शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
3
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
4
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
5
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
6
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
7
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
8
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
9
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
10
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
11
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
12
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
13
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
14
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
15
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
16
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
17
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
18
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
19
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
20
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव

कोरोना अजूनही दारात,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:18 IST

पुणे : मास्क घातल्याने आमचा जीव गुदमरतो, आम्ही आमचे बघू, एवढे दिवस मास्क घालून काही उपयोग झाला का, अशी ...

पुणे : मास्क घातल्याने आमचा जीव गुदमरतो, आम्ही आमचे बघू, एवढे दिवस मास्क घालून काही उपयोग झाला का, अशी उत्तरे नागरिक देत असून, कोरोनाबाबत ते बेफिकिर असल्याचे दिसून आले. कोरोनाची रुग्णसंख्या आता वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोना अजूनही दारात असून, नियम न पाळल्यास घरात बसायची वेळ पुन्हा येऊ शकते. म्हणून कोरोनाबाबतचे नियम पाळणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या तीन, चार दिवसांपासून राज्यासहित पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. डिसेंबरनंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. तसेच प्रशासनाने बंधने शिथिल करून सर्व गोष्टी सुरू करण्याची परवानगी दिली. परंतु मास्क बंधनकारक ठेवण्यात आले होते. बंधने शिथिल झाल्याने काही नागरिकांनी मास्क घालणे बंद केले. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने गर्दीच्या ठिकाणी, चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये आणि प्रमुख चौकात पाहणी केली.

----------------

प्रमुख चौक

स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन अशा प्रमुख चौकात रिक्षा स्टँड, बस, एसटी वाहतूक, खाद्यपदार्थ गाड्या, अशी सर्व प्रकारची वर्दळ असते. सर्व गोष्टी चालू झाल्याने दिवसभर या भागात गर्दी दिसून येते. त्यामुळे अशा ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. अशा चौकात असणारे रिक्षाचालक विनामास्क थांबलेले दिसून आले. त्यांना मास्क घाला असे सांगितल्यावर, आम्ही आमचे बघू असे उत्तर ऐकवण्यात आले. काही खाद्यपदार्थ गाड्यांवर विक्रेते स्वतः मास्क घालत नसल्याचे चित्र होते.

-----------

चिंचोळ्या गल्ली

शहरात मध्यवर्ती भागात अनेक चिंचोळ्या गल्ली आहेत. एखाद्या गल्लीत १००, २०० मीटरच्या अंतरावर ५० लोकांमागे १० ते १५ नागरिकांनी मास्क न घातल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक दुकानांमध्ये विक्रेते एका ठिकाणी बसूनही मास्क न घालता व्यवसाय करत आहेत.

--------------

मंडई - तुळशीबागसारखी गर्दीची ठिकाणे

नागरिक गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर तोंडाला मास्क न लावता गळ्याला मास्क लावतात. तसेच विक्रेतेही विनामास्क बसल्याचे दिसून आले.

…................

अनेक तरुण मंडळी वाहतुकीचे नियम मोडून फिरत असतात. अशा परिस्थितीतही ते विनामास्क फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच रस्त्यावरून अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विनामास्क फिरत आहेत. पोलिसांची कारवाई सुरू असली तरी नागरिक अजिबात घाबरत नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

नागरिकांना मास्क का घालत नाही, असे विचारल्यावर मिळालेली उत्तरे

१) मास्क घातला म्हणून कोरोना होत नाही का

२) आताच जेवण झालाय, जरा आरामात बसलोय म्हणून घातला नाही.

३) श्वास घेता येत नाही, कान दुखतात.

४) एवढे दिवस मास्क घालून कोरोना कमी झाला आहे का

५) सरकार उगाच लोकांना घाबरवत आहे. मग आम्ही का मास्क घालू.