शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

कोरोनामुळे नोकरी गेल्याने मुलांची लग्नं जुळणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:11 IST

लग्न जोडणी म्हटलं की पूर्वी शेतीला महत्त्वाचे स्थान होते व मुलगा काय करतो यापेक्षा मुलाकडे किती शेती आहे, कुटुंब ...

लग्न जोडणी म्हटलं की पूर्वी शेतीला महत्त्वाचे स्थान होते व मुलगा काय करतो यापेक्षा मुलाकडे किती शेती आहे, कुटुंब कसे आहे त्याची गावात प्रतिष्ठा कशी आहे, याबाबींना महत्त्व दिले जायचे. मात्र आता काळानुरूप यात बदल झाला आहे. मुलगा शेती करतो असे सांगितले की, मुलीच्या कुटुंबाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची वास्तविकता आहे. व्यसनाधीन भूमिहीन अल्पभूधारक नव्हे तर शेतकरी तरुणांची लग्न जोडण्याची मोठी सामाजिक समस्या गेल्या काही वर्षापासून निर्माण झाली आहे . अशातच गेल्या वर्षापासून लागलेल्या कोरोना रुपी ग्रहणामुळे शहरात छोटी-मोठी नोकरी करणाऱ्या तरुणाच्या नोकर्‍या गेल्या .परिणामी नोकरदार तरुण मूळ गावी परतले यामुळे बेरोजगारीत भर पडली. याचा परिणाम भावी नवरदेवाच्या लग्नावर झाला आहे.

प्रत्येक आईवडिलांना आपली मुलगी सधन कुटुंबात पाहावी अशी अपेक्षा असते. नोकरी असलेल्या मुलांना अधिक पसंती दिली जाते, मात्र गरीब असो वा श्रीमंत शेतकरी मुलाला मुलगी देण्यास आई-वडील मागेपुढे पाहतात कोरूनाच्या संकटामुळे अनेक तरुण मोठ्या शहरातून गावात आले काही तरुण पुन्हा शहरात परत गेले .मात्र कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या नोकरीच्या अनिश्चित सावटामुळे बरेच युवक खेड्यातच रमले शेती किंवा अन्य व्यवसाय करून लागले. तथापि सद्यस्थितीत उपवर मुलीची संख्या कमी असल्याने तरुणांची लग्न जुळणे कठीण झाले आहे. परिणामी उपवर मुलांच्या वडिलांची फारच दमछाक होत आहे लग्नाचे वय झालेले ही मुले अविवाहित राहण्याची चिंता अनेक मुलांच्या पालकांना सतावत आहे.. मागील एक वर्षात अनेकांचा रोजगार बुडाला. त्यामुळे हाताला काम नाही वधू पित्याकडून कमावत्या वराचा शोध घेतला जातो. मुलगी सुखात नांदत ही त्यांची प्रामाणिक भावना असते. परंतु मागील वर्षभरात अनेक युवकांच्या हाताचे काम केले त्यामुळे कमाई बंद झाली परिणामी अशा अनेक तरुणांचा लग्नात बाधा येत आहेत मुलगा काही कमावत नाहीतर त्याला मुलगी द्यायची कशी असा वधूपिता यांचा प्रश्‍न असतो त्यातून लग्नाच्या अडचणी वाढल्या आहेत......