाहीत. त्यापैकी काहींनी निवडणूक लढवलेली नाही तर काहींना पराभव स्वीकारावा लागला आहे. या सभासदांना भावपूर्ण निरोप मंगळवारी देण्यात आला. बुधवारी महापौर व उपमहापौर यांची निवड होऊन नवीन सभागृह अस्तित्वात येणार आहे.महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘मला महापौर म्हणून १ वर्षे १९ दिवस काम करता आले. महापौर म्हणून काम करण्यासाठी पक्षाकडून मला खूप स्वातंत्र्य मिळाले. सायकल फिरणारा प्रशांत जगताप लाल दिव्याच्या गाडीतून शहराच्या कानाकोपऱ्यात फिरला.’’ बंडू केमसे म्हणाले, ‘‘गेल्या ५ वर्षांच्या कालावधीमध्ये सर्व पक्षांचे नगरसेवक, अधिकारी यांनी चांगले सहकार्य केले आहे. निवडून येऊ शकलो नसलो तरी फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार समाजामध्ये रुजविण्यासाठी यापुढील काळात प्रयत्नशील राहणार आहे.’’किशोर शिंदे म्हणाले, ‘‘निवडून आलो नसलो तरी शहराच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलन करीत राहू. विकासाच्या प्रश्नांवर आयुक्तांकडे पाठपुरावा करू’’अशोक हरणावळ म्हणाले, ‘‘पराभवासाठी मी कोणालाही दोषी धरणार नाही. माझ्या पराभवानंतर घरासमोर शेकडो लोक जमा झाली होती. या लोकांच्या प्रेमापोटीच यापुढे काम करीत राहणार आहे.’’कमल व्यवहारे म्हणाल्या, ‘‘ २५ वर्षांपूर्वी सभागृहात पहिल्यांदा निवडून आले तेव्हा केवळ दोन लाख रूपयांचा विकास निधी मिळाला होता. त्यानंतर या निधीमध्ये मोठयाप्रमाणात वाढ होत गेली. ईव्हीएम मशीनमुळे आमचा पराभव झाला.’’अभय छाजेड म्हणाले, ‘‘अनेकदा नियोजित नसलेली कामे अचानक घुसडली जात आहेत, हा पायंडा चुकीचा आहे. पालिकेने उत्पन्नाची साधने वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.’’ मुकारी अलगुडे, अशोक येनपुरे, धनंजय जाधव, रूपाली पाटील, मिनल सरवदे, मनिषा घाटे, पुष्पा कनोजिया, नंदा लोणकर, बाबू वागस्कर, अस्मिता शिंदे, स्मिता वस्ते यांनी मनोगत व्यक्त केले.शेवटच्या सभेत अनेक किस्से सांगत सभासदांनी रंग भरला. ‘‘निवडणुकीचा निकाल यायला सुरुवात झाल्यानंतर भाजपाने आम्हाला एसपी कॉलेजपासून पर्वतीपर्यंत मार देत नेले. सदाशिव पेठेतील बॅलेट मशीन उघडल्यानंतर तर अशोक गायबच झाला’’ अशी मिश्कील टिप्पणी अशोक हरणावळ यांनी केली. ‘‘लढता, लढता हरलो, तरी हरण्याची खंत नाही, शांत बसायला आम्ही संत नाही’’ या रूपाली पाटील यांच्या कवितेच्या ओळींना दाद मिळाली.आत्मपरीक्षणाची गरजनिवडणुकीत आपला पराभव का झाला याचे आत्मपरीक्षण सगळ्यांनी करण्याची गरज आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस ही राष्ट्रवादीला आपला शत्रू मानत होती. काँग्रेस पक्षांतर्गतच खेचाखेची करण्यात येत होती. निवडणुकीत भाजपाचा मुकाबला करण्यासाठी सक्षम नेतृत्व पुढे येऊ शकले नाही, असे स्पष्ट मत विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी व्यक्त केले.फुली मारून पुढे जाशेवटच्या सभेत अनेक नगरसेवकांनी ईव्हीएम मशीनला जबाबदार धरले. त्यानंतर बोलताना महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘जो निकाल आला आहे, तो स्वीकारून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. मनाची चुकीची समजूत करून घेऊ नये.’’ त्यानंतर डोंबिवली फास्ट या चित्रपटातील डॉयलॉग सांगताना महापौर म्हणाले, ‘‘ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत नाहीत, अशा प्रश्नांना फुली मारून पुढे जायचे असते. अन्यथा त्या प्रश्नांमध्ये गुंतून आयुष्य बरबाद होते.’’