शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे नोकरी गेल्याने मुलांची लग्नं जुळणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:11 IST

लग्न जोडणी म्हटलं की पूर्वी शेतीला महत्त्वाचे स्थान होते व मुलगा काय करतो यापेक्षा मुलाकडे किती शेती आहे, कुटुंब ...

लग्न जोडणी म्हटलं की पूर्वी शेतीला महत्त्वाचे स्थान होते व मुलगा काय करतो यापेक्षा मुलाकडे किती शेती आहे, कुटुंब कसे आहे त्याची गावात प्रतिष्ठा कशी आहे, याबाबींना महत्त्व दिले जायचे. मात्र आता काळानुरूप यात बदल झाला आहे. मुलगा शेती करतो असे सांगितले की, मुलीच्या कुटुंबाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची वास्तविकता आहे. व्यसनाधीन भूमिहीन अल्पभूधारक नव्हे तर शेतकरी तरुणांची लग्न जोडण्याची मोठी सामाजिक समस्या गेल्या काही वर्षापासून निर्माण झाली आहे . अशातच गेल्या वर्षापासून लागलेल्या कोरोना रुपी ग्रहणामुळे शहरात छोटी-मोठी नोकरी करणाऱ्या तरुणाच्या नोकर्‍या गेल्या .परिणामी नोकरदार तरुण मूळ गावी परतले यामुळे बेरोजगारीत भर पडली. याचा परिणाम भावी नवरदेवाच्या लग्नावर झाला आहे.

प्रत्येक आईवडिलांना आपली मुलगी सधन कुटुंबात पाहावी अशी अपेक्षा असते. नोकरी असलेल्या मुलांना अधिक पसंती दिली जाते, मात्र गरीब असो वा श्रीमंत शेतकरी मुलाला मुलगी देण्यास आई-वडील मागेपुढे पाहतात कोरूनाच्या संकटामुळे अनेक तरुण मोठ्या शहरातून गावात आले काही तरुण पुन्हा शहरात परत गेले .मात्र कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या नोकरीच्या अनिश्चित सावटामुळे बरेच युवक खेड्यातच रमले शेती किंवा अन्य व्यवसाय करून लागले. तथापि सद्यस्थितीत उपवर मुलीची संख्या कमी असल्याने तरुणांची लग्न जुळणे कठीण झाले आहे. परिणामी उपवर मुलांच्या वडिलांची फारच दमछाक होत आहे लग्नाचे वय झालेले ही मुले अविवाहित राहण्याची चिंता अनेक मुलांच्या पालकांना सतावत आहे.. मागील एक वर्षात अनेकांचा रोजगार बुडाला. त्यामुळे हाताला काम नाही वधू पित्याकडून कमावत्या वराचा शोध घेतला जातो. मुलगी सुखात नांदत ही त्यांची प्रामाणिक भावना असते. परंतु मागील वर्षभरात अनेक युवकांच्या हाताचे काम केले त्यामुळे कमाई बंद झाली परिणामी अशा अनेक तरुणांचा लग्नात बाधा येत आहेत मुलगा काही कमावत नाहीतर त्याला मुलगी द्यायची कशी असा वधूपिता यांचा प्रश्‍न असतो त्यातून लग्नाच्या अडचणी वाढल्या आहेत......