शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक आले भानावर

By admin | Updated: July 5, 2014 06:20 IST

आता बास’ उपक्रमांतर्गत अनधिकृत बांधकाम प्रश्नावर आवाज उठविणारी वृत्तमालिका चार दिवसांपासून सुरू आहे.

संजय माने, पिंपरी‘आता बास’ उपक्रमांतर्गत अनधिकृत बांधकाम प्रश्नावर आवाज उठविणारी वृत्तमालिका चार दिवसांपासून सुरू आहे. अनधिकृत बांधकाम प्रश्नी तोडगा निघत नाही, कारवाईची टांगती तलवार आहेच, शिवाय दुप्पट शास्ती वसुलीचा महापालिकेने तगादा लावला असल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिली. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर नगरसेवकांना अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडण्यास ही वृत्तमालिका साह्यभूत ठरली. त्याचे पडसाद महापालिका सभेत उमटले. सत्ता आमची, शासन आमचे तरीही नागरिकांचा प्रश्न सोडवता येत नसेल, तर नगरसेवक पदावर राहून उपयोग काय, अशा संतप्त भावना व्यक्त करून यापुढे शहरवासीयांनी शास्ती भरू नये, असे आवाहन करण्याचा एकमुखी निर्धार महापालिका सभेत सदस्यांनी व्यक्त केला आहे.अनधिकृत बांधकामप्रकरणी न्यायालयीन निर्णय, शासनादेश असल्याने विरोध कसा करायचा, नगरसेवकपद रद्दची कारवाई होऊ शकते, या भीतीने अनेक नगरसेवक या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेण्यास धजावत नव्हते. निवेदने, मोर्चा काढून विरोध नोंदविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत होता. परंतु शुक्रवारी झालेल्या सभेत नगरसेवकपद गेले, तरी बेहत्तर असा दृढनिश्चय करून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, तसेच शिवसेना, भाजप आणि मनसेच्या नगरसेवकांनी शास्तीला विरोध केला. ‘आता बास’ उपक्रमातील पहिलीच वृत्तमालिका जबरदस्त परिणामकारक ठरली. सर्वपक्षीय नगरसेवकांची ही एकजूट पुढील काळात नागरिकांना अनधिकृत बांधकाम कारवाईच्या संकटातून बाहेर काढण्यास उपयुक्त ठरणार आहे.अनधिकृत बांधकामांना शास्ती आकारण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याची अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली. मूळ मिळकतकराची रक्कम, त्या रकमेच्या दुप्पट शास्ती अशी तिप्पट रक्कम वसूल करण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यांना शहरवासीयांनी विरोध केला आहे. एकीकडे अनधिकृत बांधकामावरील कारवाईची भीती, तर दुसरीकडे शास्तीवसुलीसाठी महापालिकेचा तगादा, ही परिस्थिती शहरवासीयांना असह्य झाली आहे.चऱ्होली, मोशी, तळवडे, किवळे या महापालिकेत १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांमधील जुन्या घरांना, मिळकतींना महापालिकेने शास्तीची नोटीस बजावली आहे. ही बांधकामे ग्रामपंचायत काळातील आहेत. ग्रामपंचायत काळातील घरांना अनधिकृत ठरविण्याचा अधिकार महापालिकेला कोणी दिला? महापालिकेत समाविष्ट होऊन १७ वर्षे झाली, तरी समाविष्ट गावांमध्ये अद्याप पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधा मिळू शकल्या नाहीत. सुविधांच्या नावाने शंख असताना, अशा पद्धतीने अवाजवी करआकारणी या भागातील रहिवाशांसाठी अन्यायकारक ठरणारी आहे. अशा शब्दांत नगरसेवकांनी नागरिकांची बाजू मांडली. प्रत्येक वेळी न्यायालयाचा आदेश असे सांगून अधिकारी भीती दाखवण्याचा प्रयत्न करतात. काय होईल, फासावर तर चढवले जाणार नाही ना, अशी धाडसी भूमिका त्यांच्या तोंडून व्यक्त झाली. आतापर्यंत पक्षाच्या विरोधात, नेत्यांच्या भूमिकेविरोधात ब्र शब्द न काढणाऱ्या नगरसेवकांनी थेट स्वत:च्या पक्षाविरोधात वक्तव्य करण्याचे धाडस दाखवले. ‘सत्ता आमची, सरकार आमचे; पण नागरिकांचे प्रश्न सुटत नसतील, तर काय कामाचे,’ अशा शब्दांत त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली. आम्हीच चुकलो. नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास कमी पडलो, अशी कबुलीसुद्धा भर सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी दिली. यापुढे नागरिकांनी शास्ती भरू नये, असे आवाहन महापौरांनी भर सभागृहात करावे. तसेच यापुढे अधिकाऱ्यांनी नागरिकांना शास्तीच्या नोटीस देऊ नयेत. शास्तीवसुली करू नये, असा आदेश प्रशासनास द्यावा, अशी आग्रही मागणी सदस्यांनी केली. महापौर मोहिनी लांडे यांनीही शास्तीवसुलीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे अधिकाऱ्यांनी नागरिकांना शास्तीच्या नोटीस देऊ नयेत, असा आदेश महापौरांनी आयुक्त राजीव जाधव यांना दिला. जोपर्यंत अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत शास्ती भरायची नाही, असे नगरसेवकांनी शहरवासीयांना सांगावे, अशी धाडसी, निर्णायक भूमिका पहिल्यांदाच एकजुटीने नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.