शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
2
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
3
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
4
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
5
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
6
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
7
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
8
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
9
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
10
“बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिले”; शिंदेंनी केले PM मोदी-नितीश कुमारांचे अभिनंदन
11
Metaचे मोठे पाऊल! WhatsApp मध्ये लवकरच येणार 'हे' जबरदस्त फीचर; वारंवार लॉग-इन करण्याची कटकट संपणार
12
मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!
13
...त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कुरुबरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात; काँग्रेसचा टोला
14
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
15
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
16
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
17
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
18
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
19
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
20
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील कोरोना संसर्ग सर्वोच्च बिंदूवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:10 IST

प्रज्ञा केळकर-सिंग लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या पुण्यात दररोज ४ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील ...

प्रज्ञा केळकर-सिंग

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सध्या पुण्यात दररोज ४ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णांची संख्या ८ हजारांचा आकडा ओलांडून पुढे गेली आहे. सध्या पुण्यातील कोरोना संसर्गाचा आलेख सर्वोच्च बिंदूवर असून पुढील आठ दिवसांचा कालावधी शहरासाठी ‘आत्यंतिक कसोटी’चा असेल, असे भाकीत भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी केले.

साधारणपणे १८ मार्चनंतर शहरातील लोकसंख्या ४ हजारांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज डॉ. ललवाणी यांनी १२ मार्च रोजी व्यक्त केला होता. तो बरोबर आला. पुणे पहिल्यापासूनच कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरले आहे. पुण्यातील रुग्णवाढीचा वेग खूप जास्त आहे. सध्या रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. येत्या रविवारपर्यंत (दि.१८) रुग्णसंख्या आणखी मोठा पल्ला गाठेल. त्यामुळेच हे आठ दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. ललवाणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पुण्यातील आरोग्य व्यवस्था वेगाने काम करत असल्याने आठवड्याभरात प्रसारावर नियंत्रण मिळवता येईल, असा दावा त्यांनी केला.

ललवाणी म्हणाले, “सध्या एकूण रुग्णसंख्येपैकी १० टक्के लोकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. त्यातील १० टक्के लोकांना आयसीयूची गरज भासत आहे. लॉकडाऊन न केल्यास रुग्णसंख्येवर नियंत्रण राहणार नाही. आताच्या मिनी लॉकडाऊनचा ३०-४० टक्के परिणाम दोन आठवड्यांनी पाहायला मिळेल. सुरुवातीच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांकडून प्रसार होत होता. आता कुटुंबे, संपूर्ण सोसायटी ‘पॉझिटिव्ह’ होताना दिसत आहेत. त्यामुळे या लॉकडाऊनने तो प्रसार कसा थांबवणार, हे पाहावे लागेल. पार्शियल लॉकडाऊन सात दिवसांपेक्षा जास्त वाढवता येणार नाही. कारण, लोक पुन्हा आपापल्या गावी परतू लागल्यास अर्थचक्र पुन्हा बिघडेल. त्यामुळे सध्या शासनाने लसीकरणावर भर देणे आणि नागरिकांनी स्वत:हून लसीकरणासाठी पुढे येणे आवश्यक आहे.”

चौकट

काय असेल मृत्यूदराची स्थिती?

सध्याची परिस्थिती गंभीर आहे. महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाने २९५ लोकांचा मृत्यू झाला. पुढील दोन दिवसांत दैनंदिन मृत्यूचा आकडा ७००-८०० पर्यंत जाऊ शकतो. पुढील आठवड्यात मृत्यूची संख्या हजारापर्यंत जाऊ शकते. लॉकडाऊनचा परिणाम दोन आठवड्यांनी दिसू लागेल आणि मृत्यूदर कमी होईल. १५ एप्रिल ते ३१ मे हा कालावधी भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.

चौकट

१२ एप्रिलपर्यंतचा प्रशासकीय अंदाज

– ऑक्सिजनविरहीत फक्त ९ खाटा शिल्लक राहतील.

– ३२०७ ऑक्सिजन खाटांची कमतरता भासेल.

– ४६२ आयसीयू खाटा शिल्लक राहतील.

– ६४७ व्हेंटिलेटर्सची कमतरता भासेल.